- जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाबाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी फक्त मुखदर्शकाच्या भूमिकेत
नांदेड : जिल्हाधिकाऱ्याने जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत की, जिल्हाधिकारी कार्यालयास शेतकरी व जनतेकडून अनेक लेखी तक्रारी प्राप्त होत आहेत, तसेच समक्ष भेटून तक्रारी दिल्या जात आहेत. ज्यामध्ये बँका शेतक-यांना ज्या बँकेतून माफी मिळाली आहे त्याच शाखेतून कर्ज घ्या म्हणत आहेत व कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच अनावश्यक कागदपत्राची मागणी करीत आहेत.
या संदर्भात नांदेड जिल्हयातील सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, मागच्या वर्षी 2020-21 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व बँकांना प्रासंगिक तत्वावर आदेश देण्यात आले होते की, शेतक-यांना ज्या बँकेतून कर्जमाफी मिळाली त्याच शाखेतून पीककर्ज देण्यात यावे जेणेकरुन कोरोना काळात बँकेतील वर्दळ कमी होईल. सद्यस्थीतीत जी गावे ज्या शाखेस दत्तक आहेत त्या शाखेतूनच शेतक-यांना पीककर्ज देण्यात यावे.
सबब, सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, शेतक-यांना माफीच्या निकषावर बाद ठरवून कर्जपुरवठयापासून वंचित ठेवू नये व शेतक-यांची अडवणूक करु नये अन्यथा संबंधीता विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.एक प्रकारे असा इशाराच जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय अधिकृत संकेतस्थळ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता