🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, जुलै १६, २०२१

लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन



  • नांदेड जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या धडक कारवाईने शिक्षकांमध्ये एकच खळबळ
  • भोकर तालुक्यातील पाच  शिक्षक तडकाफडकी निलंबीत 

नांदेड,दि. 16 जुलै 2021 

भोकर दि.16 जुलै(नांदेड न्यूज अपडेट):- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस  शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.

सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट देवून ही कार्यवाही केली आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना शाळेत 50 टक्‍के उपस्थिती अनिवार्य आहे. 50 टक्‍के प्रमाणे आज 19 शिक्षक उपस्थित राहणे आवश्‍यक होते. परंतु शाळा भेटी दरम्‍यान 5 शिक्षक अनुस्थित आढळून आल्‍यामुळे निलंबनाची कार्यवाही करण्‍यात आली आहे. तर एका शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्‍यात आली.

नियमानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यास पूर्ण करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीव्‍दारे तसेच शिक्षक मित्र उपक्रमातून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांपर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्‍यक आहे. याचे सर्व नियोजन शाळास्‍तरावर उपस्थित राहून शिक्षकांनी करणे आवश्‍यक आहे. परंतु येथील शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्‍याने सिईओंनी चांगलेच खडसावले.

शैक्षणिक गुणवत्‍ता वाढ अभिनांतर्गत मुलांची इंग्रजी व गणित विषयाची चांगली तयारी करुन घेण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच नव-नवे उपक्रम राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्ष लागवड, डिजीटल शाळा, रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी त्‍यांनी पालक व विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. दरम्‍यान जिल्‍हा परिषद हायस्‍कुल भोकर, बारड व शेंबोली येथे शाळांना भेटी दिल्‍या. तसेच बारड ग्राम पंचायत व शेंबोली येथील आरोग्‍य उपक्रेंद्रास त्‍यांनी भेट देवून संवाद साधला.

मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड, कें.प्रा.शा. बारड आणि शेंबोली वस्ती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी आज भेट दिली. जिल्हा परिषद प्रशाला बारड येथे शिक्षकांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली. नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. ऑनलाइन शिक्षण, सेतू अभ्यासक्रमा विषयी मुख्याध्यापिका श्रीमती तळणकर यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छ शाळा सुंदर शाळा करणे, बाला अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, भाषाविषयक जाणिवा वाढवणे, बोलक्या भिंती, रोपवाटिका, नर्सरी तयार करणे आदी बाबतीत सूचना केल्या. वस्ती शेंबोली येथील शाळेस त्यांनी भेट दिली. रूपाली कांबळे, कोमल लोमटे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. ओम नावाच्या विद्यार्थ्याला आई बाबा नाहीत. हा विद्यार्थी आजीकडे राहून शिक्षण घेतो. त्यासाठी आवश्यक सर्व मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.


तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांना दणका दिला आहे. भोकर येथील लेटलतीफ पाच गुरूजींना निलंबित केले. या कारवाईमुळे मात्र शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच शिक्षक शाळांच्या मैदानात हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून शाळांची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. त्यात प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी करणेही गरजेचे आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची ही संधी असून प्रत्येक शिक्षकांनी स्वयंस्फुर्तपणे विद्यार्जनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना भेट देवून तेथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाच शिक्षकांचे निलंबन 

भोकर तालुक्यात दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्केपेक्षाही कमी शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी तत्काळ पाच शिक्षकांचे निलंबन केले. या कारवाईमुळे लेटलतीफ शिक्षकांना चपराक बसणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट