🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, जानेवारी १३, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकरचे सुडबुद्धीचे राजकारण, माझ्याविरुद्धची कारवाई एकाधिकारशाही प्रमाणे-तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे

 


  • पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर माझा पुर्ण विश्वास; सुडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही

नायगाव,दि 12 जानेवारी 2021 : मी पक्षासाठी पूर्णवेळ काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण करणे आमचा कौटुंबिक पिंड नाही मी जिल्हाध्यक्ष पद मागितले हाचं माझा गुन्हा....! यासाठीचं जिल्हाध्यक्षाचा माझ्या विरोधात चाललेला अट्टाहास आहे...असे मत नरसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर पाटील भिलवंडे यांनी मांडले.

राष्ट्रवादीत अनेकजण आले आणि गेले पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी चे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराशी जुळवून 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पक्ष श्रेष्ठी कडून कसलीही अपेक्षा नं करता निरपेक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे.माझ्याबाबतीत पक्षाने काय आणि कसा निर्णय घेतला यांचा खुलासा माझ्या पर्यंत अजून पोहचला नाही. पण बातमीतील काही अपमानास्पद शब्द व वाक्य यामुळे मी पूर्णपणे दुखावलो आहे. यांचा खुलासा मी काही दिवसात पक्षश्रेष्ठींकडे देणारचं आहे. पण;माझ्यासारख्या पक्षाच्या पडतीच्या काळात पक्षाची ताकत स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांवर माझी कसलीचं भूमिका समजुन नं घेता टोकाचा निर्णय लादणे कुंठे तरी चुकीचे वाटते. मी तालुकाध्यक्ष असताना देखिल तालुक्यातील निर्णय जिल्हास्तरावरून घेऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचे कट कारस्थान करून माझ्या दुःखाच्या काळात मदती ऐवजी अडचणीत टाकण्याचा उद्योग कशासाठी? मला कळत नाही? जिल्हाध्यक्ष भोसीकर व वसंत सुगावे  यांच्याकडे वारंवार नायगाव नगरपंचयात निवडणूक लढवण्यासाठी वडिलांचा तेरावा झाल्या दुसऱ्या दिवशी बैठक लावून प्रयत्न केला. 

शिवाय नायगाव शहराध्यक्ष म्हणून संजय चव्हाण यांची निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष भोसीकर साहेब यांना पाठपुरावा केला. हे सोडून चार जिल्हापरिषद व एक नगरपालिका असणाऱ्या 89 गावाच्या तालुक्यात तीन सरचिटणीस एका नरसी गटातून परस्पर जिल्हाध्यक्षानी दिलें यामुळे आवश्यक तेथे दुर्लक्ष नको तेथे अधिकचा भरणा मला येथे अनंत अडचणी ही निर्माण झाल्या. युवक तालुकाध्यक्ष निवडीतील गोंधळ, नायगाव नगरपंचायत निवडणूकितील नकारात्मक भूमिका यामुळे जिल्हाध्यक्षांनी मला एकट्याला कारणीभूत ठरवून कार्यवाही करणे संयुक्तिक वाटत नाही ते ही चुकीचे बिनबुडाचे किळसवाणे आरोप अपेक्षीत नाहीत आम्ही ही पक्ष वाढीसाठी जीव ओतून येथे काम केले आहे त्याची जाणीव तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेला आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही.  यामुळेच माझा पक्ष श्रेष्ठी व पक्षाचे सर्वे सर्वा आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तेचं माझे बाबतीत योग्य निर्णय घेतील असा विचार नरसी येथील आयोजित पत्रकार परिषदेत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील भिलवंडे यांनी व्यंक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट