🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, सप्टेंबर ०२, २०२१

पंचायतराज समितीने साधला लोकप्रतिनिधी, पदाधिका-यांशी संवाद

 


नांदेड : पंचायतराज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी जिल्हा परिषद पदाधिका-यांची चर्चा करण्यासाठी दि.२ रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलविली होती. शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत खासदार,आमदार व जि.प. पदाधिका-यांनी विविध मागण्यांवर चर्चा केली.मात्र समितीच्या या पहिल्याच बैठकीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे काहिसे नियोजन बिघडल्याचे दिसून येताच समिती सदस्यांनी अधिका-यांना चांगलेच सुनावले.

पंचायतराज समिती दि.२ ते ४ सप्टेंबर दरम्यान तीन दिवस नांदेड दोै-यावर आली आहे.या दौ-याची जिल्हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे.नियोजीत दौ-यानूसार पहिल्या दिवशी दि.२ रोजी सकाळी १०. ३० च्या सुमारास सेनेचे खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर,आ.शामसुंदर शिंदे,आ.राजेश पवार यांनी समितीच्या सदस्यांची चर्चा केली.यानंतर ११ वाजता जि.प. पदाधिका-यांशी समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर , आ. अमर राजूरकर व इतर सदस्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत संवाद साधला.

जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,उपाध्यक्षा सतपलवार,सभापती अ‍ॅड.रामराव नाईक, संजय बेळगे,बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह इतर सदस्यांनी मागण्यांचे निवेदन देत विविध विभागातील अडचणीवर चर्चा केली. दरम्यान पंचायतराज समितीच्या सर्व बैठका इनकॅमेरा घेण्याचे निश्चित झाले असताना विश्रामगृहातील बैठकीसाठी व्हिडीओग्राफर नसल्याचे समितीच्या निर्दशास आले.त्यावेळी बैठकीसाठी व्हिडीओग्राफर का बोलविण्यात आले नाही,यावर अधिका-यांना खडे बोल सुनावले.पहिल्याच बैठकीला काहिसे नियोतन बिघडल्याने जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समितीच्या रोषाला सामोरे जावे लागले.याची चर्चा ब-याच वेळ विश्रागृह परिसरात सुरू होती. या बैठकीनंतर समिती अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी जिल्हा परिषदेस भेट दिली.तेथुन पुढील बैठकीसाठी समिती नियोजन भवनाकडे रवाना झाले. यानंतर येथील दुसरी बैठक ५ वाजेपर्यंत सुरुच होती.

समितीसाठी शाही बडदास्त

पंचायत राज समितीच्या तीन दिवसीय दौ-यास गुरूवार दि.२ सप्टेंबरपासुन सुरूवात झाली असून ४ सप्टेंबरपर्यंत हा दौरा राहणार आहे. या दौ-याच्या अनुषंगाने समितीची शाही बडदास्त ठेवण्याची व्यसस्था जिल्हा परिषदेने केली आहे.समितीला फिरण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त वाहनाचा ताफा दिमतीला देण्यात आला आहे.तर राहण्याची सोय शहरातील दोन अलिशान महागड्या हॉटेलात सोय करण्यात आली आहे.सोबतच जिल्हा परिषदेने व्यवस्था समिती,भोजन,वाहन,बैठक,कोविड व शासकीय असा विविध सात समित्यांची स्थापना करून २४ अधिकारी व कर्मचारी दिमतीला ठेवले आहेत.पंचायत समितीला मोठे अधिकार असल्यामुळे आपल्या झालेल्या चुका कशा दुर होतील.समिती पुढे कसे हजर व्हावे याचे धडेही अधिका-यांना देण्यात आले आहेत. समितीच्या दौ-याचा पहिला दिवस संपला तरी आज पुन्हा अधिका-यांना समितीस तोंड ध्यावे लागणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट