🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

मनरेगा योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अधिकाधिक गरजू पर्यंत पोहचवावा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही ग्रामीण भागातील रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या गरजूसाठी एक आदर्श योजना असून या योजनेंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या कामांवर अधिकाधिक रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी अधिक सकारात्मक भुमिका ठेवत योजनेला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण, कृषि, कृषिपूरक उपक्रम, सार्वजनिक विहिरी, शोषखड्डे, घरकूल, पालकमंत्री पांदण रस्ते व मजबुतीकरण, बांबु लागवड, फळ लागवड आदी संबंधित कामांवर मजुर उपस्थिती वाढविणे, शेल्फ वरील कामे वाढविणे,अपुर्ण कामे माहे मार्च अखेर पुर्ण करणे, बांबू लागवड व गाळ काढण्‍याची कामे सुरू करण्याची कार्यवाही, रेशीम विभाग मोहिमेंतर्गत सर्व तालुक्यात तूती लागवड, वैयक्‍तीक व सार्वजनिक सिंचन विहीरीचे कामे याबाबत आढावा घेण्यात आला.  


Post by : संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट