🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

नायगाव विधानसभेच्या आमदाराचे माहेर घर भाजपा तर दिलेले घर रिपाई...नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन उमेदवार बिरोध ! माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणतात खेल और बाकी है

माधव पवार

नायगाव/रुई प्रतिनिधी : राज्यातले राजकारण असो की जिल्ह्यासह तालुक्याचे राजकारण असो राजकीय वर्तुगळात कोणत्या पक्षाचा खेळखंडोबा होईल हे निश्चित नसते परंतु नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीचे लक्ष लागून असलेल्या नायागांव नगरपंचायत निवडणूकीत एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले असून या निवडणूकी दरम्यान भाजपाचे तीन उमेदवार उडून काँग्रेस पक्षाच्या  घर्ट्यात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाचे तीन बिनविरोध निघाल्याने नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी विद्यमान आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण ये तो सुरुवात है और खेल तो बाकी है अशी प्रतिक्रिया देत म्हणाले की नायागांवच्या आमदाराचे भाजपा माहेर घर तर दिलेले रिपाईचे घर असल्यामुळे आमदार राजेश पवारची बोलती बंद झाली आहे
जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायत निवडणुकीची रचना १७ वार्डाची असल्यामुळे येथील तीन वार्डाची निवडणूक ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे १४ वार्डाचे मतदान होणार होते परंतु निवडणुकीचा रंग भरण्या पूर्वीच भाजपा रिपाईच्या आमदाराचे तीन उमेदवार भाजपाचे घरटे गळू लागल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या घर्ट्यात उडाले आता राहिला प्रश्न दहा उमदेवाराचा कोणत्या ही परिस्थितीत काबीज करून दाखविणार असल्याचे वसंतराव चव्हाण यांनी सांगितले असून एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन भाजपा उमेदवाराचे बीफार्म असताना सुद्धा काँग्रेसच्या गळाला लागले असल्यामुळे नायगावचे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार मात्र निवडणुकीचा रणसंग्राम लढाविण्या ऐवजी खंडोबाच्या यात्रेत डफ व तुणतुणं वाजविण्यात तलीन झाल्याचे दिसून आले आहे
नायगाव विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पवार यांना सदरच्या निवडणुकीत शेकडो कार्यकर्त्यानी जीवाची पर्वा न करता अंदाजे सत्तर हजाराच्या मतांधिक्यानी निवडून आणले होते सदरच्या आमदारानी विकासाचा आराखडा तयार न करता वेगवेगळ्या कलेत कधी डफ तर तुणतुणं वाजवून नायगाव नगरपंचायतच्या निवडणूकीकडे खुशाल दुर्लक्ष केल्यामुळे भाजपाचे तीन उमदेवार काँग्रेसच्या गळाला लागले असल्यामुळे आमदार राजेश पवार यांचे नेतृत्व संपूष्ठात येत असल्याची चर्चा आता नायागांव मतदार सांगत चांगलीच रंगली असून असली तरी नायगावच्या नगर पंचायतच्या निवडणुकीकडे लक्ष घालणार कोण असा प्रश्न पडला असला तरी भाजपाच्या नेते मंडळीचे लक्ष उमेदवाराच्या विजयाकडे नसल्यामुळे उमदेवार स्वतःच्या  कर्तृत्वासह त्यांच्या बळावर निवडून येणार का असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव मतदार संघात भाजपाची फळी मजबूत नसल्यामुळे व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याना बाजूला सारून आपले वजन राजकीय वर्तुळात टिकून राहण्याचा हेतू आमदार राजेश पवार यांचा असल्यामुळे आमदाराच्या नेतृत्वाला धुडकावू भाजपाचे तीन उमदेवार काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाकडे धडकले असल्यामुळे नायगाव तालुक्यात भाजपाची खुलेआम पोकळी निर्माण झाल्याचे सरळ सरळ नायगावच्या नगरपंचायतच्या निवडणूकीं वरून दिसून येत असले तरी 
नायगाव मतदार संघातील भाजपाचे दोन आमदार, दिग्गज स्थानिक चार नेते त्यात राजेश देशमुख कुंटूरकर, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार यासह जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य माणिकराव लोहगावे, सौ पुनम राजेश पवार यांनी मात्र निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा हातात घेतली नसल्यामुळे भाजपावर मात काँग्रेस पक्ष करील असे संकेत असल्याचे ही दिसून येत आहे

Popular posts लोकप्रिय पोस्ट