बुधवार, जुलै ३०, २०२५

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ-आरोग्यमंत्री

 

संजय पाटील चिखले

२९ जुलै २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न राहता, ती संपूर्ण समाजासाठी एक जागृती निर्माण करणारी जनचळवळ व्हावी, यासाठी माझा विशेष प्रयत्न आहे. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात ‘अवयवदान पंधरवडा’ राबवित असताना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, एक अवयव एखाद्या रुग्णालाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबालाही नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील भीती, शंका आणि गैरसमज दूर करून सकारात्मक मानसिकता निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम केवळ एक उपक्रम म्हणून न राबवता, ती एक भावनिक व सामाजिक बांधिलकी म्हणून घेतली जावी. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा, जेणेकरून त्यांचा समाजात आदर्श निर्माण होईल.

माझा विश्वास आहे की, जनतेच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र लवकरच अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श राज्य म्हणून पुढे येईल.

या बैठकीला राज्यमंत्री श्रीमती. मेघना साकोरे - बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला , उपसंचालक, डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.

@MeghnaBordikar

#Shivsena #Prakashabitkar #OrganDonation #DonateLife #SocialAwareness #BeanOrganDonor #MaharashtraHealthMission

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता