🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जुलै ३०, २०२५

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ-आरोग्यमंत्री

 

संजय पाटील चिखले

२९ जुलै २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न राहता, ती संपूर्ण समाजासाठी एक जागृती निर्माण करणारी जनचळवळ व्हावी, यासाठी माझा विशेष प्रयत्न आहे. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात ‘अवयवदान पंधरवडा’ राबवित असताना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, एक अवयव एखाद्या रुग्णालाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबालाही नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील भीती, शंका आणि गैरसमज दूर करून सकारात्मक मानसिकता निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम केवळ एक उपक्रम म्हणून न राबवता, ती एक भावनिक व सामाजिक बांधिलकी म्हणून घेतली जावी. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा, जेणेकरून त्यांचा समाजात आदर्श निर्माण होईल.

माझा विश्वास आहे की, जनतेच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र लवकरच अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श राज्य म्हणून पुढे येईल.

या बैठकीला राज्यमंत्री श्रीमती. मेघना साकोरे - बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला , उपसंचालक, डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.

@MeghnaBordikar

#Shivsena #Prakashabitkar #OrganDonation #DonateLife #SocialAwareness #BeanOrganDonor #MaharashtraHealthMission

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार


संजय पाटील चिखले

मुबई, दि. २९ : राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. शुक्ला यांच्यासह दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, अनेक रुग्ण आजही अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठराविक उद्दिष्ट ठेवून, गतीने आणि जनजागृतीवर भर देत काम करणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट रोजी अवयवदान करणारे तसेच लाभार्थी रुग्ण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा, त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात यावे आणि माध्यमांसमोर त्यांची मते मांडण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण, कार्यशाळा, नियोजनपूर्व सूचना यांच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आजपर्यंत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयव मिळवून देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत. अवयव दात्यांचा विश्वास मिळवून सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि काम गतिमान, परिणामकारक असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/



बुधवार, जुलै २३, २०२५

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" यांची जयंती साजरी


संजय पाटील चिखले

दि. 23 जुलै 2025 बुधवार रोजी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महापुरूषांची जयंती पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.

मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी श्री जे.ई. गायकवाड, पोउपनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' या महापुरूषांना अभिवादन केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रेपोउपनि / सुर्यभान कागने, मारोती कांबळे व नरेंद्र राठोड यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

सोमवार, जुलै २१, २०२५

नांदेड मध्ये गूंजले संत कबीर परमात्म्याचे अमृत वचन


संजय पाटील चिखले

नांदेड दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे संत कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे आणि रामपाल महाराज यांच्या कृपेमुळे  एक अद्वितीय सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडला.

या कार्यक्रमात नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संत रामपाल जी महाराज यांनी ऑनलाईन प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपल्या अमृतमय प्रवचनातून उपस्थित जनसमुदायाला जीवनातील खरे उद्दिष्ट काय आहे, मोक्षप्राप्तीसाठी कोणता योग्य मार्ग आहे, याचे शास्त्र आधारित ज्ञान दिले. अनेक लोकांनी कबीर परमेश्वराची खरी ओळख आणि त्यांची मोक्षदायक भक्ति पद्धत प्रथमच समजून घेतली.

कार्यक्रमात मोफत नामदीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेकडो लोकांनी नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात केली. उपस्थित भक्तांसाठी चहा-बिस्किटची सुविधा करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा याने भरलेले होते.

आयोजकांनी सर्व भक्तगणांचे आभार मानत पुढील काळात असेच शास्त्र आधारित सत्संग नांदेड जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी आयोजित केले जातील, असे सांगितले. शेवटी सर्वांना आवाहन करण्यात आले की, जगतगुरु संत रामपाल जी महाराज यांनी दिलेला खरा शास्त्र आधारित भक्ति मार्ग स्वीकारून आपल्या जीवनात सुख, शांती आणि मोक्षप्राप्ती साधावी, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवारालाही या पवित्र ज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण मनुष्य जन्म फार दुर्मिळ असून त्याचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठीच व्हायला हवा.


रविवार, जुलै १३, २०२५

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

     

मरवाळी/ता.नायगाव,दि.१३/०७/२०२५: नायगाव तालुक्यातील टेंभूर्णी ते कुंचेली (शंकरनगर) दरम्यान करोडो रुपये खर्च करून सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे .हा रस्ता मरवाळी गावातून जात असून शासन दरबारी म्हणजेच बांधकाम विभागाकडे या रस्त्याची रुंदी ही 33 फुट आहे.मरवाळी गावच्या गावठाण भागातून जाणा-या रस्त्यालगत गावातील काही नागरीकांनी वर्षानुवर्षे व काही अलिकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या परवानगीने अनाधिकृत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत,तर काही जणांनी बेकायदा मुरुम टाकून,पत्रे टाकून हा शासकीय रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे त्यामुळे सदर रस्त्याची गावातील रुंदी ही 22 फुटापेक्षा कमी होत आहे. 

सदर रस्त्यावरील अनधिकृत अतिकृमण काढण्यापेक्षा ग्रामपंचायत, मरवाळी यांनी रस्ता 22 फुटाचा करण्याचा सर्वानुमते चर्चा करुन ठराव घेऊन अतिकृमणास समर्थन देत आहे?, गुत्तेदार करत असलेल्या 22 फुटाच्या रस्त्यामध्ये एका बाजूच्या नालीकरीता जागा सोडल्यास सदर रस्त्याची रुंदी 15 ते 17 फुट इतकीच राहत आहे. या मुळे  शासकीय रस्त्यावर अतिकृमण कायम होण्यास ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे एक प्रकारची मदत होईल, व भविष्यात शासकीय रस्ता शिल्लक राहणार नाही.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ५३ नुसार ग्रामपंचायतीला अतिक्रमणे दूर करण्याचे अधिकार आहेत,जर अतिक्रमणे झाली ती दूर करण्यास ग्रामपंचायतीला अपयश आल्यास महसूल अथवा पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी.असे असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे तसेच २५ जानेवारी १९९०, १३ डिसेंबर १९९३, ०४ डिसेंबर २०१० च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर अतिक्रमणे दूर करण्याचे वेळोवेळी परिपत्रकान्वये निर्देश दिले आहेत.

हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी अशा प्रकारे अवैध बांधकाम, अतिक्रमणे करुन बसलेल्यांसमोर नांगी टाकून बसले आहेत.

असे असतानाही अशी सार्वजनिक जागेवरील बांधकामे दूर करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाही तसेच जन्या अतिक्रमणांची बाब उशिरा लक्षात आल्यामुळे ही अतिक्रमणे कालांतराने दूर करणे कठीण जाते.ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून शासनाच्या जमिनी,जागा,रस्ते जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाची आहे.

अरुंद रस्ता बनल्यामुळे पुढे चालून वाहनं ये-जा करताना अडचण निर्माण होऊन गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याशिवाय राहणार नाही,असी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढण्यास ग्रामपंचायत,  बांधकाम विभाग अपयशी ठरल्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी केली आहे.

गावचे सरपंच, बांधकाम विभागाचे डिप्टी इंजिनिअर, इंजिनिअर  गावात आले होते, पदाधिकारीही उपस्थित होते,गावातील काही नागरिकही होते. यांच्यात चर्चा होऊन सर्वानुमते कुणाचेही बांधकाम न पाडता  २२ फुटाची मार्किंग करुन रस्ता बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

                                      गुत्तेदार                                                                 


 

सोमवार, जुलै ०७, २०२५

सोसायटी निवडणुकीत शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी

          
संजय चिखले

मरवाळी/ता.नायगाव, दि.०६/०७/२०२५: मौजे. होटाळा तालुका नायगाव(खै.) येथील सेवा सहकारी सोसायटी होटाळा चे श्री दत्त विकास पॅनल प्रमुख शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज दिनांक 6/7/ 2025 रोजी पार पडली या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार भरघोश मताने निवडून आले.या निवडणूकीत सर्व गावकऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.

 विजयी उमेदवार 

 श्री शिवराज भाऊराव पाटील, शिवाजी संभाजी पवार, विठ्ठल दादाराव पवार, राजेश व्यंकटराव पवार, गोविंद कंदुरके, दत्ता देवराव पवार, उमरेकर दत्ता देवराव, पवळे गोविंद गंगाधर, पवार शिवकांत शामराव, संजय भगवान बन, डोईवाड मोतीराम गंगाराम या सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय भगवानराव पाटील होते, गावातील प्रथम नागरिक गणेश व्यंकटराव पवार हनुमंतराव माली पाटील प्रा.काशीबन सर संग्राम एकाळे. गणेश भद्रे भगवान भद्रे.शिवाजी कोतेवार. मधुकर पवार शंकर पवार व्यंकट पवार गंगाधर येवते प्रकाश पवार रमेश पिंपळदरे भाऊराव पाटील. शरद हनुमंतराव पवार धोंडीबा दत्तात्रय पवार मनोहर हिवराळे जितेश पवार डी एम पिंपळदरे गणेश विठ्ठलराव पवार संभाजी रामजी जाधव चंद्रकांत दसरत पवार तसेच गावातील सर्व मंडळी उपस्थित होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पवार यांनी केले.

गुरुवार, जुलै ०३, २०२५

एका महिलेने बार्टीच्या कुविख्यात सराईत लाचखोरीन कंत्राटी महिला सुजाता पोहरेचा काट्याने काढला काटा

 हक्कासाठी लाच का?

कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे


मरवाळी/नांदेड,दि.०३/०७/२०२५: लाच देणे व लाच घेणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे, असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो.असे असतानाही लालची लोकसेवक पैशाच्या मोहापायी लाच मागताना सर्रासपणे आढळून येतात.काही प्रकरणात नागरिकांना लाच देण्याची इच्छा नसल्याने ते आपल्या जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल करुन लाचखोर महिला-पुरुष लोकसेवकास ॲंटी करप्शन ब्युरोच्या हवाली करतात तर लाखों लोकं लाच देणे मजबुरी का नाम महात्मा गांधी समजून लाचखोरांच्या लालसेला बळी पडतात

         ॲंटी करप्शन ब्युरो कडून नेहमी आवाहन करण्यात येते की,नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास एसीबीकडे तात्काळ संपर्क साधावा.एसीच एक तक्रार प्राप्त झाली असता त्यावर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली आहे...


सविस्तर वृत्तांत

तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे ऑनलाइन अर्ज केला तसेच दिनांक 13/03/2025 रोजी ऑफलाइन देखील अर्ज केला होता. परंतु तो काही तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. 

        तक्रारदार यांनी पुन्हा त्यांचे मुलाचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर यातील आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की, मी काम करीत असलेल्या विभागाचे शेजारीच जात पडताळणी विभागाचे काम चालते. तेथे माझी ओळख असून मी तुझे काम करून देते. परंतु पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही. तुम्ही 20,000/- रूपये टोकन रक्कम दिल्यास तुमचे काम होईल अन्यथा काम होणार नाही अशा आशयाची तक्रार दिनांक 26/06/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली होती. 


तक्रारीची पडताळणी

    दिनांक 03/07/2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली. 

         यातील लोकसेविका यांनी तक्रारदार यांच्या मुलाची अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता एकूण 30,000/- रूपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती सुरूवातीस 15,000/- रूपये व उर्वरीत रक्कम 15,000/- रूपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम झाल्यानंतर द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.


 सापळा कारवाई

    दिनांक 03/07/2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात सापळा कार्यवाही आयोजित केली. लोकसेविका सुजाता पोहेरे यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम 15,000/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.


आरोपीचे अंग झडतीमध्ये मिळून आलेल्या वस्तू आणि रोख रक्कम

         लोकसेविका यांचे ताब्यात एक विवो कंपनीचा T4 कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम 50 रूपये मिळून आले. मोबाईल तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. 

 

आरोपीची घरझडती

     आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांचे हडको, नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू आहे.


गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

    लोकसेविका सुजाता पोहरे यांचेविरुद्ध पो.स्टे. विमानतळ, ता. जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


आरोपी अटक

       लोकसेविका यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.  


सापळा व तपास अधिकारी

श्री. करीम खान पठाण,

पोलीस निरीक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड.

सापळा पथक

मपोहेकाॅ/609 मेनका पवार, पोेकाॅ/1082 यशवंत दाबनवाड, पोेकाॅ/1487 ईश्वर जाधव चापोहेकाॅ/2468 रमेश नामपल्ले सर्व नेम. लाचलुचपत प्र

तिबंधक विभाग, नांदेड.




आवाहन

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.


श्री.प्रशांत पवार

पोलीस उपअधीक्षक 

ला.प्र.वि.नांदेड. 

93590 56840 (मोबाईल, व्हाट्सअप)


कामं अडली

गरज पडली

तर फक्त एक फोन

दूरध्वनी 02462 253512


ACB हेल्पलाईन

टोल फ्री 1064



Popular posts लोकप्रिय पोस्ट