🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, मे ३१, २०२१

लाच प्रकरण :महा लाचखोर मुख्याधिका-यासह लाचखोर उद्यान पर्यवेक्षक व ईतर एका लाचखोराला 9 लाख लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल, व महा लाचखोर सहकार अधिकारी 15 हजार लाच घेताना आणि एका लाचखोर वकीलाला 10 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 


Pune : पुणे अॅन्टी करप्शनचा तिहेरी दणका! 9 लाखाच्या लाच प्रकरणी बडा अधिकारी ACB च्या 'रडार'वर; पुण्यातील वकिलासह शिरूर आणि तळेगाव दाभाडे येथे कारवाई, प्रचंड खळबळ

पुण्याच्या लाच लुचपत विभागाने आज तिहेरी कारवाई करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून,यात एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वकिलाचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी (सीओ) आणि आणखी एका अधिकाऱ्याने 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने आज डिमांडचा (लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पकडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पाहिल्या कारवाईत शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे ( वय 56 ) यांना पकडले आहे. शिवाजी हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक शिवाजी यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तकरार केली होती. त्यानुसार आज कारवाईत तडजोडीनंतर 15 हजार रुपये घेताना पकडले आहे.

तर दुसऱ्या कारवाईत एका वकिलाला 10 हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. हरिकिसन श्रीरामजी सोनी (वय ५७) असे पकडण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यातील महिला तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा वाद सुरू आहे. केसमध्ये शासनाने लोकसेवक सोनी यांना वकील म्हणून नेमले आहे. यावेळी त्यांनी 20 हजार रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे केली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यात पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज 10 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

मोदींनी सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले : अमित शहा

 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला सत्तेत दुसऱ्यांदा येऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही ट्विट करून मोदींचे अभिनंदन केले आहे.

“मागील सात वर्षांत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासीयांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा पूर्ण विश्वास आहे.

या सात वर्षांत मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वस्पर्शी व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले.” असे मत अमित शहा यांनी ट्विट करून व्यक्त केले.

रविवार, मे ३०, २०२१

शेंदाड कार्यकर्त्यांचा भयताड हल्ला निषेधार्य संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी–वैभव स्वामी

 


बीड,दि 30 मे 2021 : दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांनी आपल्या सडेतोड लिखाणातून शेंदाड नाऱ्याचा भयताड पोऱ्या या मथळ्याखाली वास्तव लिखाण केले होते.मात्र हे वास्तव लिखाण अंगाला झोंबल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थक बगलबच्यांनी दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर भ्याड हल्ला करत काळे फासण्याचा निंदनीय प्रकार केला.सदरील घटना निषेधर्य तर आहे मात्र अशा भयताड हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा संपूर्ण मराठवाड्यात रस्त्यावर उतरून पत्रकार आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिला आहे.
दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार रवींद्र तहकिक यांनी आपल्या दैनिक लोकपत्रच्या माध्यमातून मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे महाराष्ट्रातील विविध पक्षांतर्गत लोकप्रतिनिधींना भेटत असताना ते केवळ राणे यांची भेट टाळून इतर लोकप्रतिनिधींना भेटत असल्याचा द्वेष मनात ठेवून त्यांच्या चिरंजीवाने नको ती गरळ ओकली होती.त्यावर आपल्या सडेतोड लेखणीतून वास्तव मांडणी ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांनी केली. सदरील लिखाना संदर्भात जर काही अक्षेप वाटला तर सनदशीर मार्गाने त्यांच्या समर्थकांनी न्याय मागणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता लॉकडाऊन असताना चार पेक्षा अधिक लोक एकत्र येत त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात घुसून ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शिवीगाळ करून तोंडाला काळे फासण्याचा प्रकार 30 मे रोजी केला. या घटनेनंतर ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांनी अशा भ्याड हल्ल्याला न घाबरता संबंधित एम आय डी सी चिकलठाणा पोलिस स्टेशनला हल्लेखोरा विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर कॅमेराबद्ध झालेले आहेत. त्यामुळे हल्ला करणारे कोण आहेत ? हे लपून राहिलेले नाही. या गंभीर प्रकरणात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तेव्हा पोलिसांनी सदरील हल्लेखोर विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय लॉकडाउन असतानासुद्धा चार पेक्षा अधिक लोक एकत्र येत त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. तेव्हा या कलमाअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली पाहिजे.संबंधित सर्व आरोपी 24 तासाच्या आत जर अटक करण्यात आले नाहीत तर संपूर्ण मराठवाड्यातील पत्रकार लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी लढा उभारतील असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिला आहे.पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.


शिवराज नारियलवाले यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील सर्व दोषींचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा_प्रविण दरेकरांनी पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन केली मागणी

 समाजमाध्यमात प्रकार उघडकीस येण्यापूर्वी स्वतःहून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या जालना पोलीस अधीक्षकांचा लेखी खुलासा घ्या


औरंगाबाद दि.२९ मे : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वपूर्ण काम पार पाडणाऱ्या पोलीस दलाबद्दल नितांत आदर आहे. परंतु, पोलीस दलाचे अधिकार वापरून कायदा हातात घेणाऱ्या अपप्रवृत्तीना वेळीच लगाम घालावा, सर्व दोषींना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, जातीवाचक शिवीगाळीच्या कलमाचाही त्यात समावेश करावा, अशी मागणी आज प्रविण दरेकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रत्यक्ष भेटून केली.  

         जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे दीपक हॉस्पिटलमध्ये बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले असताना त्या ठिकाणी गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते.

तेथेच उपस्थित असलेले काही पोलीस गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करीत होते. शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली होती. त्याचा राग मनात धरून शिवराज नारियलवाले यांना 9 एप्रिल, 2021 ला गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 अशा आठ पोलिसांनी घेरून लाठ्यांनी अमानुष व बेदम मारहाण केली होती. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. आतापर्यंत. एका पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

समाजमाध्यमात प्रकार उघडकीस येण्यापूर्वी स्वतःहून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या जालना पोलीस अधीक्षकांचा लेखी खुलासा घ्या

         औरंगाबादच्या आय.जी. याना दिलेल्या पत्रात दरेकर यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्यावरही ठपका ठेवला आहे. "समाजमाध्यमात हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अमानुष मारहाणीची कल्पना असताना त्यांनी स्वतःहून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य कसूर केली असून कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध देखील शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचे आहे," अशी भावना व्यक्त करून दरेकर यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडून याबाबतचा लेखी।खुलासा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

        या पत्रात दरेकर यांनी हे लक्षात आणून दिले की, समाजमाध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि जनतेचा असंतोष वाढल्यानंतर, दबाव आल्यानंतर पोलीस दलाला कारवाई करणे 'भाग' पडले आहे. ही कारवाई देखील त्यांनी पूर्णपणे केलेली नाही. कारण, केलेल्या कारवाईतून काही अधिकारी व पोलिसांना पाठीशी घालण्यात आल्याचे दिसून येते. याच पत्रात दरेकर यांनी "किमान आता तरी पोलीस दलाने कुणालाही पाठीशी न घालता सर्व संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून या घटनेमुळे पोलीस दलाची आणि शासनाची मान खाली गेल्याची जाणीव ठेवून मागणी केल्यानुसार कार्यवाही कराल व दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात कोणतीही हयगय करणार नाही, असा विश्वासही आय.जी. यांच्याबद्दल व्यक्त केला आहे. एकूणच या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला पत्र लिहिल्यानंतर आणि दरेकर यांनी आय.जी. यांची भेट घेतल्यानंतर पोलीस दलावर कारवाई करण्याबाबत दबाव वाढला आहे. 

दरेकरांनी घेतली शिवराज नारीयलवाले यांची भेट

पूर्वी प्रविण दरेकर यांनी जबर मारहाण झालेल्या शिवराज नारीयलवाले यांच्या जालना येथील घरी जाऊन त्यांची विचारपूसही केली. यावेळी माझा पक्ष, आमचे पक्षाचे नेते आणि माझा समाज माझ्या पाठीशी संकटाच्या काळात पाठीशी उभे राहतील असा विश्वास होता आणि त्याची प्रचिती येत आहे, अशा भावना शिवराज नारीयलवाले यांनी व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या जालना येथील पदाधिकाऱ्यांनी गवळी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून याच समाजाच्या तरुणाला जबर मारहाण करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरवडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाची मागणी दरेकर यांच्याकडे केली. काही वेळातच औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेणार असून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे, त्यांच्याकडे मागण्याही करणार आहे, त्यावेळी आपण गवळी समाजाच्या मांडलेल्या भावनाही त्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन प्रविण दरेकर यांनी देताना कुणालाही लहर आली आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्याला लाथा, बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली, हे आम्ही खपवून घेणार नाही, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पी.आय.महाजन याना निलंबित केल्याशिवाय आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी।दिला आहे.


युवा मोर्चाचे कार्यकर्ते शिवराज नारियलवालेंची जालन्यात जाऊन विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
औरंगाबादच्या IG यांची देखील भेट घेतली. गवळी समाजाबाबत जातीवाचक भाषा वापरणाऱ्या, आपल्या गैरकृत्याने पोलीस दलाची, शासनाची मान खाली घालायला लावणाऱ्या, लाथा, बुक्के आणि काठ्यांनी शिवराजला रक्तबंबाळ करणाऱ्या सर्वच्या सर्व ८ पोलिसांना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि PI महाजन यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही IG यांना दिला.   

चौकट

दरेकरांनी आय.जी.यांच्याकडे केल्या या मागण्या

1) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे स्पष्ट दिसत आहेत, तो महत्वाचा पुरावा आहे. परंतु, या प्रकरणात केवळ 5 पोलिसांना निलंबित केले. उर्वरित 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तत्काळ करावी.

2) केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर या सर्वांविरुद्ध फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करावा.

3) रुग्णालयात एका विशिष्ट समाजाविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दलच्या गुन्ह्याचा देखील त्यात समावेश करावा.

4) संबंधित पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे जबाबदार अधिकारी म्हणून तेव्हढेच दोषी आहेत. त्यांना देखील तत्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

5) फौजदारी गुन्ह्याची कारवाई आणि विभागीय चौकशीची कारवाई एकसमयाव्यच्छदेकरून (symalteneously) करावी.

6) या मारहाणीत मारहाण करणाऱ्या पोलिसांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती सामील असल्यास गुन्ह्यात त्यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करावा.

7) समाजमाध्यमात हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अमानुष मारहाणीची माहिती असतानाही संबंधित पोलीस अधीक्षक यांनी स्वतःहून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी का पार पाडली नाही, याबाबतचा लेखी खुलासा त्यांच्याकडून घेण्यात यावा.


संबंधित बातम्या

मारहाण प्रकरण भोवले : त्या पोलीस उपनिरीक्षक भागवत कदमसह अन्य चौघे निलंबित, लाचखोर डीवायएसपीच्या बॉडिगार्डचाही समावेश

Video : पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची बेधुंद लाठी...BJP युवा मोर्चा पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून थर्ड डिग्री, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

शनिवार, मे २९, २०२१

लाच प्रकरण :महा लाचखोर मंडळ अधिका-यासह लाचखोर तलाठी 10 हजार लाच घेतल्यानंतर दारु, मटणाच्या पार्टीचा अनुचित लाभ घेताना एसीबीच्या जाळ्यात

 


*आदरणीय सर*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* बुलडाणा

▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- ४२ वर्षे रा. शिर्ला नेमाणे, ता. खामगाव, जि.बुलडाणा

▶️ *आरोपी-* 

१) श्री. विलास साहेबराव खेडेकर

वय- ५२ वर्षे,  

पद- मंडळ अधिकारी, (वर्ग ३) 

नेमणूक - लाखनवाडा, 

रा. गजानन काॅलनी, खामगाव.     

२) बाबुराव उखर्डा मोरे,

वय - ३६ वर्षे , पद - तलाठी, वर्ग (३)

नेमणूक - शिर्ला नेमाणे , ता.खामगाव   

रा. किन्ही महादेव, ता. खामगाव.     

▶️ *लाचेची मागणी*- रुपये १०००० व दारू मटणाची पार्टी,

▶️ *लाच स्विकारली-*

  रुपये १०००० व दारु मटणाची पार्टी. 

▶️ *हस्तगत मुद्देमाल-* 

दोन इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ.

▶️ *लाचेची मागणी -* 

ता. २८/०५/२०२१

▶️ *लाच स्विकारली -*    

ता. २८/०५/२०२१

▶️ *घटनास्थळ* 

पिंप्री धनगर शिवारातील श्री प्रल्हाद चव्हाण यांचे शेतातील झोपडीसमोर, ता. खामगाव, जि. बुलडाणा.

▶️ *लाचेचे कारण -*.  

यातील तक्रारदार यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना रु १००००/- व दारु मटण पार्टीची मागणी करुन रु १०००० यापूर्वीच स्विकारले असून पडताळणी दरम्यान दारु मटण पार्टीची मागणी करुन, सापळा कारवाई दरम्यान दारु मटनाच्या मेजवानीच्या स्वरुपात अनुचित लाभ मिळवितांना मिळून आले.

▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.

▶️ *सापळा व मदत पथक-* पो.उपअधिक्षक श्री. संजय चौधरी,

पो.निरीक्षक - श्री.सचिन इंगळे

पोलीस नाईक - श्री विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान.

पो.शि.- श्री विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी

चालक पो. ना. श्री नितीन शेटे, पो.शि. शेख अर्शद

▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :- 

1) श्री. विशाल गायकवाड,

पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.

2) श्री. अरुण सावंत,

अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र.

▶️ *तपासी अधिकारी*

  पो. उप अधिक्षक श्री संजय चौधरी.

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा .

---------------------------------------------- 

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा*.

*संपर्क क्रमांक* - *8888768218*

*टोल फ्री क्रमांक* - *1064*.

-------------------------------------------


मारहाण प्रकरण भोवले : त्या पोलीस उपनिरीक्षक भागवत कदमसह अन्य चौघे निलंबित, लाचखोर डीवायएसपीच्या बॉडिगार्डचाही समावेश

लाचखोर डीवायएसपी सुधीर खिरडकरसह अन्य सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली होती. 


जालना : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराय नारियलवाले यांना अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्ष विनायक देशमुख यांनी शुक्रवारी याबाबत आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे लाचखोरी प्रकरणात घरी बसलेलेल्या डीवायएसपी सुधीर खिरडकर याच्या बॉडीगार्डचा देखील निलंबित कर्मचा-यामध्ये समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्षषलागले आहे. 

7 एप्रिल रोजी जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे तोडफोड केल्याप्रकरणी बळाचा वापर केल्याचा दावा करणारे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे देखील आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत, त्यांच्यासोबत मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे या पाच जनांचे निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काढले आहेत.



27 मे रोजी नारियालवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्वतः चौकशी केली होती. तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्फत त्यांची चौकशी सुरू होती. सुमारास पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

चौकट

"याप्रकरणी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम याच्यासह वरील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सांगितले तर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊ शकते असे संकेत दिले आहेत."

चौकट

“ आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे आणि नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली (पोलीस) आहे. आपण फक्त गुन्हा शोधणे आणि गुन्हेगारांची नोंद करणे पुरेसे नाही. आपण लोकांचे प्रेम जिंकण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत... जो माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत किंवा स्थिर नसतो किंवा परिस्थितीत शांत राहू शकत नाही, असा व्यक्ती पोलीस दलाचा सदस्य होऊ शकत नाही ”

- सरदार वल्लभभाई पटेल

शुक्रवार, मे २८, २०२१

पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची बेधुंद लाठी...BJP युवा मोर्चा पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून थर्ड डिग्री, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

 खाकी वर्दीला व मानुसकिला काळीमा फासणारी घटना,जमाव पांगवत असताना व्हिडिओ का बनवला म्हणून जनावरांसारखी मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी होत आहे


जालना,दि 28 मे : जालना जिल्ह्यामध्ये एका युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण करणारा तरुण हा भाजपा युवा मोर्चाचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहे. संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर, पुन्हा एकदा पोलीस प्रशासन बदनाम झालं आहे. शिवराज नारिलवाले असं जालना पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या युवकाचं नाव आहे. शिवराज हा जालना भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे. 9 मे रोजी जालना इथल्या खासगी रुग्णालयात करोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. यामध्ये शिवराजही होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जमाव पांगवत असताना शिवराजने त्याचा व्हिडिओ बनविला असा आरोपही शिवराजवर करण्यात आला आहे. या संशयामुळे पोलिसांनी शिवराजला बेदम मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये पोलिसांविरोधात संताप वाढला आहे. इतकंच नाहीतर, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात काहीही माहिती दिली नाही. संपूर्ण शरीरावर झाल्या जखमा भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कादीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, ९ एप्रिल रोजी रात्री खासगी रुग्णालयात रूग्णाचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि थोड्याच वेळात पोलीस रुग्णालयात पोहोचले. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लोकांचा पाठलाग केला. पोलिसांचं म्हणणं आहे की, जर पोलिसांनी रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या लोकांना पांगवलं नसतं तर रुग्णालयात बरंच नुकसान झालं असतं. त्यामुळे अशी कारवाई करावी लागली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


“ आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे आणि नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली (पोलीस) आहे. आपण फक्त गुन्हा शोधणे आणि गुन्हेगारांची नोंद करणे पुरेसे नाही. आपण लोकांचे प्रेम जिंकण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत... जो माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत किंवा स्थिर नसतो किंवा परिस्थितीत शांत राहू शकत नाही, असा व्यक्ती पोलीस दलाचा सदस्य होऊ शकत नाही ”

- सरदार वल्लभभाई पटेल

गुरुवार, मे २७, २०२१

लाच प्रकरण : गागलेगाव येथील लाचखोर तलाठी 4,000 हजार रुपयांची लाच घेताना नांदेड एसीबीच्या जाळ्यात

 


Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 30 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- विजयकुमार गोपाळराव कुलकर्णी, वय 48 वर्ष, तलाठी सज्जा मौजे गागलेगाव ता. बिलोली जि. नांदेड 

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 24/05/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 25/05/2021

➡ सापळा दिनांक :- 27/05/2021

➡ लाचेची रक्कम:- 5,000/- रुपये मागणी तडजोडीअंती 4,000/- रु.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार हे अध्यक्ष असलेले श्रीकृष्ण देवस्थान मौजे गागलेगाव करिता दान पत्राद्वारे मिळालेल्या जमिनीची नोंद 7/12 ला घेण्यासाठी दि. 18/05/2021 रोजी 15,000/- रु. ची मागणी करून 10,000/- रु. त्याच दिवशी घेतले व उर्वरित 5,000/- रु लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रु. स्वतः स्वीकारले. 

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. राजेश पुरी ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम सपोउपनी संतोष शेटटे, पोना एकनाथ गंगातिर्थ, गणेश केजकर ,नरेंद्र बोडके

*सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन*

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी* *केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग नांदेड

पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933
 _लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार_ 
*सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग*
*👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇* 


Mehul Choksi arrested:पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार मेहुल चोक्सी सापडला; अँटिग्वामधून बोटीतून पळालेला होता

 गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता.


पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणातील (PNB Scam) घोटाळेबाज मेहुल चोक्सी (Mehul Choksi) गेल्या काही दिवसांपासून अँटिग्वामधून गायब झाला होता. त्याला डॉमिनिकामध्ये ट्रेस करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता अँटिग्वा पोलिसांनी डॉमिनिका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, याचा अंदाज आल्यामुळे मेहुल चोक्सी अँटिग्वामधून पसार झाल्याचे सांगितले जात होते. 

पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिग्वा आणि बाबुर्डा या देशांमध्ये लपला होता. अँटिग्वा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल रविवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला आहे.
गुरुवारी डॉमिनिकामध्ये चोक्सी असल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी लगेचच कारवाई केली. तो बोटीतून पळाला होता. 



लाच प्रकरण : लाचखोर वनपालासह वखारचालक 1500 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


 

May 27 2021 5:22AM

सांगली ः कारवाई टाळण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना वन विभागातील वनपाल आणि वखारचालक यांना पेठ नाका येथे पकडण्यात आले. शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपाल अमोल दत्तात्रय शिंदे (वय 41, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि वखारचालक पांडुरंग रामचंद्र खुडे (वय 37, रा. खंडेश्वर मंदिराजवळ, पेठ, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी दहा दिवसांपूर्वी भाटशेरगाव येथील शेतातील निलगिरीची झाडे तोडून विक्रीकरिता पेठनाका येथील खुडे यांच्या वखारीमध्ये ट्रॅक्टरने आणली होती. त्यावर कारवाई करू नये, यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःसाठी दोन हजार व वनक्षेत्रपाल यांच्यासाठी पाच हजार रुपये आणि प्रत्येक ट्रॉलीसाठी पाचशे रुपयांची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.

या तक्रारीनुसार पडताळणी केली असता शिंदे व खुडे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती पंधराशे रुपयांवर व्यवहार ठरला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुडे यांच्या वखारीमध्ये सापळा लावला. शिंदे आणि खुडे यांना पंधराशे रुपये घेताना पकडले. या दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, अजित पाटील, सोहेल मुल्ला, राधिका माने, वीणा जाधव यांनी ही कारवाई केली.  


२६ - मे - २०२१ इस्लामपूर पोलीस ठाणे गु र नं ३९२/२१ भ्र .प्र .आधी . १९८८ चे कलाम ७, ७ अ , १२ पहा http://acbmaharashtra.gov.in/files/press_release/1482.pdf



बुधवार, मे २६, २०२१

लाचखोर कनिष्ठ अभियंता व खासगी इसम 50 हजाराची लाच स्विकारताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, खाजगी ईसमास अटक तर लाचखोर कनिष्ठ अभियंता फरार

 


मुंबई : घराच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या अभियांत्याने 1 लाख 40 हजार रुपयाची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता स्विकारल्यानंतर उर्वरीत रकमेपैकी 50 हजार रुपये खासगी व्यक्तीकडून स्विकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर कनिष्ठ अभियंता फरार झाला आहे. ही कारवाई मंगळवार (दि.25) लगून महाकाली रोडवरील एका चहाच्या दुकानासमोर करण्यात आली.

संतोष पवार असे फरार झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तर अब्दुल आहद खान (वय-43 रा. मार्वे क्रॉस रोड, मालवणी, मलाड (प) मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रविवारी (दि.23) तक्रार दाखल केली. पथकाने मंगळवारी (दि.25) सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मालवणी येथे घराचे बांधकाम सुरु आहे. बृहन्मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या संतोष पवार याने बांधकामाच्या ठिकाणी येऊन फोटो काढले. हे बांधकाम अवैधरित्या सुरु असल्याचे सांगून भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांनी संतोष पवार यांची भेट घेतली असता. बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदार यांनी मे महिन्यात 30 हजार रुपयाचा पहिला हप्ता दिला होता.



मंगळवार, मे २५, २०२१

ब्रेकिंग ; लाच प्रकरण : लाचखोर स्थापत्य अभियंता (वर्ग-३) 14 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन लाचखोराला घेतले ताब्यात

 


*यशस्वी सापळा कार्यवाही*

▶️घटक - यवतमाळ

▶️तक्रारदार - पुरूष, वय 45 वर्ष, रा.वसंत नगर, पुसद जिल्हा-यवतमाळ

▶️आरोपी - आलोसे अश्विन रामेश्वर चव्हाण,वय 31 वर्ष, पद-स्थापत्य अभियंता श्रेणी-3,नेमणूक-नगर परिषद पुसद जि.यवतमाळ सक्षम अधिकारी-आयुक्त/संचालक नगर विकास विभाग, मुंबई

▶️लाच मागणी - रु.14000/- ताडजोडीअंती

▶️लाच स्विकारली -रु.14000/- स्वीकारले

▶️पडताळणी- दि.

       18/05/2021

▶️सापळा कार्यवाही - 25/05/2021

▶️घटनास्थळ - नगर परिषद, पुसद येथील पुरुष प्रसाधन गृह जवळ.

▶️कारण - तक्रारदार यांनी नगर परिषद पुसद अंतर्गत पुसद शहरात केलेल्या काँक्रीट, नालीचे बांधकामाचे बिल काढणे करिता आलोसे यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केली व लाच रक्कम आज दि.25/05/2021 रोजी लोकसेवक अश्विन चव्हाण यांनी स्वीकारली त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

➡तपासी अधिकारी-पोलीस उपअधीक्षक, आर.बी.मुळे,ला. लु.प्रतिबंधक विभाग यवतमाळ

▶️कारवाई पथक-पोलीस अंमलदार पोहवा.सुरेंद्र जगदाळे, पोना. निलेश पखाले, अनिल राजकुमार, विजय अजमिरे, पोकॉ.राहुल गेडाम, राकेश सावसाकडे चालक सुधाकर कोकेवार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ.

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग यवतमाळ

*@दुरध्वनी क्रं - 07232-244002

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------



रविवार, मे २३, २०२१

लाचेची यशस्वी सापळा कारवाई : लाचखोर महिला कार्यालय अधीक्षक,माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सह लाचखोर मुख्याध्यापक (सेवा निवृत्त) 3 लाख लाच स्वीकारताना व प्रोत्साहन दिले म्हणून दोन्ही लाचखोरांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे


**आदरणीय सर* 

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई* 

▶️ *युनिट -* ठाणे

▶️ *तक्रारदार-* स्त्री, वय-  ३१ वर्षें,  

▶️ आरोपी-१)चित्रा भारमल ,  ३५ वर्षे., कार्यालय अधीक्षक , माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे 

२) दिलिप गजानन हिंदुराव वय ५९ वर्षे, खाजगी इसम  (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) 

▶️ *लाचेची मागणी-

 ७,५०,०००/- रुपये.

▶️ *लाच स्विकारली*  ३,००,०००/- रुपये. ( पहिला हप्ता)

▶️ *हस्तगत रक्कम*- ३,००,०००/- रुपये.

▶️ *लाचेची मागणी दिनांक*- २१/०५/२०२१. 

▶️ *लाच स्विकारली दिनांक*- २१/०५/२०२१, रोजी १३.१५ वा. 

▶️  *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार या आरोपी क्र.२ यांचे संस्थेत शिक्षीका म्हणून काम करित आहेत. त्यांचे रिक्त अनुदानित शिक्षक जागेवर नेमणूक आदेश काढण्यासाठी आरोपी क्र १ यांचे करिता आरोपी क्र् २ यांनी  साडे सात लाख रुपये लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ३ लाख रुपये स्विकारताना आज रोजी आरोपी क्र. २ यांना सापळा पथकाने पकडले व आरोपी क्र १ यांनी सदर लाच घेण्यासाठी आरोपी क्र २ यांना प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा नोंद .

▶️ *सापळा अधिकारी* श्रीमती माया मोरे  पो.उप. अधिक्षक,                                                                  संतोष शेवाळे पोलीस निरीक्षक,   एसीबी ठाणे.

▶️ *सापळा पथक*  पो.हवा/परदेशी, पोना/तारी,  पोना  /तडवी, पोना /भवारी मपोना/ ठोंबरे, पोशि/जाधव 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

मा.श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.

मा.श्री.मुकुंद हातोटे सो. अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.


सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग ठाणे

anti corruption bureau. dial (1064) toll free_makarand asaspure

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933

 🤭 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 😡

🤳 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन  
ACB हेल्पलाईन-1064 टोल फ्री

✊ कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.
त्यासाठी लाच का द्यायची?

👊 लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 📜 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

💁‍♂️ ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा


शनिवार, मे २२, २०२१

रिवर्स सापळा कार्यवाही : पोलीस निरीक्षकास 25 हजाराची लाच प्रलोभन देताना एसीबीच्या पथकाने तीघांना रंगेहाथ पकडून घेतले ताब्यात

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


आदरणीय सर

रिवर्स सापळा कार्यवाही

➡ घटक :- अकोला

➡ तक्रारदार :- लोकसेवक     

       पुरुष वय 45,    

       व्यवसाय- नोकरी,पोलीस  

       निरीक्षक,पोस्ट.दहीहंडा जि.  

       अकोला.

➡ आरोपी :- 1) शिवा 

    गोपाळराव मगर वय.30 वर्ष , 

    रा. अकोट ता.अकोट जि.    

     अकोला 

2)अभिजित रविकांत पागुत    

     वय .31 वर्ष. रा.अकोट

     ता. अकोट जि. अकोला

3) घनशाम गजानन कडू रा.

      लोतखेड ता. अकोट जि.             

     अकोला 

पडताळणी दिनांक :- 20/5/2021, 21/05/2021

➡️सापळा दिनांक :-

       21/5/2021       

➡️ लाच प्रलोभन :- रु.  

       50,000/- 

➡️ लाच दिली :- रु. 25000/- 

       तडजोडी अंती पहिला हप्ता

➡ हकीकत :- गैरअर्जदार क्रमांक 1यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 ,3 व इतर यांचे साठी तक्रारदार लोकसेवक यांचे पोस्टे हद्दीत दारू,वरलीम मटका अशे अवैध धंदा सुरु करण्यासाठी तक्रारदार लोक सेवक यांना 50,000 रु. लाचेचे प्रलोभन देऊन तडजोडीअंती 25,000 रु. लाच प्रलोभन म्हणून लाचेचा पहिला हप्ता देण्या करीत आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी प्रोत्साहन देवुन, 25000/- रुपये. लाच रक्कम ठरल्या प्रमाणे आरोपी क्रं.1,2,3 यांनी तक्रारदार लोकसेवक यांना देतांना त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

▶️कारवाई पथक-श्री.शरद मेमाणे ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अकोला , पोलीस हवालदार अन्वर खान पोलीस नाईक संतोष दहीहाडे पो ना , सुनील येलोने सर्व ला.प्र.वि.अकोला 

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग वाशिम

*दुरध्वनी क्रं 0724 2420370* 

*@टोल फ्रि क्रं 1064* मोबाईल नंबर - 9923416630

------------------------------

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933

 🤭 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 😡

🤳 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन  
ACB हेल्पलाईन-1064 टोल फ्री

✊ कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.
त्यासाठी लाच का द्यायची?

👊 लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 📜 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

💁‍♂️ ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यशस्वी सापळा कार्यवाही : लाचखोर रास्त भाव धान्य दुकानदार अज्ञात लोकसेवकाच्या नावाने 500 रु लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


आदरणीय सर,

▶️घटक - अकोला

▶️तक्रारदार - पुरूष, वय 46 वर्ष, रा.महात्मा फुले नगर,स्मशानभूमीजवळ, सिंधी कॅम्प, अकोला

▶️आरोपी - उत्तम बळीरामजी सरदार(इतर लोकसेवक), वय 71 वर्ष, व्यवसाय- रास्त भाव धान्य दुकानदार, रा सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.

▶️लाच मागणी - रु 1000/- दोन किस्ती मध्ये

▶️लाच स्विकारली - पहिली किस्त म्हणून रु 500/- स्वीकारले

▶️पडताळणी- दि.

       20/05/2021

▶️सापळा कार्यवाही - 21/05/2021

▶️घटनास्थळ - सरकारी रास्त भाव धान्य दुकान क्र 90, सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.

▶️कारण - तक्रारदार यांना 7 रुपये प्रती किलो रेशनकार्ड च्या ऐवजी 2 रुपये प्रती किलो धान्याचे रेशनकार्ड बनवून देण्याकरिता अज्ञात लोकसेवकाच्या नावाने शासकीय पंचासमक्ष रुपये 1000/- लाचेची मागणी करून पहिली किस्त म्हणून रुपये 500/- स्विकारले. आरोपी (इतर लोकसेवक) यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

➡तपासी अधिकारी-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला

▶️कारवाई पथक-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला, पो. अम. राहुल इंगळे, श्रीकृष्ण पळसपगार,निलेश शेगोकार, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------


सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933

 🤭 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 😡

🤳 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन  
ACB हेल्पलाईन-1064 टोल फ्री

✊ कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.
त्यासाठी लाच का द्यायची?

👊 लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 📜 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

💁‍♂️ ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

धक्कादायक ! Conviction Report लाचखोरास कारावासाची शिक्षा : लाचखोरास 10 हजार लाच मागणी पडली महागात ! लाच प्रकरणात विशेष न्यायाधिशाने लाचखोरास 3 व 4 वर्षाच्या सक्त मजूरी व 10 हजार दंडाची दिली सजा

 लाच देणे आणि घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


Respected Sir,

 Good Afternoon,

 Conviction Report

    Satara Unit

➡ दिनांक-२६/०२/२०२१

➡ स्पे.केस नं. ०५/२०१५

➡ पो.स्टे. :- वाई पोलीस स्टेशन                               ➡ गु.र.नं. :- २७/२०१४

➡ आलोसे :- कृष्णात यशवंत मुळीक,  वय-४७ वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भुमी अभिलेख वाई, रा.प्लॉट नं.१६, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई, ता.वाई जि. सातारा, वर्ग-३, खाते - मोजणी खाते.                                                            ➡लाच मागणी रक्कम :- १२,०००/-                           ➡लाच स्विकारली रक्कम :- १०,०००/-

➡कोर्ट :- श्री.एन.एल.मोरे, विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, सातारा.

➡ तपासी अधि. :-   १) श्री. श्रीहरी पाटील, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, २) श्री.बयाजी कुरळे, तत्कालीन पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा

➡️ पैरवी अधिकारी :- श्री. अशोक शिर्के, पोलीस उप अधीक्षक,पो हवा. काटवटे  

प्रतिबंधक विभाग, सातारा

➡एपीपी :- श्री. एल. के. खाडे.

➡ शिक्षा :- आलोसे यांस ला.प्र.का.कलम ७ अन्वये - ३ वर्ष सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड, तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये - ४ वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड,

 Regards

शुक्रवार, मे २१, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर महिला सरपंच व सरपंच पतीने 5 हजाराची मागितली लाच ! एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्याचा संशय येताच काढला पळ

 लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे


 उस्मानाबाद,दि 18 मे 2021 : उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा ग्रामपंचायत ची महिला सरपंच व पतीने एका युवकाकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र सापळ्याचा संशय आल्याने सरपंचपतीने पैसे न स्वीकारताच पळ काढला. 

तक्रारदार युवकाची उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावच्या शिवारात शेती आहे. यापैकी एका एकरात या तरुणाने शासनाच्या फळबाग योजनेतून शेवग्याचे पीक घेतले आहे. या पिकाच्या मशागतीकरिता संबंधित तरुण हा मस्टर मागणीवर स्वाक्षरी घेण्यासाठी १० मे रोजी सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे हिच्याकडे गेला होता. घरामध्ये तेव्हा सरपंचपती विश्वनाथ कांबळे हाही हजर होता.मस्टर मागणीवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली असता, सरपंच महिलेने पूर्वीच्या ५ मस्टरचे प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५ हजार रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम विश्वनाथ कांबळे याच्याकडे दिल्यानंतरच मस्टर मागणीवर स्वाक्षरी करू,असे सांगितले. त्यामुळे तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तरुण लाचेची रक्कम घेऊन सरपंचपती विश्वनाथ कांबळे याच्याकडे गेला. मात्र विश्वनाथ कांबळे याला संशय आल्याने त्याने रक्कम न स्वीकारताच तेथून काढता पाय घेतला.

याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री बेंबळी ठाण्यात लाचखोर महिला सरपंच व तिच्या पती विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✍️✍️✍️

पत्रकार

संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर

7767912933 

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 

 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन ACB हेल्पलाईन 1064 टोल फ्री

 कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.त्यासाठी लाच का द्यायची?

लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

 👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇

व्हिजीट, पाकीट आणि व्हायरस _श्री रवींद्र पांडुरंग बोरकर सहाय्यक लेखाधिकारी

 


The system has not COLLAPSED. 

It was always like this. 

It has been EXPOSED.

                 काही ठराविक शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांची व्हिजीट आणि पाकीट याच एक अनोखं नातं आहे, किंबहुना पाकीटासाठी व्हिजीट आणि व्हिजीट दिली की पाकीट हे समीकरणच बनले आहे, ही पद्धत कोणी सुरू केली हे माहीत नाही परंतु ती अनेकांच्या अंगवळणी पडली हे तितकेच खरे. मला १४ वर्षांच्या शासकीय नोकरीत पाकीट स्विकारण्याचा कधी प्रसंग आला नाही. मूळातच ईश्वर कृपा, आई वडिलांची पुण्याई आणि गुरूंचे आशीर्वाद यामुळे मला कोणत्याही आर्थिक तडजोडी/वशिल्याशिवाय सातारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ लेखाधिकारी पदावर थेट नियुक्ती (सरळसेवा) मिळाली, पोस्टींगही सोयीस्कर वित्त विभाग जि.प. सातारा, आणि वेतन श्रेणीही चांगली (साधारणपणे PSI, नायब तहसीलदार यांच्याशी मिळतीजुळती) त्यामुळे आर्थिक प्रलोभने व वरकमाई पासून दूर राहायचे असा निश्चय नोकरी स्वीकारली त्यावेळीच केला होता अर्थात त्याला घरातील संस्कार व सत्संग याचीही किनार होती. वाढती बेरोजगारी व जीवघेण्या स्पर्धेच्या काळात माझ्यासारख्या पारंपारिक शिक्षण घेतलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पहिल्याच प्रयत्नात अधिकारी पदावर स्वतःच्या जिल्हयात शासकीय नोकरी मिळणं यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट कोणती? अर्थात ती काही सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी खुप संघर्ष करावा लागला परंतु नोकरी लागल्यावर आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि इच्छापूर्ती झाल्याचे समाधान यापुढे तो कमीच होता. नोकरी मिळाल्याने मी खुप खुश होतो विशेषतः माझ्या आईची मनोमन फार इच्छा होती की मला शासकीय नोकरी मिळावी आणि झालंही तिच्या मनासारखं.

           माझ्या गरजा मर्यादित असल्याने मिळणाऱ्या सुविधा आणि वेतनात मी खुप समाधानी होतो आणि आहे तसेही शासकीय नोकरदाराची व कुटुंबाची, दयाळू शासन खुप काळजी घेते व त्यासाठी पेन्शन, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती, विमा संरक्षण, लसीकरण इत्यादी तरतुदी केलेल्या आहेत. शासकीय कर्मचारी असल्याने सध्या कोरोना महामारीच्या काळात खाजगी हॉस्पिटल्समधील कोविड पेशंटची बिले ऑडिट करण्यासाठी एप्रिलमध्ये "ऑडीटर" नेमणूकीची ऑर्डर आली, आपत्कालीन कायद्याचा आदर करून आणि मा.जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मी कामाला लागलो. पंचायत समिती कार्यालयात March ending ची कामे सुरू होती तरीही बिले तपासणीच्या अनुषंगाने मी एका हॉस्पिटलला व्हिजीट दिली आणि PPE Kit घातलेले डॉक्टर माझ्या समोर भेटीला आले, मी थोडासा बावचळलो आणि २ मीटर अंतर रहावे म्हणून खुर्ची मागे घेतली कारण थोड्याच वेळापूर्वी मी त्यांना बाहेर स्वॅब घेताना लांबूनच पाहिलं होतं, त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सध्या पुरेसा स्टाफ मिळत नसल्याने अशी कामे करावी लागतात असे सांगितले. अर्धा कप चहा घेत व्हिजीट रिपोर्ट लिहीला आणि शासन नियमानुसार व निकषानुसार बिले आकारणी करणेबाबत सूचना देऊन तसेच बिलांबाबत तक्रारींकरिता संपर्क साधण्यासाठी फोन/मोबाईल नंबर्स दर्शविणारा फलक हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डावर लावून त्यासोबत डॉक्टरांचा व माझा फोटो घेऊन मी तेथून निघालो. 

            त्यानंतर पुन्हा एका हॉस्पिटलला व्हिजीट दिली. तेथील डॉक्टर दांपत्याने मला अटेंड केले त्यांना मी बिल आकारणी बाबत प्राथमिक सूचना दिल्यानंतर व्हिजीट रिपोर्ट लिहीत असताना डॉक्टरांनी एक पांढऱ्या रंगाचे पाकीट ऑफर केले आणि मी आश्चर्यचकित झालो कारण १४ वर्षांच्या नोकरी पहिल्यांदाच आणि पहिल्याच भेटीत मी पाकीट बघितले होते परंतु ज्या सहजतेने त्यांनी ते पुढे केले त्याच सहजतेने मी स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला, मी लाजलो असा समज करून त्यांनी पुन्हा ते पाकीट बक्षीस म्हणून घ्यावे असे सांगितले, मात्र मी निर्णयावर ठाम होतो, पुन्हा बाहेर नोटीस बोर्डा शेजारी फोटो सेशन झालेनंतरही त्यांनी परत एकदा विचारले परंतु तेथेही मी नकार दिला कारण आमचं ठरलंय. 

          पाकीट बऱ्यापैकी फुगलेले होते, त्यात किती रक्कम होती हे मला माहित नाही आणि मी ते विचारलेही नाही, आता ज्या गावाला जायचे नाही त्या गाडीची चौकशी कशाला? कदाचित असतील ५ ते १० हजार. मी कायम पाकीटा पासून अलिप्त होतो आणि आहे अगदी माझ्या लग्नातही आहेर पाकीट आणू नये असे लग्न पत्रिकेत छापले होते. घडल्या प्रकाराबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यातील एक म्हणजे शासकीय यंत्रणेला गृहीत धरण्यात "डॉक्टर तुम्ही सुद्धा" ? 

           पुढच्याच आठवड्यात मी त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनाबाधित पेशंटची बिले तपासत होतो, पाकीट प्रकारामुळे मनात संशयाची पाल चुकचुकत होतीच, cross check म्हणून सहजच एका बिलावरील मोबाईल नंबरवर पेशंटच्या नातेवाईकांना फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये भरलेल्या बिलाची रक्कम विचारली आणि माझा संशय खरा ठरला कारण मला ऑडिटसाठी सादर केलेले बिल हे कमी रकमेचे आणि प्रत्यक्ष पेशंटकडून घेतलेले बिल जास्त रकमेचे होते म्हणजेच हॉस्पिटलमध्ये २ प्रकारची बिल बुके ठेवून व बिले बनवून अवाजवी बिल आकारणी व कलेक्शन सुरू होते व आहे. अशा प्रकारे २ भिन्न बिलांव्दारे शासकीय यंत्रणेच्या ऑडीट सिस्टीमला चकवा देण्यात येत होता व आहे. याबाबतचा रिपोर्ट मी संबंधित यंत्रणेला पाठविला आहे तसेच आकारणी केलेले जादा बिल संबंधित पेशंटला परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. आता मला व्हिजीटच्या पाकीट प्रकरणाचा उलगडा झाला माझ्या ऑडीटर धर्मापासून (कर्तव्यापासून) मला परावृत्त करण्यासाठीच ते पाकीट बक्षीस म्हणून ऑफर केले होते व त्यातील रक्कम संबंधित डॉक्टरांच्या खिशातील नसून सर्वसामान्य रूग्णांकडून केलेल्या जादा आकारणीचा एक भाग होती. 

           एकीकडे "रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" मानून काम करणारे काही डॉक्टर्स आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली वाहत्या गंगेत हात धुऊन घेणाऱ्या अपप्रवृत्तीही आहेत. आरोग्य व्यवस्थेतील काही बेफिकीर व निर्ढावलेल्या व्यक्तींमुळेच व्यवस्थेची अशी अवघड व नाजूक अवस्था झाली आहे हे भंडारा, नाशिक, विरार इत्यादी ठिकाणच्या आगीच्या दुर्घटनांवरून दिसून आले आहे त्या घडून आल्या आणि निष्पाप नवजात बालकांचा व रुग्णांचा नाहक जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना वेळीच व प्राधान्याने डोस देऊन "break the chain" ची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. सध्या या यानिमित्ताने कोलमडलेली आरोग्य व्यवस्था उघड झाल्याचे एका प्रतिथयश डॉक्टरांनी केलेले खालील twitt विचारात घेण्याजोगे आहे. 

The system has not COLLAPSED. 

It was always like this. 

It has been EXPOSED.

            आगामी काळात आपण समर्पित कोरोना योध्दयांचे प्रयत्न व परिश्रम, शासनाने केलेले नियम व त्रिसूत्री पाळुन आणि लसीकरणाच्या माध्यमातून कोविड-19 या अदृश्य व्हायरसचा मुकाबला करून कोरोनावर नक्कीच मात करु पण माणसांसह संपूर्ण आरोग्य व्यवस्था I.C.U. मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवणाऱ्या काही अपप्रवृत्ती आणि त्या पाकीटातील दृश्य व्हायरसच काय? हाच खरा प्रश्न आहे.


श्री रवींद्र पांडुरंग बोरकर

सहाय्यक लेखाधिकारी

पंचायत समिती खंडाळा

रा.वाई, जि.सातारा

मो.नं.९८५०४१४३३१


बालदोस्तांसाठीची धम्माल कविता : हसरी फुले(बालकाव्य)-डॉ.शुभांगी गादेगावकर

 


घर कसे ही असले तरी त्या घराला अंगण आणि अंगणात आनंदाने खेळणारी मुले असतील तर त्या घराचा स्वर्ग निर्माण होऊ शकतो. घराला घरपण येते. ही लहान मुले नभांगणातल्या ता-यांसारखी आणि वेलींवरच्या फुलांसारखी असतात. आनंदाने बहरत असतात, फुलत असतात आणि वाढतही असतात. म्हणूनच कवयित्री डाॅ. सौ.शुभांगी गादेगावकर या मुलांना हस-या फुलांची उपमा देतात. त्यांची ही कविता म्हणजे बालदोस्तांसाठी धम्माल उडवणारी आहे.

    डॉ. शुभांगी गादेगावकर या ठाणे जिल्ह्यातील असून भाईंदर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.'बन्याच्या गमतीजमती' हा बालकथासंग्रह तर 'आशेची पालवी','चूक कोणाची?','मला रक्त हवंय' या कादंब-या, अपूर्व रंगावली इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या बालकथेस मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

     घरात असता हसरे तारे.. पाहू कशाला नभाकडे हे गीत आपण खूपदा ऐकलेले आहे. कवयित्रीची कविता याच आशयाची आहे. बालकांच्या बाल अवस्थेची ओळख करून देत मुलांना मनोरंजनातून प्रबोधनही करतात. कवयित्री म्हणते, निसर्ग बालकाला नेहमीच खुणावत असतो. झाडे, वेली, भिरभिरणारी फुलपाखरे ,चिमण्या, काळे काळे ढग, वेलींवरची फुले, जत्रेतली खेळणी, घरातली लहान मनीमाऊ त्याला हवी हवीशी वाटतात. यात ते रममाण होते. आनंद लुटण्याचा प्रयत्न करते .या लहान मुलांच्या मनातली भावना कवयित्री कवितेतून सागण्याचा प्रयत्न करत आहे. 

फुला फुला फूल रे

वा-यासंगे डूल रे

मनामनातून हसणारे हे फूल त्याला हात लावले तर घाण होईल. अशा फुलांना त्रास देऊ नका. असे कवयित्री फुलांची उपमा देऊन मुलांसाठी लिहिते. 

भातुकलीचा खेळ मांडणारी ही निरागस मुले आनंदाने खेळताना भान हरपून जातात. तल्लीन होऊन जातात. मोबाईल खिशात ठेवणे म्हणजे जग खिशात ठेवल्यासारखे वाटते. म्हणजे मोबाईलवर जगाची माहीती लवकर मिळत असते. नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे कवयित्रीला वाटते. नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करूया. नवी क्रांती घडवूया असे वाटते. 

मोबाईलवर शिका तुम्ही

घरबसल्या खूप काही

मोबाईल ठेवा खिशात

जग आपल्या हातात

संपूर्ण जगाला भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पर्यावरण -हासाचा. पर्यावरण बिघडल्यामुळे माणसांच्या जीवनचक्रात कसा बिघाड होत आहे. त्याकरिता पर्यावरण चळवळी उभारल्या पाहिजेत. आज कोरोनाच्या विषाणूचा उपद्रव वाढला. शुद्ध हवा मानवाला मिळत नाही. वृक्षसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यास खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कवयित्री वृक्षांचे महत्त्व मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. 

झाड देते छाया

ठेवा निर्मळ काया

फळ देतात मधुर रस

जीवन करा तुम्ही सरस

निसर्गाची ओळख करून देतांना पाखरांच्या आवाजांची ओळख करून देते. कावळा काव काव, चिमणी चिवचिव, कबूतर गुटरगू, कोकीळ कुहूकुहू असा आवाज मुलांना गोड वाटतो. मुलं तशीच अनुकरण करत असतात. मुलांना स्वप्न पडतात पण सकाळी ती स्वप्ने खोटे वाटू लागतात. स्वप्नात लाॅटरी लागून करोडपती झाला आणि सकाळी उठल्यावर काय तर आहे त्या ठिकाणीच. 

स्वप्नात लागली लाॅटरी

भरुन गेली तिजोरी

स्वप्न दिसले सुंदर मोठे

सकाळी कळले सगळेच खोटे

शेतात राबणारा शेतकरी, दवाखान्यात राबणारा डाॅक्टर, शाळेत राबणारा शिक्षक हा कसा असतो हे मुलांना विचारत कवयित्री उत्तरे काढून घेते. तर मन किती चपळ आणि एका जागेवर कधीच बसत नाही. त्याला ताब्यात घेणेही खूपच अवघड काम. सैरावैरा फिरणा-या स्वच्छंदी पाखरांसारख मन असते. म्हणूनच मुलांना मनाबद्दल कवयित्री सांगते. बहिणाबाई चौधरी यांनीही मनाला उभ्या पिकावर धाऊन जाणा-या ढोरांची उपमा दिली आहे. अशी मनाची अवस्था असते. 

मन स्वैर पाखरु

कसे त्याला आवरु

नव्या आशा, नवी उमेद घेऊन आपण जीवन आनंददायी जगले पाहिजे. या जीवनाचे नवे गीत आपण गाऊया अशी कवयित्री लिहिते. नदीच्या प्रवाहासारखे आपले जीवन वाहत असते. निसर्ग चक्र सोबत घेऊन जगत असते. आपणासही असेच जगावे लागते. 

झुळझुळ झुळझुळ नदी वाहते

सळसळ सळसळ करती पाने

आनंदाने आपण गाऊ

नूतन जीवन गाणे

'जाण' या कवितेतून कवयित्री  आपण सुजाण नागरिक असल्याचे सांगते.आपण संस्कारक्षम, सुविचारांच्या आणि सुजलाम भूमीत जन्मलेले आहोत. नागरिक कसा असावा असे कवयित्री लिहिते. 

कर्तव्याचे करावे पालन

अधिकारांचे सदैव रक्षण

लोकशाही सुराज्याचे अस्त्र

शिकवते नागरिकशास्त्र

राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे. मांडवासारखा एकत्र हा देश विविध जातीधर्मात बांधला गेला आहे. एकात्मतेची ही बांधलेली मूठ कधीच सोडता कामा नये.आपण सगळे एकाच मातेची मुले आहोत. 

भिन्न जाती, भिन्न धर्म

भिन्न असती जरी कर्म

सगळ्यांची एकच माता

भारत भूमी असे विधाता

हसत खेळत मुलांना आनददायी प्रवाहात आणण्यासाठी कवयित्री प्रयत्न करते आहे. कारण बाल अवस्थेतच बालकांना योग्य वळण लावता येते. योग्य संस्कार आणि ज्ञान दिले तर देशाचा पाया मजबूत होईल अशी आशा कवयित्रीला वाटते. डॉ. मधुसूदन घाणेकर यांची प्रस्तावना आहे. मुखपृष्ठ पूजा बागूल यांनी रेखाटले आहेत. आतील चित्रे डॉ. शुभांगी व कु.ओम गादेगावकर यांनी रेखाटली आहेत. कवयित्रीच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 

         प्रा. रामदास केदार

           ९८५०३६७१८५


हसरी फुले 

(बालकाव्य) 

डॉ.शुभांगी गादेगावकर

९६१९५३६४४१

समीक्षा पब्लिकेशन्स 

पृष्ठे ६०,किंमत १२०

(कुरिअर सह मूल्य १२० रू.)

गुगल पे नं ९८६९१५८७६०

गुरुवार, मे २०, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर मुख्याध्यापक 400 रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने लाचखोराविरुद्ध केला गुन्हा दाखल



*== प्रेसनोट ==*

*लाचेची मागणीवरून गुन्हा दाखल केले अहवाल*

▶️ *युनिट -* पालघर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-53 वर्षें,  

▶️ *आरोपी-* चंद्रकांत विष्णु जाधव, मुख्याध्यापक, मासवन हायस्कूल मासवन, ता.जि. पालघर             

▶️ *लाचेची मागणी-* ४००/- रुपये

▶️ *लाचेची मागणी -* ता.०८/०२/२०२१

▶️ *लाचेचे कारण -*. तक्रारदार हे पेशाने प्रयोगशाळा सहायक असून आलोसे यांनी तक्रारदार यांचे पगार बिल तयार करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे बिल तयार करण्यासाठी ३५०/- रु. मागणी करत असल्याचे तक्रारीवरून पडताळणी करण्यासाठी दि.०८/०२/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंच क्र 1 यांचेसोबत आलोसे यांचे कार्यालयात पाठवले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना ४००/- रु. लाचेची मागणी केली. दि ०९/०२/२०२१ रोजी लाचेची रक्कम घेऊन आरोपी यांच्याकडे देण्यास गेले असता आरोपी यांनी लाचेचा स्वीकार केला नाही म्हणून मा.पोलीस अधीक्षक ठाणे याचे आदेशानुसार आज दि.२०/०५/२०२१ रोजी १४.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.                                 

▶️ *पडताळणी पथक -* भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोना/चव्हाण , पोशी/ उमतोल, चापोशि/ दोडे,                                           

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी -* 

शिक्षणाधिकारी पालघर 

----------------------------------------


*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर 

*@ दुरध्वनी 02525-297297*

*पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप *मोबा.क्रं*9923346810*

*पोलिस निरीक्षक भारत साळुंखे मो.नं.9923699430*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

ब्रेकिंग न्यूज-लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उप-विभागीय अधिकारी (dysp) 5 लाख लाचेची मागणी करून 2 लाख लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने महा लाचखोरासह लाचखोर पो.नाईक व लाचखोर पो.कॉन्सटेबल ला रंगेहात पकडून केले जेरबंद

 



➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- पुरुष वय-55 वर्ष.

➡ आरोपी लोकसेवक :- 1) सुधीर अशोक खिरडकर (डिवायएसपी) वय 45, पोलीस उपविभागीय अधिकारी. जालना, जि. जालना.रा.प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबडचौकी, जालना,वर्ग 3

2) संतोष निरंजन अंभोरे वय .45 वर्ष. 

पो.ना.246 नेम.कदिम पो.स्टे. जालना. रा.पोलीस लाईन जालना.

3) विठ्ठल पुंजाराम खार्डे

पो.काॅ./162 नेम.एस.डी.पी.ओ.जालना कार्यालय

रा. मु.पो. कडवंचीवाडी, ता. जि. जालना.

पडताळणी दिनांक :- 18/5/2021, 19/05/2021

➡️सापळा दिनांक :-

 20/5/2021       

➡️ लाच मागणी :- रु. 5,00,000/- 

तडजोडीअंती मागणी 3,00000/-  

➡️ लाच स्विकारली :- रु. 200,000/- 

➡ हकीकत :- तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आलोसे यांनी 5,00,000 रु. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 300,000 रु. लाच रक्कम मागणी करुन, प्रोत्साहन देवुन, 200000/- रुपये. लाच रक्कम आलोसे क्रं.2 यांनी स्वीकारले असता, त्यांना रंगेहाथ पकडले आहे. 

महा लाचखोर dysp

➡ सापळा पथक : -

पो उप अधीक्षक. श्रीमती. वर्षांराणी पाटील,

पोलीस निरीक्षक. 

सुनील क्षीरसागर, 

पो.हवा. नवनाथ वाळके,

पो.कॉ. किरण चिमटे

पो.काॅ. दिनेश माने, ला.प्र.वि. पुणे.


पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ला.प्र.विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपणास कोणी सरकारी नोकर अथवा खासगी इसम सरकारी कामाकरीता लाच मागितली तर अँटी करपशन ब्युरो पुणे येथे संपर्क साधावा.

लाच प्रकरण : महा लाचखोर वन परिमंडल अधिकारी,लाचखोर महिला वनरक्षकासह अन्य एका लाचखोर वनरक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात, एकूण लाचखोरांची संख्या तीन


नाशिक, दि. 20 : वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी खोदलेल्या चरीबाबत कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वणी (ता. दिंडोरी) येथे कार्यरत वन विभागातील त्रिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदाराने त्याच्या चिंचखेड गावातील शेतजमिनीचे बाजूस असलेल्या वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी चारी खोदली होती. त्याप्रकरणी तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी वन परिमंडल कार्यालयाकडून एक लाख रूपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती ही रक्कम पन्नास हजार ठरवण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचण्यात येऊन वन परिमंडल अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मान गणी गणीमलंग सय्यद आणि वनरक्षक सुरेखा अश्रुबा खजे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आला. या तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार...

 


By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले
नवी दिल्ली,दि 20 मे 2021 : नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील ६ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर २००० रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली ही सर्वात मोठी शेतकरी संबंधित योजना आहे आणि प्रत्येक शेतकर्‍याचा फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, जेणेकरून शेती संकट संपेल.सर्व प्रथम  आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.जर हे लोक आपले म्हणणे ऐकत नसतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.

   सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसान हेल्प डेस्क (पीएम-किसान हेल्प डेस्क) वर ईमेल (ईमेल) pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधता येईल. तेथूनही  काही फरक पडत नसेल तर या सेलच्या फोन नंबर 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) वर कॉल करा.

   केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचले नाहीत तर ते सोडले जातील. तसेच चौधरी म्हणतात की, जर पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर पोहोचले नाहीत किंवा तांत्रिक अडचण आली असेल तर तो प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडविल्या जाईल. ते म्हणाले, 'आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे, म्हणूनच सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत वचन दिल्याप्रमाणे या योजनेचा विस्तार केला."

शेतकरी सतत तक्रारी करीत आहेत

    गेल्या अनेक महिन्यांपासून किसान सन्मान निधी योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणीकृत शेतकर्‍यांनाही पैसे मिळत नसल्याची तक्रार येत आहे. काही गावात दोन शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, तर काही शेतकरी असे आहेत की ज्यांचा पहिला हप्ता अजूनही त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही. काही लोकांना त्यांच्या खात्यात पहिला हप्ता मिळाला आहे आणि दुसरा हप्ता मिळालेला नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांचे लेखापाल आणि कृषी अधिकारी यांना विचारावे की त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. जर ते असेल तर मग पैसे का आले नाहीत ते त्यांना विचारा. आपणास उत्तर न मिळाल्यास योजनेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकर्‍यांना सरकार पैसे देऊ इच्छित आहे. जर शासनाचा हा हेतू पूर्ण करण्यात एखादा अधिकारी अडथळा ठरत असेल तर त्याची माहिती द्या.
 
   आपण या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. दिल्लीमधील त्याचा फोन नंबर 011-23382401 आहे, तर ईमेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.

बुधवार, मे १९, २०२१

शासकीय रूग्नालयांची विश्वासार्हता कमी कशामुळे झाली? का जाणीवपूर्वक कमी केली !

 

By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले मरवाळीकर

आज कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले व पडत आहेत परंतु समाजातील सर्व स्तरातील लोकांचा उपचार घेण्याचा कल हा खाजगी रूग्नालयाकडेच दिसतो हे वास्तव आहे. जवळ पैसा उपलब्ध नसला तरी कर्ज काढून उपचार हे खाजगी रूग्नालयामध्येच करण्याकडे लोकांचा कल आहे. यामागचे नेमके कारण काय हे तपासणे गरजेचे आहे. कारण खाजगी रूग्नालयामध्ये लाखो रुपये भरावे लागत असले तरी ती देण्याची तयारी गरीबातला गरीब दाखवतो परंतु पीएचडी झालेले डॉक्टर तेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी लोक धजत नाहीत ही विचार करण्यासारखी बाब आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी रूग्नालयातील एक डॉक्टर शेकडो पेशंट तपासत असतो नेमके त्याच्या उलट शासकीय रुग्णालयात एका पेशंटला शेकडो डाॅक्टर तपासू शकतात ! हे माहित असून सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाही. तसे पाहिले तर सामान्य नागरीकांसाठी शासकीय रुग्नालये ही एक वरदान आहेत कारण केसापासुन नखापर्य॔तचे सर्व स्पेशालिस्ट असणारे एकमेठ ठीकाण म्हणजे शासकीय रुग्नालये आहेत. विशेषता खाजगी रूग्नालयामध्ये एखाद्या रुग्णाला ऍडमिट करून घेऊन त्याचा उपचार हाताबाहेर गेल्यानंतर त्या रुग्णास शेवटी शासकीय रुग्णालयांमध्येच पाठवले जाते हेही वास्तव आहे. जर शेवटी त्या रुग्नाला शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागत असेल तर सुरुवातीलाच लोक शासकीय रुग्णालयात का जात नाहीत? नागरीकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सरकारी रुग्णालयात बहुतांश कधीच चुकीचे उपचार होत नाहीत त्याचे कारण असे की या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना असलेल्या भरमसाठ पगारी ! तुमचा चुकीचा उपचार करून एवढ्या मोठ्या पगारीची नोकरी अडचणीत आणणे हे त्यांनाही परवडणारे नाही यामुळे त्यांच्याकडून उपचाराला दिरंगाई होऊ शकते परंतु चुकीचे उपचार कदापिही होणार नाहीत तसेच रुग्णाला आवश्यक असेल त्याच प्रमाणामध्ये औषधाचा डोस दिला जातो याउलट खाजगी रुग्णालयामध्ये हाय डोस देऊन रुग्णाला उपचार दिले जातात ज्यामुळे रुग्णांची शारीरिक हानी होते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या खाजगी रुग्णालयामध्ये तुम्ही उपचार घेत आहात त्यातील किती रुग्णालयांना दहा वीस बेडची तरी मान्यता आहे का ? हे कधी तपासले का, तर नाही ! परंतु काही बाबीचा जर विचार केला तर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार व्यवस्थित मिळत नाही, या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना व्यवस्थित तपासत नाहीत, या रुग्णालयांमध्ये व्यवस्थीत औषधोपचार मिळत नाही अशी मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये पद्धतशीरपणे रुजवण्यात आली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की सरकारी रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचे त्याच गावांमध्ये असलेले स्वताचे खाजगी रुग्णालये , लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे केलेले सपशेल दुर्लक्ष ,आरोग्य यंञणे बाबतची लोकांची उदास मानसिकता अनेक कारणे असू शकतात. जर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ,समाज सेवेतील कार्यकर्त्यांनी, पत्रकार मंडळींनी याविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करून तसेच सरकारी रुग्णालयातील यंत्रणेवर देखरेख ठेवून जर वाटचाल केली तर निश्चित परिस्थिती बदलू शकते. सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लुटमार थांबू शकते. आज पर्यंत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी कधीच सरकारकडे प्रश्न लावून धरलेले दिसत नाहीत जे गरजेचे आहे यापुढील काळात तरी राजकीय कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामान्यांची लूटमार होऊ नये यासाठी सामान्य जनतेमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत जनजागृती करून यंत्रणा सुधारण्यासाठी व बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


Popular posts लोकप्रिय पोस्ट