🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, ऑगस्ट ०४, २०२१

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची–माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे



औरंगाबाद, दिनांक ४ जुलै २०२१ – अवतीभवतीच्या घटनांचे वृत्तांकन संतुलीत आणि तटस्थपणे करण्याची खबरदारी पत्रकारांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशनच्या वृत्त व जनसंवाद महाविद्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, औरंगाबाद विभागाचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


महासंवाद

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची – महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

Team DGIPR by Team DGIPR ऑगस्ट 4, 2021 1 min read

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची – महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

औरंगाबाद, दिनांक ४ (जिमाका) – अवतीभवतीच्या घटनांचे वृत्तांकन संतुलीत आणि तटस्थपणे करण्याची खबरदारी पत्रकारांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशनच्या वृत्त व जनसंवाद महाविद्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, औरंगाबाद विभागाचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पत्रकारितेकडे व्रत आणि व्यवसाय या दोन स्वतंत्र दृष्टीकोनातून बघताना स्वातंत्र्य लढ्यात अनेक राजकीय नेत्यांनी, समाज सुधारकांनी तत्कालीन नियतकालिके, साप्ताहिके यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची, स्वातंत्र्य लढ्याची महत्त्वाची कामगिरी बजावलेली बघायला मिळते. त्या पत्रकारितेत काळाच्या ओघात झालेले लक्षणीय बदल सांगून श्री. पांढरपट्टे यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या बाबी एकमेकांशी निगडीत असून पूर्वीच्या काळात प्रसार माध्यमांची आज इतकी संख्या नव्हती. रेडिओ, दूरदर्शन, अन्य माध्यमेही त्यावेळी नव्हती. अशा काळात नियतकालिक, साप्ताहिक चालवणे, व्रत म्हणून पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक होते. अशा काळातही दर्जेदार वृत्तपत्र, नियतकालिके काढल्या गेली. त्या परंपरेतून आजच्या युवा पिढीने बोध घेत संतुलित, वस्तूनिष्ठपणे वृत्तांकन करण्याची खबरदारी आवर्जून घेतली पाहिजे. कारण आज माध्यमांच्या ‘सर्वात आधी’ या चढाओढीत अनेकदा वस्तूस्थितीची पडताळणी न करता वृत्तांकन केल्या जाते. अशा प्रकारच्या घडलेल्या घटनांची शहानिशा न करता वृत्तांकन करणे हे संबंधिताच्या तसेच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे, याचे गांभिर्य लक्षात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी पत्रकाराने बाळगणे आवश्यक असल्याचे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले


त्याचप्रमाणे वैयक्तिक मत, पूर्वग्रह यापासून अलिप्त राहुन तटस्थपणे संतुलित पत्रकारिता करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी पत्रकाराने बहुश्रुत आणि व्यासंगी असले पाहिजे. त्यादृष्टीने विविध विषयांची माहिती, सातत्यपूर्ण वाचन, चिंतन, सभोवतालचे अद्ययावत ज्ञान ठेवणे या सवयी जाणीवपुर्वक जोपासल्या गेल्या पाहिजेत. यातून घटना घडामोडींकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टीकोन तयार होतो.

निर्भिडता हा पत्रकारीतेचा स्थायी भाव असून कोरोना काळातही पत्रकारांनी निर्भिडतेने घराबाहेर पडून काम केल्याचे बघायला मिळालेले आहे. या क्षेत्राची बलस्थाने लक्षात घेऊन पत्रकारीतेच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने आपला अभ्यास वाढवण्याचे सांगून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यपद्धतीबाबत डॉ. पांढरपट्टे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.


Tags: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

कला ही उपजत अशी देणगी ! तरीही तिला वृद्धींगत करण्याचे परिश्रम मात्र...

 


कला

       कला ही उपजत अशी देणगी आहे. तरीही तिला वृद्धींगत करण्याचे परिश्रम मात्र आपल्यालाच घ्यावे लागतात. आपण कलेमुळे जीवनात एक वेगळाच आनंद उपभोगत असतो. बरेचदा आपण म्हणतो, कलेला मोल नाही म्हणजे ती अनमोल आहे की मातीमोल आहे. अर्थात अनमोल आहे.हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे. आपल्या अंगी असलेली कला आपल्याला शोधावी लागेल. बऱ्याचदा असा अनुभव येतो की काही कलेत घराणेशाही दिसून येते. जसे संगीत, नृत्य, गायन, वादन, चित्रकला या कला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतात. पण प्रत्येक वेळी असं घडतंच असं नाही. खाणीत हिरा सापडतो तसच एखाद्या गरीबाच्या झोपडीत एखादा गायक सापडतो.आपले मित्र-मैत्रिणी, आई-वडील, आपले आप्त, आपल्या संबंधात येणाऱ्या व्यक्ती आपल्यातील कलेला जाणून असतात. आपल्या आई-वडिलांचा आपल्या कलेला वाढवण्यासाठी विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. कधी परिस्थितीने म्हणा किंवा संधी मिळाली नाही म्हणून म्हणा एखाद्याला कला असूनही त्या कलेला पुढे नेण्याचा मार्ग सापडत नाही. पण तरीही आपण आपली कला जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज स्पर्धेचे युग आहे.प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर हवा.त्यात कला कुठेतरी हरवली जाते. 

     कला पैशाने विकत घेता येत नाही. कलेतून खूप मोठा फायदा मिळाला नाही, तरी नुकसान नाही. काहींच्या जीवनात कलेतून मिळणारा आनंद मात्र पैशापेक्षा मोठा असेल. नृत्य, गायन, वादन, क्रीडा, चित्र इत्यादी या कला प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात असतात. आपल्यातील कला ओळखून आपणच त्या कलेसाठी श्रम घ्यावे लागतात. आज तांत्रिक साधने वाढली. तुम्हाला जरी गुरु करता आला नाही. तरी यूट्यूब च्या माध्यमातून, व्हाट्सअपच्या माध्यमातून, दुरदर्शन, मित्र परिवाराच्या माध्यमातून, अचानक एखादी व्यक्ती, एखादी कल्पना, एखादा प्रयत्न तुम्हाला एक संधी पुरवत असते. तुम्ही जरी गुरुगृही राहून शिकला नाही तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नातून शिकू शकता. आपल्याला मिळालेल्या फावल्या वेळात आपण गप्पा मारतो, टीव्ही बघतो, फिरायला जातो. त्याच फावल्या वेळेचा योग्य वापर करून आपण आपल्या अंगी असलेली कला जोपासली तर नक्कीच आपल्याला आनंद मिळेल. कधीतरी असेही घडेल तुमच्यातील कला तुमच्या घरातील लोकांना, मित्र परिवाराला स्तुतीचा विषय होणार नाही, परखड शब्दांत एखादा अभिप्राय देईल. पण, तुम्ही त्यांची स्तुती तुम्हाला मिळेल म्हणून कलेची जोपासना करू नका. तर तुमचा आनंद, समाधान म्हणून कलेची जोपासना करा.   

       नक्कीच ती कला पुढे जाईल आणि त्या कलेतून तुम्ही इतरांना काहीतरी देऊ शकाल.तुम्ही केलेली एखादी कृती जी कला आहे पण तुम्हाला हवे ते प्रोत्साहन मिळाले नाही म्हणून तुम्ही त्याला अपयश मानू नका. तर तुमच्या प्रयत्नात कुठेतरी कमी होता असा विचार करून तुम्ही प्रयत्न करत रहा. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. या प्रयत्नांच्या कालावधीतही तुम्हाला एक आत्मिक आनंद मिळतो.तुम्ही कोणाला जरी सांगू शकला नाही तरी तो तुमच्या पर्यंत पोहोचत असतो.नक्कीच कला अनमोल आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कलेला मोल देत आहोत, त्याप्रमाणे इतरांच्या कलेचा ही विचार केला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला क्रीडाविषयक, संगीताविषयी, माहिती नसते , आवड नसते.तरीही एखाद्याच्या कलेला पाहून आपल्याला त्यातील गुणवत्ता काही प्रमाणात तरी समजते. आपण नक्कीच त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एखादे गाणे आपल्या मनाला भावले तर भरभरून दाद दिली पाहिजे.चूका आणि शिका हे खरे आहे.तरी चूका दाखवून दुखवण्यापेक्षा त्यातील प्रयत्न, सौंदर्य शोधा त्याला नवी झळाळी द्या.

      आज ऑलम्पिक सामने सुरू आहेत.ऑलंम्पिक सामन्यात चढाओढ लागलेली आहे.आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याची.आपल्या देशासाठी आपण एक गौरवास्पद पाऊल उचलणार त्याचा आनंद काही वेगळाच आहे. त्यासाठी आज ज्या खेळाडूंनी आपले तन-मन-धन अर्पण केले आहे. त्यांचे आपण प्रेरक होऊ शकतो.खेळावर त्यांनी आपले मन एकाग्र केले आहे.आपण जरी खेळू शकलो नाही, तरी त्यांना प्रोत्साहन मात्र देऊ शकतो. दुसऱ्याला प्रोत्साहन देणे ही एक मोठी कला आहे.या प्रेरणेच्या बळावर अगदी एखाद्या लहान खेडेगावातला मुलगा, मुलगी पुढे येतात आणि आपल्या देशाचा गौरव होतात.

         भारताच्या प्रगतीला शोभिवंत करणा- या सर्व कला रसिकांना खू‌प खूप शुभेच्छा.


डॉ.सौ.शुभांगी गादेगावकर

मीरा रोड, जिल्हा-ठाणे

Popular posts लोकप्रिय पोस्ट