🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, सप्टेंबर ०४, २०२१

नागरिकांनी गणेश उत्सव व पोळा सण साधेपणाने साजरा करावा-अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे


नायगाव :  कोविड -१९  तिसऱ्या संभावें लाटेचा विचार करून गेल्या वर्षीच्या नियमाप्रमाणेच याही वर्षीचा गणेश उत्सव म्हणजेच दिनांक  १० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवासाठी मागील वर्षीचेच नियम कायम करण्यात आले असून गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन करताना कसल्याही प्रकारची मिरवणूक  काढण्यात येऊन नये  मिरवणुकांवर प्रशासनाने कोरोनाच्या संकटामुळे बंदी घातली  गणेश उत्सव व बैलपोळा हा सण साध्यापनाने  साजरा करावा असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मांडले

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.सिद्धेश्वर धुमाळ व पो.नि.अभिषेक शिंदे यांनी  आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांना शासनाच्या नियमावली प्रमाणेच उत्सव साजरे करा असे बोलतांना व्यक्त केले.तरुण मंडळींमध्ये वर्षभर वाट पाहून मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेश उत्सवावर व वर्षभर शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राहणा-या बैलाचा आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा या सणावर कोरोनाचे संकट आले आहे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

ही साखळी तोडण्यासाढी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा व्यापक प्रसार होवू नये, यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून सण उत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. असे ही मोरे यांनी सांगितले

दिनांक १० सप्टेंबर पासून उत्सव सुरु होत आहेत त्यानुषंगाने  गणेश उत्सव मंडळाने  मिरवणूका काढू नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले. तसेच अगदी साध्या पद्धतीने  गणेश उत्सव हा सन साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा,अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही ते म्हणाले,तर शासकीय ग्रामीण रुग्णालय नायगाव च्या वतीने गणेश मंडळाच्या सर्वच सदस्य यांनी कोविड  लसीकरण करून घ्यावे असे वैदयकिय  अधिकारी कांबळे यांनी आवाहन केले व  गणेश मंडळानी सॅनीटायजर, मास्क ,तापमापक मशीन वापरुन  समाजउपयोगी उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करावा  असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी  सिद्धेश्वर धुमाळ यांनी केले. 

यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हा अतिरिक्तपोलीस अधीक्षक निलेश मोरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  डाँ.सिद्धेश्वर धुमाळ , आ. राजेश पवार , कल्याण ,प्रा डॉ.जीवन चव्हाण ,देविदास पाटील बोमनाळे , पञकार तथा जिल्हाउपाध्यक्ष  बाळासाहेब पांडे , मराठी पत्रकार संघाचे नूतन तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण , एस. एम मुदखेडकर , माधव मामा कोकुरले , माधव पाटील चव्हाण ,शेख अरिफ ,तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर , पत्रकार तथा तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड , शहर अध्यक्ष विश्वांभर वन्ने , केरबा रावते ,विरेंद्र डोंगरे , सुधाकर भद्रे , प्रा. गडमवार , मनोहर तेलंग, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, प्रल्हाद भंडारे ,नागोराव भोसले ,अंकुशकुमार देगावकर ,सरपंच  प्रतिनिधी साहेबराव कांबळे , नायगाव शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची व  नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती


चौकट =

पांडे यांच्या मागणीवरून मांजरम पोलीस चौकीला तात्काळ तीन कर्मचारी नियुक्त 

शांतता समितीच्या बैठकीत पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता कि मौजे मांजरम येथे पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बरेच वर्ष उलटले तरी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी राहण्याचा अभाव असल्याचे सांगितल्याने अति.पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी लगेच त्या मागणीची अंमलबजावणी करून त्या पोलीस चौकी मध्ये तीन पोलीस कर्मचारी नियुक्त केले व मुकामी राहण्याचे सांगितले  त्यामुळे बाळासाहेब पांडे यांनी त्यांचे आभार मानले.

मराठी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष नागेश कल्याण , कार्यध्यक्ष = माधव धडेकर , प्रसिद्धी प्रमुख = संजय चिखले मरवाळीकर

नांदेड PRC दौ-यात झाली आर्थिक वसूली-संजय चिखले यांनी समिती प्रमुखांकडे केली तक्रार

 


नांदेड,दि 4 सप्टेंबर 2021 : पंचायती राज समिती नांदेड दौ-याचे कारण पुढे करून पंचायत समिती माहूर येथे आर्थिक वसूली झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात सर्वंच पंचायत समितीत असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भातील सखोल चौकशी करण्याची मागणी PRC समिती प्रमुख मा.संजय रायमुलकर यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यामार्फत आज दि 4/9/2021 रोजी मेलद्वारे/What's app द्वारे करण्यात आली. 

   दि.2 ते 4 तारखेदरम्यान पंचायती राज समितीचा नांदेड दौरा आयोजीत करण्यात आला आहे.सदर दौ-यादरम्यान गट क्र.5 मधील भोकर,किनवट,माहूर या मार्गावरील पंचायती राज समिती दौरा व अभिलेखे तपासणी तसेच अधिका-यांची साक्ष घेणे सुरू होते. याच दौ-याचे कारण पुढे करून पं.स.माहूर अंतर्गत विभाग प्रमुखांकडे आर्थिक वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आल्याच्या चर्चा तालुक्यात रंगू लागल्या आहेत. सदर वसूली ही विभाग प्रमुख व त्यांच्या कनिष्ठ अधिका-यांवर सोपवले असल्याचे चर्चेतुन समजते.यासंदर्भात पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी व अधिनस्त विभाग प्रमुख, अधिकारी व काही ठराविक कर्मचारी यांच्या मार्फत वसूली करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची खात्याअंतर्गत चौकशी करणे गरजेचे आहे. आर्थिक वसूलीच्या बैठका गुप्तपणे घेतल्याचेही समजते..सदरांच्या खात्यातुन देवघेव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यांच्या खात्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. सदर वसूली कोणासाठी करण्यात आली होती?? कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली?? या प्रकरणाची आपण सखोल व तात्काळ चौकशी करावी अन्यतः आम्हाला रितसर तक्रार दाखल करावी लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

      समितीतील गट.क्र. 5 मधील प्रमुख सन्माननीय आमदार विक्रम काळे हे गटविकास अधिकारी माहूर यांचे खुपच कौतुक करत होते..यावरून सदर प्रकरणात काही काळे बेरे झाले नाही ना? अशी शंका सर्वसामान्य नागरीकांच्या मनात येत आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यात अदिवासी व डोंगरी भाग असल्याने तेथे अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात आहेत पण सदर योजना सर्वसामान्य नागरीकापर्यत पोहचतात का?? ग्राम पंचायत स्तरावरून निधी खर्च झाला का?? या व इतर अनेक मुद्यासंदर्भात पंचायत राज कमिटीने चर्चा करून शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण अधिकारी व पंचायती राज कमिटीतील सन्माननीय आमदार यांची मिलीभगत तर नाही ना??असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही..

    लोकशाही ख-या अर्थाने जीवंत ठेवायची असेल तर आणि सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासायचे असेल तर पदाधिका-यांचा अधिका-यांवर अंकुश असणे गरजेचे आहे. पण जेथे पदाधिकारी चुकीच्या मुद्याला पाठीशी घालत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी हा यक्ष प्रश्न आहे..

    या आशयाचे निवेदन सन्माननीय प्रमुख PRC दौरा नांदेड यांच्या नावाने संजय चिखले यांनी आज दिले आहे व त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ,ते मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यक मा.रुपेश गणात्रा यांनी सांगितले व चिखले यांनी दिलेल्या तक्रारीची प्रींट काढून सन्माननीय प्रमुख PRC यांच्या लक्षात सदर मुद्दा आणून देण्याचे अश्वासन त्यांनी दिले.

पंचायती राज समिती दौऱ्या दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आर्थीक वसूली केल्या संदर्भातील चौकशी करणे बाबत.pdf

Popular posts लोकप्रिय पोस्ट