By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले मरवाळीकर
आज कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले व पडत आहेत परंतु समाजातील सर्व स्तरातील लोकांचा उपचार घेण्याचा कल हा खाजगी रूग्नालयाकडेच दिसतो हे वास्तव आहे. जवळ पैसा उपलब्ध नसला तरी कर्ज काढून उपचार हे खाजगी रूग्नालयामध्येच करण्याकडे लोकांचा कल आहे. यामागचे नेमके कारण काय हे तपासणे गरजेचे आहे. कारण खाजगी रूग्नालयामध्ये लाखो रुपये भरावे लागत असले तरी ती देण्याची तयारी गरीबातला गरीब दाखवतो परंतु पीएचडी झालेले डॉक्टर तेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी लोक धजत नाहीत ही विचार करण्यासारखी बाब आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी रूग्नालयातील एक डॉक्टर शेकडो पेशंट तपासत असतो नेमके त्याच्या उलट शासकीय रुग्णालयात एका पेशंटला शेकडो डाॅक्टर तपासू शकतात ! हे माहित असून सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाही. तसे पाहिले तर सामान्य नागरीकांसाठी शासकीय रुग्नालये ही एक वरदान आहेत कारण केसापासुन नखापर्य॔तचे सर्व स्पेशालिस्ट असणारे एकमेठ ठीकाण म्हणजे शासकीय रुग्नालये आहेत. विशेषता खाजगी रूग्नालयामध्ये एखाद्या रुग्णाला ऍडमिट करून घेऊन त्याचा उपचार हाताबाहेर गेल्यानंतर त्या रुग्णास शेवटी शासकीय रुग्णालयांमध्येच पाठवले जाते हेही वास्तव आहे. जर शेवटी त्या रुग्नाला शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागत असेल तर सुरुवातीलाच लोक शासकीय रुग्णालयात का जात नाहीत? नागरीकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सरकारी रुग्णालयात बहुतांश कधीच चुकीचे उपचार होत नाहीत त्याचे कारण असे की या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना असलेल्या भरमसाठ पगारी ! तुमचा चुकीचा उपचार करून एवढ्या मोठ्या पगारीची नोकरी अडचणीत आणणे हे त्यांनाही परवडणारे नाही यामुळे त्यांच्याकडून उपचाराला दिरंगाई होऊ शकते परंतु चुकीचे उपचार कदापिही होणार नाहीत तसेच रुग्णाला आवश्यक असेल त्याच प्रमाणामध्ये औषधाचा डोस दिला जातो याउलट खाजगी रुग्णालयामध्ये हाय डोस देऊन रुग्णाला उपचार दिले जातात ज्यामुळे रुग्णांची शारीरिक हानी होते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या खाजगी रुग्णालयामध्ये तुम्ही उपचार घेत आहात त्यातील किती रुग्णालयांना दहा वीस बेडची तरी मान्यता आहे का ? हे कधी तपासले का, तर नाही ! परंतु काही बाबीचा जर विचार केला तर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार व्यवस्थित मिळत नाही, या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना व्यवस्थित तपासत नाहीत, या रुग्णालयांमध्ये व्यवस्थीत औषधोपचार मिळत नाही अशी मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये पद्धतशीरपणे रुजवण्यात आली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की सरकारी रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचे त्याच गावांमध्ये असलेले स्वताचे खाजगी रुग्णालये , लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे केलेले सपशेल दुर्लक्ष ,आरोग्य यंञणे बाबतची लोकांची उदास मानसिकता अनेक कारणे असू शकतात. जर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ,समाज सेवेतील कार्यकर्त्यांनी, पत्रकार मंडळींनी याविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करून तसेच सरकारी रुग्णालयातील यंत्रणेवर देखरेख ठेवून जर वाटचाल केली तर निश्चित परिस्थिती बदलू शकते. सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लुटमार थांबू शकते. आज पर्यंत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी कधीच सरकारकडे प्रश्न लावून धरलेले दिसत नाहीत जे गरजेचे आहे यापुढील काळात तरी राजकीय कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामान्यांची लूटमार होऊ नये यासाठी सामान्य जनतेमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत जनजागृती करून यंत्रणा सुधारण्यासाठी व बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा