सोमवार, एप्रिल २६, २०२१

मानवता धर्माला काळिमा : कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 6 महिने गर्भवती महिलेचा काही तासातच पतीच्या डोळ्यासमोर मृत्यू

 


कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही एका 6 महीन्याच्या गर्भवती महिलेला कोवीड पॉझिटिव्ह आहे असे दाखवून दवाखान्यात भरती करुन घेण्यात आले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला, मृत्यू झालेल्या महिलेचा पती आक्रोश करुन सांगत आहे की कोरोना टेस्ट करण्यासाठी आणलेल्या त्याच्या सहा महिन्याच्या गर्भवती पत्नीला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असताना देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे सांगून त्या महिलेला कोवीड हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला आहे असे तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आल्यानंतर हि बातमी ऐकून ते आक्रोश करत आहेत.त्या महिलेला कशा प्रकारे मारण्यात आले हे ते सांगत आहेत.त्या महिलेसह तिच्या गर्भातील सहा महिन्याच्या अर्भकाचा देखील त्या कसाई डॉक्टरांनी जीव घेतला आहे.त्या दवाखान्यात अशा प्रकारे मृत्यूच्या सहा-सात घटना त्याच दिवशी घडलेल्या आहेत असे त्या मृत गर्भवती महिलेच्या पतीने सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे, कसे कसे प्रकार रुगणांसोबत घडत आहेत, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हे अशा घटनांमधून समजत आहे.


कसलेहे डॉक्टर? यांना जीवनदायी देवता म्हणावे की मानवरुपी कसाई?एक वेळचा कसाई बरा म्हणण्याची वेळ आली आहे,कारण ते बेजबान जनावरांचे कत्तल करतात,हे डॉक्टररुपी कसाई तर जबान असणा-यांचे कत्तल करत आहेत,एके काळी पुर्वजांनी या डॉक्टरांना माणसातील देव अशी उपाधी दिली आहे.हेच का ते मानुषरुपी देवता? अशा काही नालायक लोकांनी बाकीच्या डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने बघण्याची वेळ आणली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,सगळेच डॉक्टर वाईट असू शकत नाहीत, काही लोकांच्या अशा अमानवी कृत्यांमुळे सर्वांवर बदनामीची वेळ आली आहे.काही डॉक्टरांना पैसा हाच सर्वस्व आहे हे या कोवीडने दाखवून दिले आहे,मानवता धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही,अशा डॉक्टरांसाठी वेळीच कायद्यात बदल करून कठोर दंडात्मक शासन निर्णय होणे अत्यावश्यक आहे अन्यथा हे मानवरुपी कसाई निष्पाप लोकांचे संसार उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाहीत,पुढील काळात तर खुप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे.लोकं आक्रोश करत आहेत, तडफडून मरण पावत आहेत,हे लवकरात लवकर कुठेतरी थांबले पाहिजे अन्यथा अनागोंदी माजल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की,या व्हिडिओ मधील घटनेसारख्या असंख्य घटना रोज घडत आहेत, टिव्हीवर,पेपरमधून,सोशल मिडियावर रोज बातम्या, व्हिडिओ पाहायला मिळत आहेत,प्रशासन देखील निष्क्रिय बनलेले दिसत आहे,कशाची कशाला सोय नाही.बिमार होऊन दवाखान्यात अशा मानवरुपी कसायांकडून मरण्यापेक्षा घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे.



२ टिप्पण्या:

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता