नायगाव,दि 19 एप्रिल : मांजरम येथील शेतकरी माधवराव बापूराव शिंदे पंढरपुरे यांच्या खोपिला रविवारी दुपारी आग लागली असून त्यांच्या खोपीत असलेले 2 हेक्टर चे ठिबक संच,एक तुषार संच, बैलगाडी व इतर शेती उपयोगी समान जळून खाक झाले आहे. सदर आग शर्टसर्किट ने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवाने शेतकरी गावाकडे गेल्याने व बैल झाडा खाली असल्याने जीवित हानी झाली नाही.
या बाबद अधिक वृत्त असे की मांजरम ता नायगाव येथील शेतकरी माधवराव शिंदे यांची शेती गावाच्या पश्चिम दिशेला आहे.त्यांच्या शेतात एक जनावरां साठी व शेती उपयोगी साहित्य ठेवण्या साठी एक खोपो होती या खोपी जवळून एमएसइबी ची लाईट गेली आहे. ती नादुरुस्त झाल्याने दुरुस्ती करून लाईट टाकल्या नंतर छिलगे उडाले व त्यातील एक खोपिवर पडून आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्या नंतर शेतकरी पुत्र दशरथ शिंदे यांनी तलाठी शहाणे यांना फोन केला,नंतर मंडळ अधिकारी पांडे यांना केला दोघांचे ही फोन बंद आल्याने तहसीलदार शिंदे यांना कळवले त्यांनी पंचनाम्याला तलाठी, मंडळाधिकारी यांना पाठवतो म्हंटले पण त्याच दिवशी पंचनामा न करता दुसऱ्या दिवशी सोमवारी तलाठी एस ए शहाणे यांनी पंचनामा केला.
आगीत ठिबक सिंचन साहित्य 120,000,तुषार संच 32 हजार,बैल गाडी 45 हजार, शेतीचे ऑजारे 45 हजार असे अडीच लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहेत.आगोदरच नापिकी व कोरोनाच्या संकटात शर्टसर्किट ची आग ही शेतकर्या साठी कर्दनकाळ ठरली आहे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा