🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, जुलै १९, २०२१

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे गावच्या पूर्व दिशेला असलेल्या ओढ्यावर पुल बांधण्याची नागरिकांची मागणी



नायगाव,दि 18 जुलै 2021 : तालुक्यातील मरवाळी येथे रविवारी सायंकाळी 3 वा पाऊस पडायला सुरुवात झाली.तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला.दोन तासाच्याच मुसळधार पावसाने गावच्या पुर्व दिशेला असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.सद्या शेतकरी शेतातील पिकांची निंदनी,कोळपणी करण्यात व्यस्थ आहेत.पाऊस पडणे कमी झाल्यानंतर शेतीच्या कामासाठी शेताकडे गेलेल्या शेतकरी,शेतमजूरांना हा ओढा पार करून घराकडे जावे लागले.ओढ्यातून जाताना लोकांना पूराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ओढ्याला कंबरेपर्यंत पूर आलेला होता,पूर ओसरल्याशिवाय लोकांना घराकडे जाणे शक्य झाले नाही.पूर ओसरल्यानंतर ही परिस्थिती आहे,तर पूर चालू असतानाचे चित्र कसे असेल याची कल्पना केलेलीच बरी.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी अजून या ओढ्यावर पुल बांधण्यात आलेला नाही.या ओढ्यावर पुल बांधण्यासाठी आतापर्यंतच्या सरपंचांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी केल्याची नोंद सापडत नाही तसेच जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार या पैकी कोणत्याही लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या या जटील समस्येकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही.

गावच्या पुर्व दिशेला शंभर घरांची वस्ती आहे,इथल्या लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी गावात जावे लागते,मोठा पाऊस पडल्यानंतर ओढ्याला पूर आल्यावर महिला लहान मुलांना कसरत करावी लागते,रात्रीच्या वेळी अंधारात या ओढ्यातून जाणे अशक्य आहे.वस्तीवरील लोकांचा गावाशी संपर्क होत नाही.रात्रीच्या वेळी लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.अशा परिस्थितीमध्ये सापांचीही भिती लोकांच्या मनात असते.

हा रस्ता कोपरा,मरवाळी तांडा मार्गे नरसी,तालुक्याचे ठिकाण असलेल्या नायगावला जातो,नायगाव जवळ पडत असल्यामुळे मोटरसायकल धारक जास्त करून याच रस्त्याचा वापर करतात तसेच धानोरा,मुगाव गावालापण हा रस्ता जोडला गेला आहे.विशेष म्हणजे कोपरा हे गाव मरवाळी ग्रामपंचायतीला जोडलेले असल्याने तेथील नागरिकांचा ग्रामपंचायतीशी संबंध येतो तसेच मरवाळी तांडा येथे शासन अनुदानित खाजगी प्राथमिक ते पोस्ट बेसिक आश्रम शाळा असल्याने शाळेसाठी मरवाळी येथील विद्यार्थी येत असतात अशा वेळी विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.तसेच मुगाव येथे प्राथमिक आरोग्य उप केंद्र आहे.मरवाळी हे गाव उप केंद्रांतर्गत येते.या उप केंद्राचा मरवाळीसाठी फारसा उपयोग होत नसला तरी गावात येणाऱ्या कर्मचा-यास मात्र पूराचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.

गावच्या उत्तर दिशेला पाझर तलाव आहे.हा तलाव आजून भरलेला नाही.पाझर तलाव भरून वाहू लागल्यावर दिवस रात्र या ओढ्याला पूर चालू असतो.पावसाळ्याचे चार महिने लोकांना नाईलाजास्तव अशाच परिस्थितीत काढावे लागतात.


दुसरा व्हिडिओ गावच्या पश्चिम दिशेला असलेल्या ओढ्याचा आहे,येथे ओढ्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते.पूराचे पाणी पुलावरुन वाहत असताना लोकं जीव मुठीत धरून जाताना दिसत आहेत.मरवाळी गावाच्या पश्चिम दिशेला सुद्धा शंभर घरांची वस्ती आहे तसेच या दिशेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील आहे.सद्याला शाळा सुरू झाली नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन पूर आल्यावर शाळकरी मुलांना शाळेत जाणे,शाळा सुटल्यावर घरी येणे जिकरीचे आहे.गावासाठी हायवेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.मुखेड,गडगा,मांजरम,नरसी,नायगावला जायचे असेल तर याच मार्गाने जावे लागते.गावक-यांसाठी ईकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली आहे.

गावच्या पुर्व दिशेला असलेल्या ओढ्यावर पुल बांधण्याची तसेच गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट