🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, जुलै ३१, २०२१

DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात म्हणत... दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने ऑडिओ क्लिप केली व्हायरल

 

Audio

विरार,दि 31 जुलै 2021 : बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’म्हणा-या पुणे परिमंडळ 1 च्या DCP प्रियंका नारनवरेच्या विरुद्ध एका दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने चॅलेंज देत दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे.

विरार येथील दत्तात्रेय काशिनाथ नाईक या पोलीस कर्मचाऱ्यांने व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये असे म्हटले आहे की, 

"DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात.

आणि मग लिडरशिपच्या गोष्टी करतात,लिडरशिप म्हणून तुम्ही सौजन्याचा, प्रामाणिकपणाचा,कर्तव्यपरायणतेचा,सचोटिचा आदर्श तुम्हाला घालून द्यायचे असेल तर तुम्ही असं जेवण बिवण स्वतः साठी, आपल्या नव-यासाठी आणण्यासाठी अशी अधिनस्त कर्मचा-यांना तुम्ही मुळात आदेशच द्यायचे नाही.तुम्ही म्हणता की ते क्लिप हि इडिटिंग केलेली आहे थोडासा संवाद माझा आहे, म्हणजे असं आहे का? तुम्हाला फक्त मटन बिर्याणीच हवी होती, नंतर बोंबिल,नंतर सुप तुमचं एका ह्याच्यावरपण भागत नाही आहे हे अशी आणि तुम्ही शिस्त आणि कमांडिंगच्या आणि कंट्रोलिंगच्या नेतृत्वाच्या गोष्टी करता का तुम्ही? तुमच्यासारखं नेतृत्व लाभलय म्हणून तर सत्यानाश होत आलाय पोलीस डिपार्टमेंटचा,तुमच्या हातात पोलीसांचं भवितव्य दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतःसाठी आपल्या नव-यासाठी जेवणं जेवणावळी मागवता आपल्या हद्दीतल्या हॉटेलवरुन आणि तुम्हाला एवढी पण शिस्त नाही की सोशल मिडियावर जे स्पष्टिकरण देताय ते तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली का? हे अशा प्रकारचं सोशल मिडिया वरती जर स्पष्टिकरण ची क्लिप एखाद्या तुमचा अधिनस्त पुलीस कर्मचारी देलता तर तेवढा त्याला शोकात तुम्ही दिली असती.तुम्हाला काय वाटतं तुम्ही मार्क्सवरुन आलेले आहेत का मंगळावरुन, काय बुधावरुन काय म्हणजे IPS म्हणजे काय? यशस्वीतेचं किंवा एकदम प्रामाणिकपणाचं अत्युच्च मानबिंदू आहे का? तुम्हीच तर असे खायचं एक आणि दाखवायचं एक करुन पोलीस खात्याला वेठिस धरलेलं आहे तुमच्या सारख्या अधिका-यांनी आणि आता उघड झालं तर बचावासाठी नको ते मुद्दे मांडताय तुम्हाला ब्लॅकमेल करतयं,काय ते पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला ब्लॅकमेल करणार आणि ते एवढे जर चोर आहेत, भ्रष्टाचारी आहेत त्यांनी हाहाकार माजवला होता, पंधरा पंधरा वर्षे ते एका ठिकाणी होते त्यांचं कंबर्ड तुम्ही मोडलं म्हणून तुमच्याकडे ते द्वेष भावनेनं,आणि बदला सुड भावनेने तुमच्यावर ते षडयंत्र रचत आहेत अशा नालायक माणसांना जेवण आणायला सांगता कशाला नव-यासाठी बिर्याणी साजूक तूपातली,काहीच वाटत नाही तुम्हाला असं स्पष्टीकरण देताना.आता तुम्हीही व्हायरल केली ना माझं नाव दत्तात्रेय काशिनाथ नाईक आहे.राहणार विरार हे घ्या हे ऐका तुम्ही जशी तुमची क्लिप व्हायरल झाली ती मी पण करतो ऐका.असे म्हणत स्वतः ची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे."


पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या मॅडम मटण बिर्याणीची ऑर्डर आणायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांना ही बिर्याणी फुकट हवी आहे. आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय? असंही त्या आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांयाने ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय.


DCP प्रियंका नारनवरेची व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया

“अजून चौकशी झालेली नाही. माननीय गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे त बाहेर येईल. तसंच मी स्वत:ही तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळं कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोकं होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केलं गेलं आहे. माननीय गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल.”

‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो’

“माझ्या कार्यालयात काही कर्मचारी होते. त्यांना काढण्यासाठी मी पाऊल टाकलं होतं. त्यांचे भरपूर हितसंबंध होते, या गोष्टीमुळे वातावरण खराब होत होतं. म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनला परत पाठवलं. हे लोकं दुखावलेले आहेत. काही सिनिअर्सचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलं गेलेलं आहे. हा एकप्रकारे मला गुंतवण्याचा प्रकार आहे. बदलीच्या वेळेलाच अशी गोष्ट का केली गेली. मी गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे. पोलीस विभागात काय सुरु आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो. मात्र, येणाऱ्या काळात ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. अशावेळी माध्यमांनीही सर्व बाबी तपासून अशा बातम्या देणं गरजेचं आहे,” असं मत महिला पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलंय.


पुणे पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; आयुक्तांना दिला आदेश

पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करत योग्य ती कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

सातवा वेतन आयोग : शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा महा लाचखोर मुख्याध्यापक 5,000 रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*== प्रेसनोट ==*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* नाशिक.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-35, रा.पिंपरखेड, ता.दिंडोरी , जि. नाशिक 

▶️ *आरोपी-* राजेंद्र दामू कळसाईत, वय - 51 , मुख्याध्यापक , शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पिंपरखेड,ता-दिंडोरी, जि. नाशिक वर्ग-2 अराजपत्रीत                                                         

▶️ *लाचेची मागणी-* 6000 

तडजोडी अंती 5000/₹

▶️ *लाच स्विकारली-* 5000/₹

▶️ *हस्तगत रक्कम-* 5000/-रु, 

▶️ *लाचेची मागणी -* ता. 30/07/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 31/07/2021

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिला त्याचे बक्षीस म्हणून यातील आलोसे यांनी तक्रार दार यांचेकडे दि.30/07/2021 रोजी रुपये 6000/- लाचेची मागणी करुन , तडजोडी अंती रु.5,000/लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम दि. 31/07/2021 रोजी अंबिका सुपर मार्केट, मेरी लींक रोड ,नाशिक समोर स्विकारली. म्हणून .                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी-* पोनि. साधना भोये-बेलगावकर , ला.प्र.वि नाशिक 

▶️ **सह सापळा अधिकारी -* * उज्ज्वलकुमार व्ही पाटील पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. नाशिक   

▶️ सापळा पथक - पो हवा. चंद्रशेखर मोरे , पो हवा प्रफुल माळी , पो ना एकनाथ बाविस्कर, लाप्रवि नाशिक            

▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 

३) मा.श्री सतीश भामरे 

पोलीस उप अधीक्षक -वाचक लाप्रवि नाशिक

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. अप्पर आयुक्त आदिवासी विकास, नाशिक विभाग , नाशिक.                                                                        

--------------------------------------



*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================



" यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधील आमदारांना राखीव असलेली सीट कायमची रिकामी दिसणार".....

 


  • सरकारने आता बसमध्ये सिटवर लिहलेला "आमदारांसाठी राखीव" हा शब्द कायमचा काढून टाकला तरी चालेल......

सोलापूर,दि 31 जुलै 2021 : एसटी महामंडळाच्या बसमध्ये समोरील काही सीट्स महिलांसाठी व आमदारांसाठी राखीव असतात... आमदारांसाठी राखीव असलेल्या सिट्सचा वापर सुरवातीला काही आमदारांकडून होत होता परंतु भ्रष्टाचाराने काळ्या झालेल्या हातात जसजसा पैसा जमत गेला तसतसा त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट च्या वापराऐवजी आपले स्वतः चे वाहन ( कार) वापरणे योग्य समजले.... परंतु एक व्यक्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा होता.... आमदारांपैकी एसटी बसचा उपयोग सर्वात जास्त महाराष्ट्रात च नाही तर देश पातळीवर जर कोणी केला असेल तर तो म्हणजे गणपतराव देशमुख यांनी.... म्हणून

आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील हा सर्वात बोलका फोटो....

म्हणून त्यांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा तसेच सार्वजनिक जीवनात नीतिमत्ता हाच आदर्श मानणारा लोकप्रतिनिधी पडद्याआड गेला आहे. ....राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा मार्गदर्शक दीपस्तंभ अंधारात नाहीसा झाला आहे. सतत अकरा (११) वेळा निवडणूक जिंकणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा यांचे नाव कायम स्मरणात राहील....  

या कोलांटउड्याच्या जगात आबांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा याला केव्हांच गालबोट लागू दिले नाही..... यशवंतराव चव्हाण नंतर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीतला सुसंस्कृत चेहरा म्हणून गणपतराव एकमेव आहेत.... 

 आबांना भावपूर्ण श्रद्धांजली

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला ! माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली

 


मुंबई, दि. ३० जुलै २०२१

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती.

आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. 1995 साली आमदार शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 पर्यंत आमदार म्हणून काम केेले. 2019 ची निवडणूक त्यांनी न लढवता, नातू डाॅ.निकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. परंतु शहाजी बापू पाटील यांच्याकडून अनिकेत यांचा पराभव झाला.

रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.

गणपतराव देशमुख यांची कारकीर्द एक दृष्टिक्षेप

शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे 11 वेळा प्रतिनिधित्व

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर केले काम

गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी नामवंत वकील म्हणून सांगोला परिसरात सुपरिचित होते.

1962 साली देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना तुरुंगवास भोगावा लागला.

1972 च्या निवडणुकीमध्ये गणपतरावांना सांगोल्याचे सध्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दोनच वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले.

1977 साली गणपतरावांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पद सांभाळले

1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले आणि 1999 ला गणपतरावांची काँग्रेसच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली

2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली गणपतरावांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली.

एसटी बस ने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपतराव लोकप्रिय होते.


शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे - राज्यपाल

ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक. राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे- अशोक चव्हाण 

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते #गणपतराव_देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक जेष्ठ नेत्रूत्व हरपले आहे. शेत मजूर, कष्टकरी या वर्गासाठी त्यांनी केलेले काम हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय असे आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली- एकनाथ खडसे

Popular posts लोकप्रिय पोस्ट