पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेजबाबदार असलेल्या व्यक्तींची न्यायाधिश सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर नेमणूक होतेच कशी???

इमेज
  संपादक संजय चिखले मुंबई,दि २९/०७/२०२४ :- "कनिष्ठ न्यायालयांचे अनेक न्यायाधीश महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये जामीन न देता सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा खटल्यांमध्ये जामीन अर्जावर विचार करताना सामान्य व्यवहारी ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे." असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी बंगळूर येथे "तुलनात्मक समानता आणि भेदभाव" या विषयावर बर्कले केंद्रीत ११ व्या वार्षिक परिषदेत न्या. चंद्रचूड यांनी मुख्य भाषण करताना आपली मते मांडली. ते म्हणाले की, "जेथे कनिष्ठ न्यायालयांमध्ये जामीन मिळायला हवा, तेथे तो नाकारला जातो. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात जावे लागते. ज्यांना उच्च न्यायालयात जामीन मिळायला हवा होता, तेथे न मिळाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. " या विलंबामुळे त्यांना मनमानी पणे अटक होते आणि समस्या वाढतात, याकडे न्या. चंद्रचूड यांनी लक्ष वेधले असलेल्याची दैनिक लोकसत्ता मध्ये दिनांक २९.०७.२०२४ रोजीची बातमी नुकतीच माझ्या वाचण्यात आली."  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रचूड यांना सामान्य ज्ञा...

नायगावच्या SBI,BOI शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या खात्याचे अनधिकृत होल्ड लवकरात लवकर काढावे अन्यथा...नायगाव युवक काँग्रेसचा इशारा

इमेज
  संपादक संजय चिखले नायगाव बा,दि.२७/०७/२०२४ : नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात स्टेट बँक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया या बँकेत खाते असून,या खात्याला शाखा व्यवस्थापकांनी कुठलीही पुर्व सुचना न देता, मोबाईल वर बॅंकेकडून साधा टेक्स्ट मेसेज पाठवण्याची तसदी न घेता होल्ड केल्यामुळे खातेधारक शेतकऱ्यांना विविध कामाकरीता आर्थीक व्यवहार करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई जमा रक्कम, पी.एम.किसान योजनेचा खात्यात जमा झालेला हप्ता, दुष्काळी अनुदानाची रक्कम उचलता येत नसल्याने तालुक्यातील पिक कर्ज घेतलेल्या जवळपास सर्वच शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होत आहे. सदरील शेकऱ्यांचे शासनाकडून बँक खात्यास होल्ड करण्यात यावे असे कोणते शासन निर्णय असल्यास त्याचा अहवाल शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात द्यावा. तसेच शेतकऱ्याचे लकवरात लवकर बँक खात्याचे होल्ड काढण्यात यावे.जेणे करून शेतकऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यास गैरसोय होणार नाही. अन्यथा बैंक खात्यांचे होल्ड नकाढल्यास गांधी गिरी पध्दतीने यूवक कॉग्रेस तालुका नायगांवच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन सदरील बँकेस कुलूप ला...