प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील
राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता
By संजय चिखले मरवाळीकर
नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे.
लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामीत्व हक्क योजनेअंतर्गत 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे , सनदचे ई वितरण होणार आहे .तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांची प्रधानमंत्री थोडक्यात संवाद साधतील.
स्वामित्व योजनेचे फायदे
अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे, सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील,मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी,कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, जमीनीशी संबंधित मतभेदाचे त्वरित निराकरण,मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ, गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळणार आहे. त्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000
संविधान अपनाने की 75वीं वर्षगांठ पर विशेष चर्चा में लोकसभा में माननीय प्रधानमंत्री जी के संबोधन के मूल पाठ से उद्धृत; 14 दिसंबर 2024@PMOIndia @narendramodi #ThankYouPM #SVAMITVA_Scheme #MeriSampattiMeraHaq #मेरी_संपत्ति_मेरा_हक #MoPR #PanchayatiRaj #SVAMITVA pic.twitter.com/50dbbbPhYb
— Ministry of Panchayati Raj, Government of India (@mopr_goi) December 26, 2024
#स्वामित्व_योजना ने ग्रामीण आबादी क्षेत्रों में भूमि संबंधी विवादों को उल्लेखनीय रूप से कम करने में महत्वपूर्ण सफलता प्राप्त की है।#ThankYouPM#SVAMITVA_Scheme #MeriSampattiMeraHaq#MeriSampattiMeraAdhikar #SVAMITVA #SVAMITVAScheme
— Ministry of Panchayati Raj, Government of India (@mopr_goi) December 26, 2024
Source Credit: @PrimeVideoIN @TheViralFever pic.twitter.com/nSbhOX9aUk
.jpeg)