🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जुलै ३०, २०२५

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ-आरोग्यमंत्री

 

संजय पाटील चिखले

२९ जुलै २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न राहता, ती संपूर्ण समाजासाठी एक जागृती निर्माण करणारी जनचळवळ व्हावी, यासाठी माझा विशेष प्रयत्न आहे. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात ‘अवयवदान पंधरवडा’ राबवित असताना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, एक अवयव एखाद्या रुग्णालाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबालाही नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील भीती, शंका आणि गैरसमज दूर करून सकारात्मक मानसिकता निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम केवळ एक उपक्रम म्हणून न राबवता, ती एक भावनिक व सामाजिक बांधिलकी म्हणून घेतली जावी. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा, जेणेकरून त्यांचा समाजात आदर्श निर्माण होईल.

माझा विश्वास आहे की, जनतेच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र लवकरच अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श राज्य म्हणून पुढे येईल.

या बैठकीला राज्यमंत्री श्रीमती. मेघना साकोरे - बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला , उपसंचालक, डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.

@MeghnaBordikar

#Shivsena #Prakashabitkar #OrganDonation #DonateLife #SocialAwareness #BeanOrganDonor #MaharashtraHealthMission

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार


संजय पाटील चिखले

मुबई, दि. २९ : राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. शुक्ला यांच्यासह दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, अनेक रुग्ण आजही अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठराविक उद्दिष्ट ठेवून, गतीने आणि जनजागृतीवर भर देत काम करणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट रोजी अवयवदान करणारे तसेच लाभार्थी रुग्ण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा, त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात यावे आणि माध्यमांसमोर त्यांची मते मांडण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण, कार्यशाळा, नियोजनपूर्व सूचना यांच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आजपर्यंत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयव मिळवून देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत. अवयव दात्यांचा विश्वास मिळवून सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि काम गतिमान, परिणामकारक असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/



Popular posts लोकप्रिय पोस्ट