पोस्ट्स

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन देव, देश व धर्म लक्षात ठेवून हिंदू समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन संत प्रवासातून संतांनी केले

इमेज
  संत प्रवासामुळे जिल्ह्यात वातावरण भगवेमय झाले संजय पाटील चिखले मरवाळीकर नांदेड,दि.१९ नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने हिंदु समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन विश्व हिंदुपरिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या संत प्रवासात समाविष्ट असलेल्या श्री विरुपक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड, श्री व्यंकटाचार्य स्वामी बालाजी मंदीर संस्थान गाडीपुरा नांदेड, श्री योगीपुरन्नाथ महाराज (सोनखेड), श्री चंद्रकांत महाराज लाठकर, श्री श्रीधर महाराज कासराळीकर, श्री भुजंग महाराज, श्री दुधाटे महाराज, श्री मधुसुदन महाराज कापसीकर, इतर महाराजांनी केली.  या मागचा उद्देश हा फक्त मतदारांसह हिंदुसमाजाने १००% सहभाग नोंदवत देव, देश व धर्मासाठी मतदान करावा हाच असल्याचे विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंदजी शेंडे, प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांत संघटन मंत्री गणेशजी मोकाशी यांचा या अभियानासाठी विशेष प्रवास, कृष्णाजी देशमुख प्रांत कार्यकर्ते, गजानन पांचाळ प्रांत सहसंयोजक, रविकुमार चटलावार वि.हि.प जिल्हाध्यक्ष, गणेशजी म...

ॲंटी करप्शन ब्यूरो, सातारा यांचे वतीने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

इमेज
  संपादक - संजय चिखले मरवाळीकर सातारा,दि.०४ नोव्हेंबर २०२४: राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. या वर्षी दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या दरम्यान केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे ब्रीदवाक्य' सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ' हे ठेवण्यात आलेले आहे. दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील सातारा, कराड, पाटण, जावली (मेढा), महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण, वडूज, लोणंद व फलटण या सर्व तालुक्यातील २७९ शासकीय कार्यालयाचे आवारात व जनजागृती होण्याकरीता टोल फ्रि क्रमांक १०६४ संबंधाने हॅण्डबिलचे वाटप केले. पोस्टर चिकटवले तसेच लोकांना लोकसेवका बद्दल लाच मागणीची   तक्रार देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांची जनजाग...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

इमेज
लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार  संपादक -संजय चिखले मरवाळीकर  मुंबई, दि. २५: भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे. कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, अथवा संकेतस्थळ https://acbmaharashtra.gov.in/ , ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook....

डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांभाळला पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचा कार्यभार

इमेज
New S.P ACB Nagpur संपादक- संजय चिखले नांदेड ,दि.१६/०८/२०२४: दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत भारतीय पोलीस सेवा/ राज्य पोलीस सेवेतील अधिकारी यांच्या बदली/पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर आदेशान्वये पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र येथे डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांची बदली करण्यात आलेली होती. आज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांनी श्री राहुल माकणीकर यांचेकडून पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर पदाचा कार्यभार स्विकारलेला आहे. डॉ. दिगंबर प्रधान यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस) शासकीय मेडीकल महाविद्यालय, मिरज जि. सांगली येथून पुर्ण केलेले आहे. सन १९९८ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. त्यांनी पोलीस उपअधीक्षक या पदावर तासगावं, मिरज, कराड इ. ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. तसेच पोलीस अधीक्षक या पदावर सांगली, कोल्हापूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, महामार्ग सुरक्षा ठाणे इ. ठिकाणी कर...

Dispute Free Village: मरवाळी येथील तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करण्याची निवेदनाद्वारे मागणी,तुमच्याही ग्रामपंचायतीकडे 15 ऑगस्ट पर्यंत करा मागणी, गावातील तंटे गावातच मिटवा

इमेज
  Dispute Free Village संपादक-संजय चिखले मरवाळी,दि.8 ऑगस्ट 2024: गावात तंटे निर्माण होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' राज्यात सुरु करण्यात आली.  नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे मरवाळी/कोपरा ग्रामपंचायत येथील काही सुज्ञ,जागरूक व प्रतिष्ठित ग्रामस्थांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून शासन निर्णयानुसार समितीसाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचे  कुठलेच पालन करण्यात येत नसल्याची बाब ध्यानात आली. मागिल दोन वर्षात समितीने एकही बैठक घेतली नाही तसेच गावात निर्माण होणाऱ्या तंट्यांबाबत समितीला कसलेच देणं घेणं नसणे,समितीला गावात निर्माण झालेल्या तंट्यात रस नसणे,तंटे/वाद याची माहिती तंटामुक्त गाव समितीकडे देण्यासाठी समितीकडून ग्रामस्थांना आवाहन न करणे...

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC-ST) प्रवर्गातील आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे धर्माबादेत फटाके फोडून जल्लोषात स्वागत; मोदी हैं तो मुमकिन हैं चे नारे देत सर्वोच्च न्यायालय, केंद्र व राज्या सरकारचे मानले आभार

इमेज
  संपादक-संजय चिखले नांदेड,दि,०६/०८/२०२५:  दि०१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला ते म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, (SC,ST) प्रवर्गातील समाजाला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येणार आहे ते अधिकार राज्यांना असणार आहेत यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पूर्वी उप आरक्षण म्हणजेच अ, ब, क, ड, असे लागू होते पण 2004 साली त्या निर्णयाला स्थगती दिली होती. पण दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगती उठून एससी एसटी प्रवर्गात उप वर्गीकरण करू शकता असा निर्णय दिलेला आहे.  या निर्णयामध्ये केंद्र सरकारची महत्वपूर्ण भूमिका आहे त्या निर्णयाचा जल्लोषत स्वागत धर्माबाद तालुक्यामध्ये मातंग समाजाच्या वतीने पानसरे चौक, डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, व लहुजी साळवे चौक, या ठिकाणी फटाके फोडून करण्यात आला करण्यात आला. यामध्ये यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्र पोतगंटीवार, माजी नगरसेवक संजय पवार, सज्जनगड गाडोड, लो.आं. प्रदेश उपाध्यक्ष व्ही.जी डोईवाड, मराठवाडा सरचिटणीस बी एम गोणारकर(लो. आं.) इंदिरानगर येथील जयंती मंडळाचे अध्यक्ष बीएम सूर्यवंशी उपाध्यक्ष दिल...

Dispute Free Village: ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात तंटामुक्त गावचा बाजार संपला का❓

इमेज
  तंटामुक्त गाव महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने १९ जुलै २००७ रोजी एमआयएस:१००७/ सीआर-२३८/पीओएल-८ या जीआरद्वारे पर्यायी वाद निवारणासाठी हा नवोन्मेषकारी उपक्रम सुरू केला. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे या उपक्रमामागील जिवंत प्रेरणा होते. हा उपक्रम कायमस्वरूपी असून, २००७ सालच्या स्वातंत्र्यदिनी त्याचा शुभारंभ करण्यात आला.  विविध न्यायालयांमधील प्रलंबित वाद-खटल्यांचे प्रचंड प्रमाण आणि त्यामुळे अपरिहार्यपणे निकाल देण्यात होणारा विलंब याचा विचार करता, पर्यायी वाद निवारण अर्थात एडीआर ही काळाची गरज आहे. लोकन्यायालये व फास्ट ट्रॅक न्यायालयेही याच कारणासाठी स्थापन करण्यात आली आहेत.  खेड्याच्या स्तरावर अत्यंत किरकोळ मुद्दयांवरून वाद निर्माण होतात. सुरुवातीला यात मोजके लोक गुंतलेले असले, तरीही निराकरण न झाल्यास छोटे मुद्दे मोठे होतात व अधिकाधिक लोक यात गुंतू लागतात. या निराकरण न झालेल्या वादांतून पुढे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय फौजदारी व दिवाणी न्यायव्यवस्थांवर अतिरिक्त ताण येतो तो वेगळाच. महात्मा...