🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१

शुभ मंगल सावधान-पटलं तर टिकलं,नाहीतर फेकलं !

 


        विवाह म्हणजे डीजे डॉल्बीवरचा धिंगाणा आणि मौज मस्ती नाही, तर व्रतस्थ जीवनाचा तो एक शपथविधी आहे. आज या शपथविधीला समाज विसरायला लागलेला आहे आणि विवाहाचे स्वरूप म्हणजे पैशाची उधळपट्टी आणि एक जंगी पार्टी असे झालेले आहे. त्यामुळे उच्चकोटीच्या संस्कृतीने ठरविलेला, त्याच्या पाठीमागे असलेला उदात्त हेतूच गायब झालेला आहे.

     पटलं तर टिकलं, नाहीतर फेकलं !

     असे आज बहुतांशी तरुणांचे वैवाहिक जीवन झालेले आहे. आज लग्न होणाऱ्या तरुणांइतकीच घटस्फोटित तरुणांची संख्या आहे. घटस्फोट घेतलेल्या तरुणाला किंवा तरुणींना पूर्वी इतके चांगले स्थळ कधीच मिळत नाही. 

     ज्या गोष्टीवरून आपला वाद झाला, त्याच्यापेक्षा भयानक तडजोडी त्यांना जीवनात कराव्या लागत आहेत. आई-वडिलांनी लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून आयुष्यभर जपलेल्या आणि स्वतःच्या इच्छा, अपेक्षा मारून जमविलेल्या संपत्तीचे मूल्य, घटस्फोट झाल्यानंतर मातीमोल होते. मुलांची आणि मुलींची काळजी करून आई-वडिलांना जो मनःस्ताप होतो, त्यामुळे जडलेल्या व्याधी आणि खचलेले मन, यामुळे त्यांचे आयुष्य निश्चित कमी होते.

       आपण आई वडिलांना सुख नाही देऊ शकलो तरी हरकत नाही, पण किमान आपल्यामुळे त्यांना दुःख तरी होऊ नये, एवढे तरी काळजी पोटच्या मुलांनी घ्यायला हवी.

       विवाहा सारख्या मंगल आणि पवित्र कार्यात सप्तपदी हा एक अतिशय उत्कृष्ट विधी आहे. ज्याच्या स्मरणाने वैवाहिक जीवनात कधीच दुःख येणार नाही. हा विधी प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या नित्य स्मरणात असायला हवा.

      हा खरा वैवाहिक जीवनाचा शपथविधी आहे. त्यात जबाबदारी, कर्तव्य, समर्पण, प्रेम, त्याग, विश्वास आणि एकनिष्ठतेचे वचन अग्निदेवाला साक्षी ठेवून घेतले जाते आणि दिले जाते. पृथ्वीवर गंगा आणि अग्नि यांना सर्वात पवित्र संबोधले आहे.

       तुका म्हणे गंगा अग्नीशी विटाळ l लावी तो चांडाळ दुःख पावे ll

     संतांनी संबोधलेल्या या दोन्ही गोष्टी विवाह विधीत प्रधान असतात. मंगलाष्टके सुरू असताना वर आणि वधू यांच्या बरोबर मध्ये कलश ठेवलेला असतो, त्यामध्ये गंगा असते आणि त्याच्यावर दोघांच्यामध्ये अंतरपाट धरलेला असतो.

     सप्तपदीच्या वेळी आपल्या पत्नीच्या हाताला धरून, यज्ञकुंड पेटवून, अग्नीला साक्षी ठेवून, शपथ घ्यायची असते. प्रत्येक पावलाला एक वचन, अशी सात वचने शपथ रूपाने दोघांनी स्वीकारायचे असतात. म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये विवाह विधीस *"शुभ मंगल विवाह"* असे म्हणतात आणि आशीर्वाद देताना *"शुभ मंगल सावधान"* असे म्हणतात. हा सावधान शब्द *व्रतस्थ* जीवनासाठी आहे.

    उध्वस्त होत चाललेले संसारिक जीवन आणि मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आपल्याला आपल्या सर्व विधींचा अर्थ आणि बोध झाला, तरच ते टिकणार आहे. आपले वैवाहिक जीवन सुखी होणार आणि राहणार आहे अन्यथा आपल अर्धे आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यात आणि अर्धा पैसा वकिलाची फी भरण्यातच वाया जाणार आहे.

👇उदाहरणा दाखल एक सत्य सांगणारा व्हिडिओ


👇समाजातील वास्तव सांगणारा दुसरा व्हिडिओ


👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट