🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, फेब्रुवारी २७, २०२१

गडग्याचे वादग्रस्त निलंबित ग्रामसेवक एम ए पठाण यांच्यावर लाखोंच्या अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

गडगा ठरले तब्बल अर्धा डझन भ्रष्ट ग्रामसेवकांची हजेरी लागलेले गाव

नायगाव (दि २६ फेब्रुवारी) : गडगा ग्राम पंचायतीचे निलंबीत वादग्रस्त ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी आपल्या नोकरीच्या काळात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील तब्बल १७ लाखांहुन अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे,गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई या पूर्वीच केली असली तरी सदरचे प्रकरण विधानसभेत पोहचल्याने या भ्रष्ट ग्रामसेवकाविरुद्ध संबधित विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे यांच्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी च्या रात्री उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाआहे.

            मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायतीत सरपंच पुत्र व ग्रामसेवकांने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. येथे आलेल्या प्रत्येक ग्रामसेवकाने गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला होता . त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झालेआहेत.तर आता सहाव्या क्रमांकाचे ग्रामसेवक एम.ए.पठाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याने अर्धा डझन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झालेले गडगा गाव अशी ख्याती झाली आहे .

       ग्रामसेवक एम ए पठाण यांनी अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे तातडीने चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी प्रयत्न केले पण पुरावे उपलब्ध नसल्याने प्रकरण प्रलंबित राहिलें. त्यामुळे या प्रकरणी चौकशीचाच फार्स सुरू होता, प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यासाठी बराच विलंब झाला. दिनांक १९ १० २०२० रोजी सरपंच चंद्रकला माधवराव कोंडलवाडे यांनी सदर प्रकरणी आपल्या निराक्षरतेचा गैरफायदा घेत एम ए पठाण यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्या कडे ९६ हजार च्या चेक ला २९६०० केले,व असा उपद्व्याप सात ते आठ करून निधी अपहृत केला अशी तक्रार दिली होती.

   या वरून गट विकास अधिकारी प.स. नायगाव च्या आदेशावरून विस्तार अधिकारी कांबळे हे चौकशी कामी गेले असता आठ वेळा वेगवेगळ्या एजन्सीच्या नावे एकूण 17 लाख 85 हजार 343 रु उचलल्याचे निदर्शनास आले नंतर याची जवाबदारी माझी आहे असे संबंधिताने लिहून दिल्या नंतर.तसा अहवाल सादर झाला.

      गट विकासअधिकार्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करुन ग्रामसेवकाचे निलंबन केले, परंतु अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करन्याची प्रथा असूनही पठाण यांच्या वर केवळ निलंबनाची कारवाई झाल्यामुळे सदर प्रकरण आ.राजेश पवार यांनी विधानसभेत उचलून धरले.    

 त्यामुळे या भ्रष्टाचारी साखळीत सामील असलेले ग्रामसेवक व पंचायत समिती मधील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते, वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचालीस वेग आला . व २६ फेबुरवारी च्या रात्री ११वाजून २० मी वाजता एम ए पठाण यांच्या विरुद्ध फिर्यादीवरून भादवी 1860 प्रमाणे गु.र.न.045 प्रमाणे 420,409,467,468,471 कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय एस एस बाचावार करीत आहेत.

पोलीस स्टेशन नायगाव गुरनं.45/2021 कलम 420.409.467.468.471 420.409.467.468.471भादिव दनांक 26.02.2021

Daily Crime Report ( D.C.R) 27/02/2021

DCR Upload Date 26.02.2021

👇गडगा येथील ग्रामसेवक पठाणवर गुन्हा दाखल_पेज नंबर २८

https://drive.google.com/file/d/1JmOReS2hymq-Y19l5wnKdAzgSVbvr9OP/view?usp=drivesdk

Maharashtra Police - Services for Citizen

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/PublishedFIRs.aspx

Maharashtra Police - Services for Citizen

https://drive.google.com/file/d/1K7MLpsc7TolYBkvnTCbJKCEYVEX-1ZFg/view?usp=drivesdk

👇Nanded Police

http://nandedpolice.gov.in/index/en

👇Nanded Police

http://nandedpolice.gov.in/publish/13

👇Government of India, Ministry of Home Affairs

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/DownloadOfflineEForm.aspx


👇 संबंधित बातम्या

गडगा अपहार प्रकरण पोचले विधानसभेत-ग्रामसेवक पठाण यांनी २० लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न

https://nandednewsupdate.blogspot.com/2021/02/blog-post_50.html



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

नादुरुस्त तिकिट मशिन ने घेतला वाहकाचा जीव; बदनामी च्या भीती ने माहूर आगाराच्या वाहकाची आत्महत्या-वाहकावरील अन्याय दूर करण्यासाठी लिहली सुसाईड नोट!

 


नांदेड (२६ फेब्रुवारी) : माहुर आगारातील एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त असल्याने तपासणीत कार्यवाही ला सामोरे जावे लागेल,त्यात आपली नाहक बदनामी होईल या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज दिनांक २६ रोजी सकाळी एसटी बस मध्ये आत्महत्या केली. वाहकाच्या आत्महत्येला रापम प्रशासन जबाबदार असल्याचे सुसाईट नोट मध्ये नमूद असल्याने मानसिक छळ करणारे ते अधिकारी कोन हे पोलिस तपासात समोर येणार असले तरी नादुरुस्त तिकिट मशिन मुळे संजय संभाजी जाणकार (४९) या वाहकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

माहूर आगारात वाहक म्हणून कार्यरत संजय संभाजी जाणकार (४९) यांनी दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २६ शुक्रवार रोजी उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस. टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे,प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व सुसाईट नोट हस्तगत केली.आत्महत्या पूर्वी सदर ची सुसाईट नोट कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुप वर वाहकाने टाकल्याने घटना स्थळी रापम प्रशासना विरूद्ध रोष व्यक्त करण्यात येत होता.सुसाईट नोट मध्ये जाणकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे.व खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहे.मी सुद्धा दिनांक २४ रोजी माहूर वरून महागाव साठी साडे तीन प्रवासी घेतले,मात्र मशिनित बिघाड असल्याने साडे तीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाली.ती ही अपंगा साठी असलेली तिकीट बाहेर आली.हे सारा प्रकार सुरू असताना धनोडा पर्यंत गाडी पोहचली.परिणामी तपासणीत माझ्यावर केस दाखल झाली. आता मला निलंबित केले जाईल,सोयरे, धायरे,व भावकी आणि रापम कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल,प्रत्येक जण मला चोर समजेल.मी रापम मध्ये चार वर्ष प्रामाणिक सेवा केली आहे.त्या मुळे माझी बदनामी होईल. आगारात सदर ची मशीन चेक केली जाईल,बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल.व मला दोषी ठरविले जाईल.मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती.माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे. आगारातील ५० टक्के मशीन नादुरुस्त आहेत.आदिलाबाद, किनवट साठी देण्यात येणाऱ्या मशिनी तर पूर्ण नादुरुस्त आहे.मशिनित डिस्प्ले होत नाही.अंधार असतो.त्या मुळे ना टप्पा दिसतो ना तिकीट… ना..प्रवास भाडे…. वाहकाने आपली कामगिरी कशी करावी,गाडी तपासणीत चूक आढळल्यास केस बुक होते,मशिनित बिघाड असल्याने वाहक दोषी कसा..? रापम प्रशासनाने योग्य मशीन देणे,व प्रशासनाने वाहका वरील अन्याय दूर करावे असे नमूद केल्याने दिनांक २४ रोजी गाडी तपासणी दरम्यान तपासणी अधिकाऱ्याने केलेल्या मानसिक छड व बदनामी च्या भीती ने जाणकार यांनी आत्महत्या केल्याचा एकच सुर बस स्थानक परिसरात होता. सदर प्रकरणी माहूर पोलीस अधिक तपास करीत आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून १४ पुस्तकांचे प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिन

 

प्रकाशन

मुंबई, (दि 26 फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये श्रीमती मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङमयातील खंड पहिला मंडळाने गतवर्षी प्रकाशित केला असून यावर्षी दुसरा खंड ग्रंथरुपाने मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे.

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध वाङमयीन योजनांबरोबरच उपरोक्त उद्दिष्ट पूर्तीसाठी मंडळाकडून सातत्यपूर्ण मौलिक ग्रंथांची निर्मिती करण्यात येत आहे.

मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेअंतर्गत श्री. कमलाकर अंबेकर लिखित भारतरत्न नानाजी देशमुख व प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित डॉ. ग.गो.जाधव यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी, त्यांचे कार्य व योगदान मांडणारी चरित्रेदेखील मंडळ प्रकाशित करीत आहे. याबरोबरच भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र आणि निवडक मराठी नाट्यरुपे संबंधित महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा उलगडा करणारा, नाटक आणि रंगभूमीसाठी सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचा असणारा, अत्यंत मौलिक स्वरुपाचा नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह हा डॉ. विलास खोले यांचा ग्रंथ मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. या मराठी ग्रंथांसोबतच एकोणिसाच्या शतकात जर्मन आणि रशियन साहित्याच्या  इतिहासात मानाचे स्थान पटकावेल्या लघुकादंबऱ्यांची ओळख करुन देणाऱ्या सुनंदा महाजन व अनघा भट संपादित तिकडून आणलेल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे मौलिक वाङमय देखील मंडळाकडून प्रकाशित होत आहे. याबरोबरच वाङमय महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या समग्र वाङमयातील गुरुवर्य केळुसकर यांचे डॉ. राजन गवस यांनी संपादित केलेले सेनेका व एपिक्टेटस यांची चरित्र व बोधवचने हे पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे.

याबरोबरच मंडळाच्या पुनर्मुद्रण योजनेंतर्गत अण्णाभाऊ साठे यांचे आगळेपण सिद्ध करणारे निवडक साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङमय या ग्रंथांच्या माध्यमातून मंडळाकडून पुणर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

धर्मशास्त्राचा इतिहास उलगडणारे धर्मशास्त्राचा इतिहास (पूर्वाध) धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध) ही पुस्तके मंडळ प्रकाशित करीत आहे. तसेच लयतालाच्या शास्त्रीय सिद्धांत परंपरेची ओळख करुन देणारा लयतालविचार हा ग्रंथ मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात येत आहे. प्राचिन ग्रीसचा महाकवी होमरलिखित ‘इलियद’ हे महाकाव्य मंडळ पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करीत आहे. भाषेविषयी प्राचिन भारतीय विचारवंतांनी जे चिंतन व विश्लेषण केले आहे, त्याचा परिचय करुन देणारे ‘पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ हे पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित होत आहे. शुल्बसूत्रांची आजच्या भौतिकी विज्ञानासंदर्भात उपयुक्तता विशद करणारा ‘कात्यायन शुल्ब सूत्रे’ हा ग्रंथ मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्राचा परिचय करून देणारा ग्रह-गति सिद्धांत (किंवा ज्योतिर्गणिताची मूलतत्वे)’ हे पुस्तक देखील मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

Tags: 


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट