पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २८ फेब्रुवारी २०२१

इमेज
 बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार मुंबई (दि. २८ फेब्रुवारी) : बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रति बालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान १ हजार २२५ रुपये इतके होईल.  …या बालकांना लाभ बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ, ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व संकटग्रस्त कुटुंबातील बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणामुळे विघटित झालेली बालके, एकपालक कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्हीग्रस्त/बाधीत बालके, तीव्र मतिमंद, एकाधिक अपंगत्व असलेली बालके, दोन्ही पालक अपंग आहेत, न्यायालीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणा...

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार सीताराम कुंटे यांनी स्वीकारला

इमेज
  मुंबई , (दि .  28 फेब्रुवारी) :   राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले श्री. कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. ...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राठोड यांची वनमंत्रिपदाची खुर्ची गेली-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा

इमेज
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई (२८ फेब्रुवारी) : संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घऊन त्यांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, असं संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं आहे. या प्रकरणात राजकारण करण्यात आलं ते लोकशाहीच्या विरोधात आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलंय. पूजाच्या मृत्यू प्रकरणी विरोधीपक्षांनी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण केलं आहे, असा आरोप राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, तसंच या प्रकरणी 19 दिवस एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच नाव आल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकार आणि शिवसेनेवरही विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. संजय राठोड यांच्याबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी 24 फेब्रुवारी रोजी एक बैठकही पार पडली होती. या बैठक...

गडग्याचे वादग्रस्त निलंबित ग्रामसेवक एम ए पठाण यांच्यावर लाखोंच्या अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

इमेज
गडगा ठरले तब्बल अर्धा डझन भ्रष्ट ग्रामसेवकांची हजेरी लागलेले गाव नायगाव (दि २६ फेब्रुवारी) : गडगा ग्राम पंचायतीचे निलंबीत वादग्रस्त ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी आपल्या नोकरीच्या काळात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील तब्बल १७ लाखांहुन अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे,गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई या पूर्वीच केली असली तरी सदरचे प्रकरण विधानसभेत पोहचल्याने या भ्रष्ट ग्रामसेवकाविरुद्ध संबधित विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे यांच्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी च्या रात्री उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाआहे.             मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायतीत सरपंच पुत्र व ग्रामसेवकांने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. येथे आलेल्या प्रत्येक ग्रामसेवकाने गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला होता . त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झालेआहेत.तर आता सहाव्या क्रमांकाचे ग्रामसेवक एम.ए.पठाण ...

नादुरुस्त तिकिट मशिन ने घेतला वाहकाचा जीव; बदनामी च्या भीती ने माहूर आगाराच्या वाहकाची आत्महत्या-वाहकावरील अन्याय दूर करण्यासाठी लिहली सुसाईड नोट!

इमेज
  नांदेड (२६ फेब्रुवारी) : माहुर आगारातील एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त असल्याने तपासणीत कार्यवाही ला सामोरे जावे लागेल,त्यात आपली नाहक बदनामी होईल या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज दिनांक २६ रोजी सकाळी एसटी बस मध्ये आत्महत्या केली. वाहकाच्या आत्महत्येला रापम प्रशासन जबाबदार असल्याचे सुसाईट नोट मध्ये नमूद असल्याने मानसिक छळ करणारे ते अधिकारी कोन हे पोलिस तपासात समोर येणार असले तरी नादुरुस्त तिकिट मशिन मुळे संजय संभाजी जाणकार (४९) या वाहकाला आपला जीव गमवावा लागला आहे. माहूर आगारात वाहक म्हणून कार्यरत संजय संभाजी जाणकार (४९) यांनी दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २६ शुक्रवार रोजी उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस. टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे,प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी ...

मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून १४ पुस्तकांचे प्रकाशन

इमेज
मराठी भाषा गौरव दिन   प्रकाशन by   संजय चिखलेे     फेब्रुवारी 26, 2021   मुंबई, (दि 26 फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये श्रीमती मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङमयातील खंड पहिला मंडळाने गतवर्षी प्रकाशित केला असून यावर्षी दुसरा खंड ग्रंथरुपाने मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीप...

पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक रामदासीला ३ हजारची लाच घेताना एसीबी पथकाने पकडले

इमेज
कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी प्रकरण  प्रेस नोट :: दिनांक :- 26.02.2021. पाटबंधारे विभाग जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी यांना 3,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले. आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं ।2 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग - 3) गुन्हा घ ता व ठिकाण : दि- 26.02.2021 रोजी अंबड चौफुली चहाचे हॉटेलवर जालना येथे लाचेची रक्कम : 3,000/- रुपये. याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, ते पाटबंधारे उपविभाग, अंबड येथे कार्यरत असुन त्यांनी त्यांचे भविष्य निर्वाह निधीतुन रक्कम मंजुर करण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास कनिष्ठ लिपीक श्री. ...

ब्रेकिंग लाच प्रकरण : तहसिलचा अभिलेख कक्षपाल(स्टोअर किपर) फेरफार उतारा नक्कल देण्यासाठी ३००रु लाच स्वीकारताना चतुर्भुज

इमेज
 प्रेसनोट दिनांक २४/०२/२०२१ शिर्षक :- श्री.महेश्वर नारायण बडेकर, अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर) यांनी ८००/- रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती ३००/- रुपये स्विकारले प्रकरणी गुन्हा दाखल. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग :पुणे परिक्षेत्र,सातारा युनिट गुन्हा नोंद क्रमांक :कराड शहर पो.स्टे. गु.र.नं.१३५/२०२१ कलम :भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे आरोपीचे नाव व कार्यालय :लोकसेवक महेश्वर नारायण बडेकर, ४६ वर्षे, अभिलेख कक्षापाल तहसिलदार कार्यालय कराड रा. शिवशक्ती निावास शास्त्रीनगर मलकापूर कराड वर्ग-३ महसूल खाते मागणी केलेली लाचेची रक्कम :८००/- स्विकारलेली लाचेची रक्कम :३००/- थोडक्यात माहिती : तक्रारदार यांच्याकडे त्यांचे फरफार उता-याची नक्कल देण्यासाठी ८००/- रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती ५००/- रुपये दि.२२/०२/२१ रोजों स्विकारले तसेच सापळा कारवाई दरम्यान दि.२३/०२/२०२१ रोजी ३०० रूपये उर्वरीत लाच रक्कम स्विकारुन वैध परिश्रमिकाहुन अन्य पारितोषण म्हणून आर्थिक फायदा मिळविला म्हणुन त्याचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्र...

ब्रेकिंग लाच प्रकरण : जगाच्या पोशिंद्याच्या वाटणी पत्रकाद्वारे फेरफार लावण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी ४ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

इमेज
  प्रेस नोट :: दिनांक :- 26.02.2021. तहसिल कार्यालय अंबड जि.जालना अंतर्गत जामखेड विभागाचे मंडळ अधिकारी श्री. श्रीपाद गंगाधर मोताळे,वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी,महसूल विभाग जामखेड, तहसिल कार्यालय अंबड जि.जालना. रा.देऊळगाव राजा जि.बुलढाणा.हृ.मु.समर्थ नगर प्लॉट क्र.2.3A जिल्हा परीषदच्या पाठीमागे जुना जालना यास 4,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना च्या पथकाने पकडले. 1) आरोपीचे नाच,हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री.श्रीपाद गंगाधर मोताळे, वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी,महसुल विभाग जामखेड, तहसील कार्यालय अंबड,जि.जालना. 2) गुन्हा घडला तारीख व ठिकाण : दिनांक 26.02.2021 रोजी जयभद्रा किराणा स्टोअरचे दुकाण पाचोड, जि.औरंगाबाद, 3) लाचेची रक्कम : 4,000/- रुपये. याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 26.02.2021 रोजी तक्रार दिली की, मौजे डोणगाव शिवार ता.अंबड जि.जालना येथेली गट क्र.33 मधील शेत जरमीनीचा वाटणीपत्राच्या आधारे फेरफार झाला असुन सदर शेतजमीनीचे क्षेत्र विभाणी करण्यासाठी महसूल अधिनियम 1966 कलम प्रमाणे क्षेत्र विभागणी करुन देण्यासाठी दिनांक ...

ब्रेकिंग लाच प्रकरणी कारावास : भुमी अभिलेखच्या लिपिकास १० हजारांच्या लाच प्रकरणी ३ वर्षे सक्त मजूरी,१० हजार दंड

इमेज
लाचखोरी प्रकरणी कारावास Respected Sir,  Good Afternoon,  *Conviction Report*     Satara Unit ➡ दिनांक-२६/०२/२०२१ ➡ स्पे.केस नं. ०५/२०१५ ➡ पो.स्टे. :- वाई पोलीस स्टेशन      ➡ गु.र.नं. :- २७/२०१४ ➡ आलोसे :- कृष्णात यशवंत मुळीक,  वय-४७ वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भुमी अभिलेख वाई, रा.प्लॉट नं.१६, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई, ता.वाई जि. सातारा, वर्ग-३, खाते - मोजणी खाते.                                    ➡लाच मागणी रक्कम :- १२,०००/-                          ➡लाच स्विकारली रक्कम :- १०,०००/- ➡कोर्ट :- श्री.एन.एल.मोरे, विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, सातारा. ➡ तपासी अधि. :-   १) श्री. श्रीहरी पाटील, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, २) श्री.बयाजी कुरळे, तत्कालीन पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा ➡️ पैरवी अधिकारी :- श्री. अशोक शिर्के, पोलीस उप अधीक्षक,पो हवा. काटवटे ...

स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ संचलित सी आय एस बी कंपनीचा सुपरवायजर १९०० रु.लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  नांदेड (२५ फेब्रुवारी)    लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : नांदेड   गुन्हा नोंद क्रमांक व कलम : पोलीस स्टेशन वजीराबाद जिल्हा नांदेड गुन्हा र.नं. 063/2021 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम संशोधन 2018  आरोपी चे संपूर्ण नाव पद व नेमणुकीचे ठिकाण : आनंद मारोतराव हंबर्डे 28 वर्ष व्यवसाय सुपरवायझर सी आय एस बी कंपनी औरंगाबाद द्वारा स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड राहणार विष्णुपुरी नांदेड  आरोपीचे खाते व वर्ग : उच्च शिक्षण विभाग  मागणी केलेली रक्कम : 1900 रुपये मागणी केली  स्वीकारलेल्या स्वीकारलेली लाचेची रक्कम : 1900 रुपये स्वतः स्वीकारले. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत : यातील अलोसे यांनी तक्रारदार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचलित कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणारे तक्रारदार यांना कामावरून काढून न टाकण्यासाठी 1900 रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्...

अमेरिका करणार भ्रष्टाचारविरोधी योद्ध्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांचा सन्मान

इमेज
  भ्रष्टाचारविरोधी योद्ध्या भारद्वाज  वॉशिंग्टन (२५ फेब्रुवारी) : बायडेन प्रशासनाने नव्याने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी पुरस्कारासाठी १२ योद्ध्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी या मुद्द्यांवर काम करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांचा समावेश आहे.  दोन दशकांहून अधिक काळ भारद्वाज यांनी भारतामध्ये माहिती अधिकार चळवळीच्या सक्रिय सदस्य म्हणून कार्य केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले. ‘ही मान्यता महत्त्वपूर्ण आहे. यामुळे देशात सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना लक्ष्य केले जात असताना, चळवळीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भारद्वाज यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुधवारी व्यक्त केली. भारद्वाज ‘सजग नागरिक संघटने’च्या संस्थापक आहेत. हा पुरस्कार म्हणजे पारदर्शकतेसाठी काम करणारी उत्साहपूर्ण चळवळ आणि देशभरात माहिती अधिकारांचा व्यापक वापर याला मान्यता आहे, असेही त्या म्हणाल्या. केवळ वचनबद्ध लोकांसोबत एकत्र काम करून आम्ही यशस्वी होऊ, यामध्ये भ्रष्टाचारविरोधात प्रयत्न ...

ग्रामीण भागात ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

इमेज
  • ग्रामीण भागातील बांधकामांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागाचा निर्णय बांधकाम परवानगीसाठी शाखा अभियंत्यांना देणार अधिकार मुंबई, दि.२५ :  राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागणार असून आवश्यक विकास शुल्क भरावे लागेल. ही पूर्तता केल्यानंतर ग्रामस्थास थेट बांधकाम सुरु करता येईल. या मर्यादेतील बांधकामास ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची (commencement certificate) आवश्यकता लागणार नाही. तर १,६०० ते ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाने युनिफाईड डिसीआरनुसार बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचा...

महाआवास अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ_ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

इमेज
  मुंबई (२३ फेब्रुवारी) : राज्यात 1 एप्रिल २०२० पासून आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील ३ लाख ३७ हजार ९७८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून २ लाख ९८ हजार ०९७ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार ०३० घरकुले बांधून पूर्ण झाली असून उर्वरीत घरकुले 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाआवास अभियानास 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथे केली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, घरकुलविषयक सर्व योजना ह्या ग्रामीण भागातील गरीब, बेघर यांना दिलासा देणाऱ्या आणि घरकुलाचे त्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनांसाठी काम करणे हे एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे घरकुलविषयक सर्व योजनांची जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण गरीब, बेघरांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जागा उपलब्ध नसल्यामुळे राज्या...