बुधवार, जानेवारी १९, २०२२

बातमीची दखल : ग्रामपंचायत कर्मचारी म्हैसाजी कदम ते १०% ग्रामपंचायत मधून सेवा ज्येष्ठतेनुसार "कंत्राटी ग्रामसेवक" तद्नंतर लाचखोर म्हणून सिद्ध झाल्याने सिईओ कडून बडतर्फी; लालचे पाई अशाप्रकारे कायमचे घरी बसावे लागले

 

लाच घेणे आणि देणे कायद्याने दंंडणीय अपराध आहे

  • २७ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड न्यूज अपडेट ने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेऊन निलंबना ऐवजी बडतर्फी ची कारवाई करण्यात आली.

नांदेड,दि १३ जानेवारी : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे आदेश क्र. जाक्र जिपना/आस्था-३/४१६६ दि.२९/११/२०१९ अन्वये श्री. म्हैसाजी आनंदराव कदम,कंत्राटी ग्रामसेवक,पंचायत समिती, नायगाव (खै.) ग्रामपंचायत घुंगराळा यांची १०% ग्रामपंचायत कर्मचा-यामधून सेवा जेष्ठतेनुसार कंत्राटी ग्रामसेवक या पदावर महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई, शासन निर्णय दि.०६ जून २००१ मधील नमूद अटी च्या अधिन राहून नेमणुक देण्यात आली होती. सदर शासन निर्णयातील जोडपत्र-अ. अनुक्रमांक (१६) नुसार नियुक्ती कालावधीमध्ये संबंधित कंत्राटी ग्रामसेवकांकडून गैरवर्तणुक झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नेमणूक नियुक्त प्राधिका-याकडून रद्द करण्यात येईल अशी स्पष्ट तरतुद विहित आहे.

पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचे पत्र क्र जाक्र एसीबी कार्यवाही/माहिती /प.स.नायगाव ३४६७/२०२१ लाप्रवि /नांदेड दिनांक ०४.१२.२०२९ अन्वये श्री. म्हैसाजी आनंदराव कदम, कंत्राटी ग्रामसेवक, पंचायत समिती, नायगाव (खै.) ग्रामपंचायत घुंगराळा यांनी तक्रारदार श्री. रावसाहेब माधवराव जाधव, वय ४९ वर्ष यांचे प्रामपंचायत पुंगराळा येथील दोन प्लॉट नमुन नं. ८ वर नोंद घेण्यासाठी तक्रारदार यांचेकडे पंचाचे समक्ष रु.२८,०००/- रुपयाची मागणी करून तडजोडी अंतो रु २५,०००/- रुपये लाच स्विकाण्याचे मान्य केले आरोपी क्र. ०२ श्री विठ्ठल देविदास माने यांचे मार्फत स्विकारली असता पोलीस स्टेशन नायगाव गु.र.नं. २२१/२०२१ कलम ७.१३(A) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये ०३.१२.२०२१ रोजी गुन्हा दाखल होवून दिनांक ०४.१२.२०२९ रोजी अटक झाल्याचे कळविले आहे.

श्री. म्हैसाजी आनंदराव कदम, कंत्राटी ग्रामसेवक, पंचायत समिती, नायगाव (खे) ग्रामपंचायत घुंगराळ यांनी त्यांचे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून कार्य केलेल्या कालावधीत त्यांचेकडुन उपरोक्त नमुद गैरवर्तन झाल्याची बाब स्पष्ट होते. यावरून शासन निर्णयातील जोडपत्र-अ अनुक्रमांक (१६) मधील तरतुदीनुसार मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून श्री. मेसाजी आनंदराव कदम, कंत्राटी ग्रामसेवक, पंचायत समितीनगर) यांना दिनांक ०४.१२.२०२१ पासुन कंत्राटी ग्रामसेवक पदाचा करार संपुष्टात आणून त्यांची कंत्राटी ग्रामसेवक म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. सदर आदेशाची नोंद संबंधिताचे मुळ/व्दितीय सेवा पुस्तीकेत घेण्यात यावी.असे आदेश १३ जानेवारी २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी काढले आहेत.एसीबीचा अहवाल ०४/१२/२०२१ रोजी जिल्हा परिषदेत धडकला परंतु २४ तासात करायची कारवाई मात्र २४ दिवसातही नाही तर तब्बल एक महिना दहा दिवसांनी करण्यात आली.  या आदेशाच्या प्रति १.पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांना माहितीस्तव

२. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नदिड यांना माहितीस्तव

३. गट विकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव (खै) यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव

४. संबंधितास (ग.वि.अ. पं.स. नायगाव (खै) मार्फत)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पं) नामदेव केंद्रे हे प्रकरण गांभीर्याने घेत नव्हते

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करु; डिईनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे 

या मथळ्याखाली नांदेड न्यूज अपडेट ने २७ डिसेंबर रोजी बातमी प्रसारित केली होती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे एसीबीचा रिपोर्ट येऊनही माहिती नसल्याचे खोटं सांगत होते.एसीबीचा रिपोर्ट येऊन २४ दिवस झाले होते तरी त्यांना माहित नसणे हे नवलच म्हणावे असे होते. तसेच इतके दिवस नोकरी करुन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत असते की त्यांची बडतर्फी होते याची माहिती नसेल तर नवलच म्हणावे लागेल.एसीबीचा रिपोर्ट आल्या २४ तासात एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली असताना एक एक दोन दोन महिने निलंबनाची कारवाई केली जात नाही. त्यांनी सांगितले होते की, लाचलुचपत च्या जाळ्यात अडकलेल्या कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला अगोदर निलंबित केले जाईल,त्याचे विरुद्ध विभागीय कारवाई प्रस्तावित केली जाईल त्यानंतर त्याचेवर बडतर्फी ची कारवाई करण्यात येते असे म्हटले होते.परंतु बातमी प्रसारित होताच बातमीची दखल घेत बातमीनंतर नुसते निलंबित केले तर प्रकरण अंगलट येऊ शकते हे ओळखून निलंबनाची कारवाई टाळली.अन्यथा प्रकरण त्यांच्या अंगलट येऊ शकले असते.जे पहिले निलंबन केले जाईल, विभागीय कारवाई केली जाईल म्हणत होते,आता विभागीय कारवाई का प्रस्तावित करण्यात आली नाही? थेट बडतर्फी ची कारवाई का करण्यात आली आहे.?कारण कंत्राटी कर्मचारी यांचेवर बडतर्फी चीच कारवाई होत असते.कदाचीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे विसरले असणार ! जबाबदार वरिष्ठ अधिकारीच जर मनात येईल ते बोलू लागले तर एकाद दुसरा अपवाद वगळता त्यांचे अधिनस्त तेच शिकणार यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय बाळगणार? २४ तासात करायची कारवाई एक महिना १० दिवसांनी का होईना करण्यात आली.कामात कुचराई कशी करावी हे जर शिकायचे असेल तर ते जिल्हापरिषद मधील अधिका-यांकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल.हीच नाही तर एसीबीच्या प्रत्येक कारवाईत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करायला वरिल प्रमाणे एक  ते दो महिने लागतात म्हणजे लागताच.जे काम २४ तासात करायला पाहिजे ते २४ दिवसांवर नेल्या जाते. याला संबंधित सेक्शनवाले पण तितकेच जबाबदार आहेत.वरिष्ठच असे असतील तर कनिष्ठ हातावर हाथ धरून कसे बसणार नाहीत, त्यांना सुद्धा फाईल पुढे सरकवण्यासाठी चिरेमिरे हवे असतात.अशा फाईल मध्ये काही मिळत नाही, परंतु फाईल पेंडिंग ठेवायला संबंधितांकडून काही तरी मिळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खालील प्रमाणे दिली होती उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रतिक्रिया : 27/12/2021


"एसीबी कडून आम्हाला लिखित स्वरूपात अहवाल यावा लागतो.तोपर्यंत मला डायरेक्ट निलंबित करता येत नाही.एसीबीचा अहवाल अजून आलेला नाही.(आज आलाय का पहिले खात्री करुन घेतो असे म्हणत जवळ असलेल्या कर्मचाऱ्याला विचारले की,एसीबीत गेलेल्या ग्रामसेवकाचा घुंगराळ्याचा अहवाल आला आहे का? अहवाल आला नसल्याची माहिती घेतल्यानंतर) आजूनही अहवाल आला नाही.एकदाचं एसीबीच्या ऑफिसला माणूस पाठवून देतो.त्यांनी अहवाल दिल्याशिवाय मला काहीच करता येईना.जनरली तीन-चार दिवसात एसीबी कडून अहवाल येतो पण यावेळेस आठ दिवस झाले तरी अहवाल आला नाही.तरीपण माझं माणूस पाठवतो आता आणि टपालात कुठं राहू नये म्हणून खात्री करून घेतो.अहवाल आल्याबरोबर आम्ही ठेवत नाही, आमच्या हातात कागद आल्यावर २४ तासात निलंबनाची ऑर्डर काढतो.सद्या निलंबन होते, आम्हाला त्याचा डिई (D.E) म्हणजे विभागीय चौकशी करावी लागते मग डिसमिस (सेवेतून बडतर्फ) करतो.(त्यानंतर थोड्यावेळाने लगेच त्यांनी सांगितले की) अहवाल आला आहे आणि फाईल मॅडमच्या टेबलवर आहे."


नामदेव रा.केंद्रे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद नांदेड.
२७/१२/२०२१ 

असा झाला होता ट्रॅप
दिनांक ०२/१२/२०२१ रोजी यातील तक्ररदार यांनी तक्रार दिली की, "यातील लोकसेवक म्हैसाजी कदम हे तकारदार यांचे दोन प्लॉट ग्रामपंचयातचे नमुना न.-८ ला नोंद घेण्यासाठी २८,०००/ रू. लाचेची मागणी करीत आहेत".
तकारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०३/१२/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक कदम यांनी तकारदार यांचेकडे त्यांचे उपरोक्त कामासाठी २८,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५,०००/ रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून दिनांक ०३/१२/२०२१ रोजी हेडगेवार चौक, नायगांव परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण खाजगी इसम विठ्ठल माने यांनी तकारदार कडुन उपरोक्त कामासाठी २५,०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणुन लोकसेवक (१) म्हैसाजी आनंदराव कदम, वय ३९ वर्ष, व्यवसाय नोकरी ग्रामसेवक, ग्रामपंचायात कार्यालय घुंगराळा ता. नायगांव जि. नांदेड रा. पिपंळगाव, ता. नायगांव जि. नांदेड (२) खाजगी इसम विठ्ठल देविदास माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय फुल विक्रेता, रा. पिपंळगाव ता. नायगांव जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद अतिरिक्त पद्भार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस उप अधिक्षक श्री धरमसिंग चव्हाण, श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ता केंद्रे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली होती.

हेही वाचा : संबंधित बातम्या

२७/१२/२०२१-नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करु; डिईनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे


गुरुवार, जानेवारी १३, २०२२

उरण : हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी जेएनपीटीचा चालढकलपणा ! ग्रामस्थ पुन्हा एकदा जेएनपीटीत समुद्रमार्गे येणारी जहाजे रोखण्याच्या पवित्र्यात

 

  • पोलीसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

उरण,दि 13 जानेवारी 2021 : गावाला लागलेल्या नैसर्गिक वाळवी, अपुरे पुनर्वसन, नागरी सुविधांचा बनवा, नोकरी व्यवसायासाठी होणारी पायपीट या सर्व न्यायहक्काच्या गोष्टी मिळविण्यासाठी गेली ३७ वर्ष हनुमान कोळीवाडयाच्या ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळून रायगड जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने जे.एन. पी. टी. कडून अखेर पुनाकरिता २५६ कुटुंबासाठी ७१० गुंठे आवश्यक असणारी जमीन ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आली होती. दि. २८ नोव्हें २०२१ रोजी सर्व ग्रामस्थांनी या जागेवर श्रीफळ वाहून फटाक्यांच्या आतषबाजीत गगनभेदी घोषणा देत नामफलकाचे अनावरण केले होते. मात्र ध्यानीमनी नसताना शासनाचे अधिकारी आणि जेएनपीटीचे अधिका संगनमताने ग्रामस्थांचा छळ व धोका देण्याचे कटकारस्थान करून जागा देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने ग्रामस्थांच्या गगनभेदी घोषणा हवेतच विरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून ग्रामस्थ पुन्हा एकदा आपल्या परिवारासह चॅनेल बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

जेएनपीटी बंदरच्या निर्मितीसाठी हनुमान कोळीवाडा हे गाव ३० वर्षांपूर्वी विस्थापित करण्यात आले होते. त्यानंतर या गावाला वळविणे ग्रासले आणि प्रकल्पग्रस्तानी उभारलेली घरे पत्याच्या घरा सारखी कोसळली त्यावेळेपासून ग्रामस्थ हे पुनर्वसनाच्या जागेचा शोध घेत होते. हजारो बैठका, आंदोलने, मोचें, उपोषणे करूनही गेली ३७ वर्षे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नव्हता ग्रामस्थांच्या एकज्युटीमुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना फुंडे गावाजवळ कस्टम कॉलनीच्या मागे दि. २४ नोव्हेंबर २९ रोजी राहुल मुंडके उपविभागीय अधिकारी पनवेल, भाऊसाहेब अंधारे तहसीलदार उरण, जेएनपीटीचे अधिकारी राजेश फडके, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वपोनी श्री भटे व श्री. मोहिते यांच्या उपस्थितीत शासनाने व जे. एन. पी. टी. ने शासकीय मापदंडानुसार ८६ शेतकरी व१७० बिगर शेतकरी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ७१० गुंठे जागा दिली होती.


त्यानंतर मावळचे खा. श्रीरंग अप्पा बारणे यानी केंद्रीय नौका नयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना प्रत्यक्ष भेटून ८६ शेतकरी व १७o बिगर शेतकरी अशा २५६ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या माप दंडानुसार नागरी सुविधा आणि हनुमान कोळीवाड्यांतील सर्व घरांच्या किमती देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्या बाबत १४ डिसेंबर २१ रोजीलेखी पत्र देऊन आणि ३० डिसेंबर २९ रोजी जेएनपीटीच्या कार्यालयात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय शेठी, उपाध्यक्ष उत्मेष वाघ, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांच्या समवेत बैठक घेऊन वरील अटीशती मंजूर करून घेतल्या होत्या नंतर आराखडा तयार करण्यासाठी आठ दिवसांची मुदत प्रशासनाने घेतली होती. त्यानुसार ५ जानेवारी २२ रोजीपुनर्वसन कमेटीने उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांना विचारणा केली असता जेएनपीटीने आराखडा पाठविला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आतषबाजीत व घोषणांच्या जल्लोषात सदरच्या जागेवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी नामफलकाचे अनावरण केले होते. मात्र ग्रामस्थांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. अखेर ग्रामस्थांनी शासन बजेएनपीटी सगनमताने ग्रामस्थांना धोका देत असल्याने सबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने भा.द.वी. कलम १६६ १६७ १८८४२०, ४६८, ४७१ आणि सीआरपीसी कलम १९७ नुसार संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने केली आहे. 
यात पोलीस प्रशासनाने कुचराई केल्यास या घटनेच्या निषेधार्थ आमच्या हक्काच्या घारापुरी ते मोरा परिसरांतील मासे मारी जमिनीत मासेमारी करून बोटी नागरून बोटीत ग्रामस्थ बायका-पोरांसह वास्तव्यास राहणार असल्याचा एकमुखी निर्णय घेऊन एक अनोखे आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पालक मंत्री अदिताताई तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक संजय पांडे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय शेठी, नवीमुंबई पोलीस आयुक्त विपीन कुमार सिंग पोलीस उपयुक्त पनवेल शिवाजीराव पाटील, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. विस्थापित कुटुंबाच्या हातून कोणताही विचित्र प्रकार घडला अथवा कुणी आत्महत्या केली तर त्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांवर राहील असा इशाराही ग्रामस्थांनी लेखी निवेदनाच्या शेवटी दिलेला आहे.


जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात प्रशासनाकडून चालढकलपणा करण्यात येत आहे. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ पुन्हा एकदा जेएनपीटीचा समुद्र मार्ग अडविण्याच्या तयारीत आहेत. हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनाबाबत ३० डिसेंबर २०२१ ला जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, व्हा. चेअरमन उन्मेष वाघ आणि उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सुषमा सातपुते यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत कस्टम वसाहतीजवळील जेएनपीटीच्या विकसित जमिनीत शासनाच्या मापदंडानुसार ७१० गुंठ्यात २५६ भूखंड व नागरी सुविधा देण्याचे मान्य केले होते.

त्यासाठी आराखडा बनविण्याकरिता प्रशासनाने ग्रामस्थाकडून आठ दिवसांची मुदत मागीतली होती. मात्र आठ दिवसानंतर देखिल उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांच्याकडे जेएनपीटीने आराखडा पाठविला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आता जेएनपीटी प्रशासनाविरोधात परत एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.ग्रामस्थ पून्हा जेएनपीटीत समुद्र मार्गे येणारी जहाने रोखून धरणार आहेत. जेएनपीटीमध्ये ज्या समुद्री चॅनलमधून जहाजे येतात त्या चॅनलमध्ये आपल्या होड्या आडव्या टाकून हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.


यापूर्वी या ग्रामस्थांनी २६ फेब्रुवारीला अशा प्रकारचे चॅनल बंद आंदोलन करून जेएनपीटीचासमुद्रातील मार्ग रोखून धरला होता. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या मध्यस्थीमुळे तसेच रायगड जिल्हा कलेक्टरांनी आणि पोलिसांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र वारंवार आश्वासन देवून ग्रामस्थांना शांत केले जाते. १९८४ ला जेएनपीटी बसविण्यात आली त्यावेळेला सर्व २५६ मच्छिमार कुटुंब येथून विस्थापित करण्यात आली तेव्ही पासून हे लोक हनुमान कोळीवाडा गावात बोरी पाखाडी येथे विस्थापित करण्यात आली. मात्र ज्या ठिकाणी त्याचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला ती जागा दुषित असल्याने संपूर्ण गावातील घरे वाळवीने पोखरली गेली. शिवाय हे पुनर्वसन शासनाच्या निकषाप्रमाणे करण्यात आले नव्हते. त्यामुळे हे लोक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. माजी नौवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठकी होऊन देखील, लोक न्यायापासून वंचित आहेत.


त्यामुळे शासन व जेएनपीटी प्रशासन ग्रामस्थांविरोधात फसवणूक व कटकारस्थान रचत असून पोलीसांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नाही तर येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा घारापुरी ते मोरा या जेएनपीटीच्या चॅनलमध्ये मासेमारी बोटी नांगरून मुलाबाळांसमवेत शांततेत आंदोलन करण्याचा इशारा हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी दिला आहे.

Tags: #हनुमान कोळीवाडा पुनर्वसन#उरण#जेएनपीटी

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकरचे सुडबुद्धीचे राजकारण, माझ्याविरुद्धची कारवाई एकाधिकारशाही प्रमाणे-तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे

 


  • पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर माझा पुर्ण विश्वास; सुडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही

नायगाव,दि 12 जानेवारी 2021 : मी पक्षासाठी पूर्णवेळ काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण करणे आमचा कौटुंबिक पिंड नाही मी जिल्हाध्यक्ष पद मागितले हाचं माझा गुन्हा....! यासाठीचं जिल्हाध्यक्षाचा माझ्या विरोधात चाललेला अट्टाहास आहे...असे मत नरसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर पाटील भिलवंडे यांनी मांडले.

राष्ट्रवादीत अनेकजण आले आणि गेले पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी चे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराशी जुळवून 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पक्ष श्रेष्ठी कडून कसलीही अपेक्षा नं करता निरपेक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे.माझ्याबाबतीत पक्षाने काय आणि कसा निर्णय घेतला यांचा खुलासा माझ्या पर्यंत अजून पोहचला नाही. पण बातमीतील काही अपमानास्पद शब्द व वाक्य यामुळे मी पूर्णपणे दुखावलो आहे. यांचा खुलासा मी काही दिवसात पक्षश्रेष्ठींकडे देणारचं आहे. पण;माझ्यासारख्या पक्षाच्या पडतीच्या काळात पक्षाची ताकत स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांवर माझी कसलीचं भूमिका समजुन नं घेता टोकाचा निर्णय लादणे कुंठे तरी चुकीचे वाटते. मी तालुकाध्यक्ष असताना देखिल तालुक्यातील निर्णय जिल्हास्तरावरून घेऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचे कट कारस्थान करून माझ्या दुःखाच्या काळात मदती ऐवजी अडचणीत टाकण्याचा उद्योग कशासाठी? मला कळत नाही? जिल्हाध्यक्ष भोसीकर व वसंत सुगावे  यांच्याकडे वारंवार नायगाव नगरपंचयात निवडणूक लढवण्यासाठी वडिलांचा तेरावा झाल्या दुसऱ्या दिवशी बैठक लावून प्रयत्न केला. 

शिवाय नायगाव शहराध्यक्ष म्हणून संजय चव्हाण यांची निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष भोसीकर साहेब यांना पाठपुरावा केला. हे सोडून चार जिल्हापरिषद व एक नगरपालिका असणाऱ्या 89 गावाच्या तालुक्यात तीन सरचिटणीस एका नरसी गटातून परस्पर जिल्हाध्यक्षानी दिलें यामुळे आवश्यक तेथे दुर्लक्ष नको तेथे अधिकचा भरणा मला येथे अनंत अडचणी ही निर्माण झाल्या. युवक तालुकाध्यक्ष निवडीतील गोंधळ, नायगाव नगरपंचायत निवडणूकितील नकारात्मक भूमिका यामुळे जिल्हाध्यक्षांनी मला एकट्याला कारणीभूत ठरवून कार्यवाही करणे संयुक्तिक वाटत नाही ते ही चुकीचे बिनबुडाचे किळसवाणे आरोप अपेक्षीत नाहीत आम्ही ही पक्ष वाढीसाठी जीव ओतून येथे काम केले आहे त्याची जाणीव तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेला आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही.  यामुळेच माझा पक्ष श्रेष्ठी व पक्षाचे सर्वे सर्वा आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तेचं माझे बाबतीत योग्य निर्णय घेतील असा विचार नरसी येथील आयोजित पत्रकार परिषदेत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील भिलवंडे यांनी व्यंक्त केले.

लाच प्रकरण : गायगोठ्याची वर्क ऑर्डर देण्यासाठी पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


*==* *प्रेसनोट*. *==*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* जळगाव.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-54, रा.शेवगे पिंप्री ता.जामनेर जि.जळगाव.

▶️ *आलोसे-*  

वसंत पंडीत बारी,वय-५३, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक पंचायत समिती कार्यालय,जामनेर.

रा.शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव.                                                                                             

▶️ *लाचेची मागणी-* 3,000/-रू.

▶️ *लाच स्विकारली-* 3,000/-रू.

▶️ *हस्तगत रक्कम-* 3,000/-रू.

▶️ *लाचेची मागणी -* दि.11/01/2022 

▶️ *लाच स्विकारली-* दि.13/01/2022

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष ३,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः आरोपी यांनी आज दि.१३/०१/२०२२ रोजी पंचायत समिती कार्यालय,जामनेर येथे आलोसे स्वतः बसत असलेल्या कक्षात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा.                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶ *मार्गदर्शक-* 

*1)* मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 

*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *पर्यवेक्षण अधिकारी-* 

श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.

▶ *तपास अधिकारी-* 

एन.एन.जाधव , पोलीस निरीक्षक,अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.

▶ *सापळा व मदत पथक-*  

DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ.   

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साो.

जिल्हा परीषद कार्यालय,जळगाव.                                                    

--------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*

*@ मोबा.क्रं. 8766412529*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

==================

बुधवार, जानेवारी १२, २०२२

लाच प्रकरण : लाचखोर तलाठी समाधान काळे २५ हजार रुपये लाच मागितले वरुन एसीबीने मुसक्या आवळल्या

 


अक्कलकोट,दि १२ जानेवारी : शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले.

समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर • सुनावणी होवुन तक्रारदार यांच्याबाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता यातील आलोरो समाधान काळे तलाठी सज्जा खानापुर, तहसिल अक्कलकोट यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे बुधवारी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक, पोहवा/सोनवणे, पोना/ श्रीराम घुगे, पोकों/उमेश पवार व पोकों/ स्वप्नील सणके सर्व नेम अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

*Respected sir*

*Demand Case Report:*

➡ घटक :- सोलापूर

➡ तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष

➡ आरोपी लोकसेवक :- समाधान बाळासाहेब काळे, वय 33 वर्षे, पद तलाठी, सज्जा खानापूर, तहसील अक्कलकोट, जिल्हा सोलापूर

▶️पडताळणी दिनांक :- 22/12/2021 ,

 ➡️लाचेची मागणी:-25,000/- रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपयांची मागणी केली आहे

➡️ गुन्हा दाखल दिनांंक:- 12.01.2022 रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, भ्र.प्र.अधि.सन 1988 चे कलम 7, 7 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

➡ हकीकत :- यातील आलोसे यांनी दिनांक 22/12/2021 रोजी झाले पडताळणी कारवाई दरम्यान यातील तक्रारदार यांचे मौजे अंकलगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे शेत असून सदर शेतातून जाण्या - येण्या करीता तसेच शेतमालाची ने-आण करण्याकरिता वहिवाट मिळणेबाबत तहसील कोर्ट अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल लावून सदर निकालाची प्रत देण्याकरिता स्वतःसाठी तसेच वरिष्ठांना देण्याकरिता असे सांगून 25,000/- रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपयांची मागणी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध भ.प्र. अधि. कलम 7, 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

➡ पर्यवेक्षण अधिकारी:- श्री.संजीव पाटील, सहा.पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.सोलापूर.

➡ सापळा पथक : - 

पो.नि. उमाकांत महाडिक,

पो.अंमलदार :- पोहेका /सोनवणे, पोना /श्रीराम घुगे, पोशि/ उमेश पवार, पोशि/ स्वप्निल सन्नके व चापोकाॅ/शाम सुरवसे सर्व नेम- ला. प्र .वि. सोलापूर युनिट.

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र.  

श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

श्री सुहास नाडगौडा अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. पुणे

मंगळवार, जानेवारी ११, २०२२

नायगाव गटशिक्षणाधिकारी पदी विराजमान अशोक पवळे एक उपक्रमशील शिक्षक-डि.टी जाधव सर

 


 नायगाव,दि ११ जानेवारी : एक स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व, निस्वार्थी, निगर्वी, निधर्मी, निष्कलंक, निपुण, निर्णयक्षम, असलेले अनेक मोठ मोठ्या पदावर काम केली. परंतु कोणालाही मी उच्चपदस्थ आहे असे वाटू न देता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे अन्याय व भ्रष्टाचार या विरुद्ध आवाज उठवणारे क्रियाशील पवळे सर ज्या पदावर काम करतात त्या पदाला न्याय देण्याचे काम आज पर्यंत त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केले आहे. गटशिक्षणाधिकारी हे पद काटेरी मुकुट असून या पदावर काम करत असताना हे पद जिकीरीचे आहे सगळीकडे बजबजपुरी ने उच्छाद मांडला आहे. यावर मात करून यशस्वी वाटचाल करण्याची जबाबदारी सरांनी स्वीकारली आहे. पवळे सरांनी 28 नोव्हेंबर 1985 रोजी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मंगनाळी तालुका कंधार येथून पदार्पण केले आहे. शाळा हेच मंदिर विद्यार्थी हे माझी देवता येईल आकार या चिमुकल्या मनाला, अध्यापनात जीव ही ओतावा असा दृष्टिकोन ठेवून मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम सरांनी सेवा कालावधीत राबविले यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन यांना सन 2009- 10 ला जिल्हास्तरीय गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यांनी 27 जुलै 2015 ला गडगा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला या काळात त्यांनी केंद्रामध्ये अनेक उपक्रम राबवून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले सरांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रमात साक्षरता अभियान पल्स पोलिओ वृक्षारोपण कुटुंबकल्याण जनगणना व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये काम केले. तालुकास्तरीय स्वच्छता दूत म्हणून काम करून अनेक गावे निर्मलग्राम करण्यासाठी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. सरांकडे उत्तम संघटन कुशलता असून कमी वयातच भास्कर पतपेढीचे चेअरमन पद भूषविण्याचा मान मिळाला. सध्या ते सहकारी पतपेढी नांदेड चे पाच वर्षे संचालक म्हणून चांगले काम केले आहे. आता याच पतसंस्थेचे चेअरमन म्हणून धुरा सांभाळत आहेत. 8 ऑगस्ट 2019 ला शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली या काळात चांगले काम केले या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद नांदेड ने पंचायत समिती नायगांव च्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपवली पुढील कालावधीत पंचायत समितीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही यासोबतच शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे गुरूगौरव पुरस्कार, दुय्यम सेवा पुस्तिका या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या काळात नक्कीच प्रयत्न करतील एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून पंचायत समिती नायगावच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिळाल्याबद्दल सर्व संघटना व शिक्षक बांधवांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा

जाधव डी टी स शि मरवाळी, तालुकाध्यक्ष शिक्षक परिषद नायगांव

आबाबाबा ! ११ लाख लाचेची मागणी ? साडेपाच लाख स्विकारताना महालाचखोर उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधानसह लाचखोर सरपंचाच्या एसीबीने मुसक्या आवळल्या

 


कोल्हापूर,दि ०९ जानेवारी : क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निकालात काढण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाखांची लाच घेताना राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (रा. न्यू पॅलेसनजीक, कोल्हापूर. मूळ गाव- बीड) याच्यासह फराळे गावचा सरपंच संदीप जयवंत डवर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली.

अकरा लाखाची लाचेची मागणी होती. कोल्हापुरात कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल-राधानगरी प्रांत कार्यालयात रविवारी सुटी दिवशी दुपारी केली. राधानगरी प्रांताधिकारी व फराळे (ता. राधानगरी) गावचे सरपंच लाचप्रकरणी गजाआड झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली.

राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगाचीवाडी येथे तक्रारदाराचे सिलीका वाळू वाशींग प्लॉंट क्रशर आहे. क्रशरच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत, घरांना तडे गेलेत असे कारण पुढे करुन राधानगरी प्रात प्रसेनजीत प्रधान व फराळे गावचे सरपंच संदीप डवर यांनी प्लॉटला भेट दिली. तो प्लॉंट बंद करावा अशी नोटीस सरपंच डवर यांनी बजावली. सरपंचांच्या नोटिसी संदर्भातून राधानगरी प्रांताधिकारी प्रधान यांनी संबंधित प्लॉटमालकास आणखी दोन नोटिसा बजावल्या.

त्यानंतर तक्रारदार प्लॉटमालकाने प्रांताधिकारी प्रधान यांची भेट घेतली. प्रांतानी त्यांना सरपंचाची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार सरपंचांनी भेटीत, नोटीस रद्द करण्यासाठी प्रातांना १० लाख व आपल्याला दरमहा एक लाख रुपयेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी पडताळणी केली.

त्यात तक्रारदार प्राताधिकारी प्रधान यांना त्यांच्या न्यू पॅलेस परिसरातील वींड गेट अपार्टमेंटमधील निवासस्थानी भेटले, सरपंचांचा निरोप सांगितला, तशी प्रांतानी त्यास संमती दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सरपंचाच्या मोटारीत तक्रारदाराकडून लाचेचे ५ लाख रुपये प्राताधिकारीसाठी व स्वता:साठी ५० हजाराची रक्कम घेताना सरपंच संदीप डवर यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्राताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना त्यांच्या राधानगरी प्रात कार्यालयात अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन कुंभार, हे. कॉ. शरद पोरे, अजय चव्हाण, मयूर देसाई, रुपेश माने, अमर भोसले, नवनाथ कदम, विकास माने, सुरज अपराध यांनी सापळा रचून केली.

सुट्टीच्या दिवशी साहेब ‘लाचे’साठी कार्यालयात

रविवार साप्ताहिक सुट्टी असतानाही प्राताधिकारी प्रधान हा दिवसभर मुख्य प्रशासकिय इमारतीतील राधानगरी कागल-राधानगरी प्रात कार्यालयात बसून होते. कार्यालयाच्या आवारात हे सरपंचाकरवी लाच घेण्याचे षडयंत्र सुरु असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ते उधळले.

सरपंचांची अलीशन मोटार जप्त

सरपंच हे पद सेवेसाठी असते, पण त्याचा फराळे गावच्या सरपंचाचा रुबाब हा मोठाच होता. कारवाई झाल्यानंतर त्यांची अलीशान पांढरी मोटार पथकाने जप्त केली.

जिल्ह्यात दुसरा सरपंच गजाआड

लाचेतील दहा लाख प्रांतांना व दर महा एक लाख रुपये लाच सरपंचांना देण्याचे ठरले होते. ते पितळ या कारवाईमुळे उघडे पडले. २०१८ शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील सरपंचालाही लाच प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे लाचप्रकरणी सरपंच गजाआड होण्याची ही दुसरी घटना होय.

बीड येथे बदली झाल्याची चर्चा

लाचखोर प्रसेनजीत प्रधान यांनी काही दिवस प्रशिक्षणार्थी म्हणून करवीर प्रात पदावरही काम केले. त्यानंतर गेले सहा महिने ते राधानगरी प्रात पदाचा कारभार पहात होते, त्यांची भंडारा येथे बदली झाल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांच्यावर ही लाचेची कारवाई झाली. त्यामुळे बदलीवेळी जाता-जाता हात मारुन जाण्याच्या त्याचा प्रयत्न असल्याचे उघड झाले

नियुक्ती : नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचे सूत्र ए.जी. पवळे यांनी स्वीकारले

 


नायगाव,दि ११ जानेवारी २०२१ : नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी.पवळे यांच्या कडे सुदपूर्द करण्यात आला आसून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती लता कोठेकर, शि.वि.अ.नायगाव यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव ता. नायगांव या पदाचा अतिरिक्त पदभार होता.तो कमी करून संवितरणासह श्रीमती लता कौठेकर यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव या पदाचा पदभार कमी करून पवळे अशोक गंगाधर शि.वि.अ. यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात आला आहे.


दि.१० जानेवारी रोजी पवळे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे---‌कलावंत ,मृदंगाचे बोल जाणणारे, पेटीवादक, गाणे ,भजन ,गवळणी, पद यांचा अभ्यास असणारे आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड तळमळ,कळवळा असणारे एकमेव शिक्षक अशोक पवळे सरांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आजही गावा गावांमध्ये आणि परिसरामध्ये आदराने घेतले जाते. 
अनेक गावचे लाडके गुरुजी म्हणून आजही पवळे सरांना नागरिक ओळखातात. साक्षरता अभियान जोरात चालू होतं,तेंव्हा गावागावातून पवळे गुरुजी रात्री-अपरात्री कलापथक घेऊन फिरायचे.. त्याकाळी गावात राहणारा एकमेव शिक्षक म्हणून सरांकडे लोक कुतुहलाने पहायचे.. परिसरात हरिनाम सप्ताह, शिवनाम सप्ताह ,लक्ष्मण शक्ती, प्रवचन , कीर्तन ,भारुड, दिंडी , श्रावण महिन्यात लावलेली पोथी सर आवर्जून हजर राहायचे! पवळे सर म्हणजे एक नितीमूल्यांचा संस्कारदूतच ! आज त्याच्या अंगी असलेल्या नीतिमूल्यांचा विजय होऊन ते एक तालुक्याच्या महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी या पदावर विराजमान झाले आहेत .त्यांच्या कार्यातील अनुभवाचा नकीच फायदा होणार आहे.

पवळे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व पत्रकार रामकृष्ण मोरे यांनी स्वागत केले आहे या वेळी नरसी केंद्राचे मु.अ.कपिलेश्वर नलबलवार ,बारहाळे सर उपस्थित होते.

रविवार, जानेवारी ०९, २०२२

सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारच करतात-पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे

 


नायगाव,दि ०९ जानेवारी २०२१ : समाजातील वाईट प्रवृतीचा समूळ नायनाट करण्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे,अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज हे पत्रकारच बुलंद करतात.पत्रकार वृत्तपत्राविना समाजाची कल्पनाच करवत नाही, चौथा स्तंभ नसेल तर समाजात अराजकता माजेल.प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम हे पत्रकार करत असतात. लोकांच्या अडी अडचणी मांडण्याचे कार्य पत्रकारांनी सदैव करावे,मी राज्य शासनाच्या सेवेतील पाईक या नात्याने मी जोपर्यंत नायगाव पोलीस स्टेशन येथे आहे तोपर्यंत सदैव पत्रकारांच्या सोबत आहे.पत्रकारीता करत असताना समाजकंटकांकडून कुठलीही  धमकी, समस्या आल्यास पत्रकारांनी निसंकोचपणे मला अर्ध्यारात्री फोन करावा,मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले.

ते नायगाव पोलीस ठाण्याच्यावतीने दर्पणदिनानिमित्त तालुक्यातील पत्रकार बाधंवाच्या आयोजीत करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या वतीने तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, तालुका अध्यक्ष नागेश कल्याण, पत्रकार मित्र गजानन चव्हाण सह मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे या प्रसंगी झाली या वेळी बोलताना त्यांनी समाज, पोलीस, आणी पत्रकार यांचा संबंध चिखल पाण्या सारखा आहे. समाजातील अन्यायग्रस्त घटकाना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्याची जवाबदारी समाजातील या दोन मुख्य घटकावर असल्याचे मनोगत या वेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एस एम मुदखेडकर, माजी तालुकाध्यक्ष मनोहर तेलंग,प्रभाकर लखपत्रेवार पंडीत वाघमारे, र विकास भुरे, आनंदा सूर्यवंशी, गोविदंटोकलवाड, गंगाधर गंगासागरे, गंगाधर ढवळे, माधव घडेकर, संजय चिखले, रामकृष्ण मोरे देगावकर, प्रकाश महिपाळे, शर्मा, पोहेका सोपानराव वळगे, इंगोले शिवाजी ईबीतदार, संजय ब्रम्हानंद चिखले, अंकुश देगावकर, शाम गायकवाड, माधव बेलकवाड, शे. अरीफ, वाघमारे राम प्रसाद चनावार सह अनेक पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रकाश हानमंते यांनी मानले.

"दर्पण दिनी" नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनेे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर

 


भालेराव,मिरेवाड,डाँ चव्हाण,डाँ जाधव दाम्पत्य,दत्तू पाटील,पत्रकार शेख वहाब ,पत्रकार विकास भुरे,मालेवाड यांचा समावेश

नायगाव,दि ०९ जानेवारी : "सन्मान भूमीपुत्राच्या कर्तृत्वाचा" या सामाजिक सत्कार्याच्या जाणीवेने विविध क्षेञात कृतिशील योगदान देत कर्मभुमीचा लौकिक तेजोमय करणाऱ्या ऊर्जादायी व्यक्तींना गौरविण्याची यशस्वी परंपरा जोपासत "दर्पण दिनी" नायगांव तालुका मराठी पञकार संघाच्या वतिने विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या गुणिजनांना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

माजी आमदार लोकनेते कै.बळवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृति प्रित्यर्थ कलाभूषण समाजरत्न पुरस्कार ! चित्रपट अभिनेता उत्कृष्ट कलावन्त.रामेश्वर भालेराव (ज्यु.जाँनी लिव्हर) नायगांव यांना तर,यमुनाई विचार प्रतिष्ठान नायगाव,च्या वतीने कै.यमुनाबाई पवार होटाळकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ साहित्य शिरोमणी पुरस्कार साहित्योपध्याय वीरभद्र मिरेवाड, नायगांव यांना जाहीर...

स्वांतञ्यसैनिक कै.किशनराव पाटील कल्याण यांच्या स्मृति प्रित्यर्थ आदर्श धन्वंतरी व उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरस्कार शहरी विभागडाँ.विश्वास चव्हाण (नायगांव) याना स्वामी वैष्णवानंद बहुउद्देशीय प्रतिष्ठान मांजरम च्या वतीने, कै.शंकुतलाबाई रघुनाथराव पांडे मांजरमकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ,ग्रामीण विभाग डाँ.ज्ञानेश्वर जाधव/ डाँ.स्वरुपा जाधव व्यंकटेश्वरा हाँस्पीटल नरसी यांना जाहीर...

माजी मंञी कै.गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ उत्कृष्ट वास्तू विशारद पुरस्कार दत्ताञय पाटील पवार होटाळकर याना जाहीर...

उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार स्व.पञकार अनिल कोकीळ यांच्या स्मरणार्थ स्वच्छतादूत सन्माननिय .माधवरावजी पाटील शेळगांवकर यांच्या वतिने शहरी विभाग.वहाबोद्दीन शेख, नायगांव (दै.लोकमत).यांना जाहीर... 

तर ग्रामीण विभाग स्व.पिराजीराव शिरोळे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजराजेश्वर प्रतिष्ठाण तर्फे., विकास मारोतराव भुरे रा.मांजरम (दै.प्रजावाणी) यांना जाहीर करण्यात आला आहे.

कै वेंकटराव पा चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ इजि मालेवाड यांना धाडस या सामाजिक संघटनेच्या उत्कृष्ट कार्या बद्दल पुरस्कार 

पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ व विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याची दखल नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाने घेत एक नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून नव्या 2022 वर्षात नव्या विचाराने ह्या पुरस्काराची घोषणा केल्या बद्दल सर्वत्र नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे स्वागत होत आहे.

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

बातमीची दखल : नांदेड जिल्ह्यात शालेय व्यवस्थापन समित्या पुनर्गठित करण्याला सुरुवात ! शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी तात्काळ काढले आदेश ; परंत जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयामुळे निवडी लांबणीवर ?

 


नायगाव,दि.०६ डिसेंबर २०२१ :  "शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या  स्थापन कराव्यात" या मथळ्याखाली २३ डिसेंबर २०२१ रोजी व "धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होऊ शकते तर नायगावसह इतर तालुक्यांना काय अडचण आहे? ते कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत? गटशिक्षण अधिका-यांमध्ये त्यांच्या स्तरावर आदेश काढण्याची हिम्मत नाही का? की अधिकार नाहीत" या मथळ्याखाली ३० डिसेंबर २०२१ रोजी नांदेडन्यूजअपडेटब्लॉग च्या माध्यमातून लगातार दोन बातम्या घेतल्या होत्या.याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी काल दिनांक ०५ जानेवारी रोजी "शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ बाबत" नांदेड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचे नावे आदेश काढले आहेत.

सविस्तर माहिती अशी की,कोरोनामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी रखडल्या होत्या.०४ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार खालील अटिंवर शाळा सुरू होईपर्यंत शालेय व्यवस्थापन समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समिती यांची मुदत समाप्त होत असल्यास व शाळा सुरु होण्यापूर्वी त्या नव्याने स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची कार्ये विनाअडथळा पार पाडणे आवश्यक असल्याने त्यांना शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असे शासनाने परिपत्रकात म्हटले होते.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.ज्यांची मुदत समाप्त झाली आहे अथवा शाळा सुरु होण्यापूर्वी समाप्त होणार आहे त्यांनाच फक्त वरील आदेश लागू राहील.
*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरु झाल्यानंतर उक्त समिती / संघ नियमाप्रमाणे नव्याने स्थापन करण्यात यावेत.*  असेही परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले होते.यानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्हात शालेय व्यवस्थापन समिती यांच्या निवडी होत होत्या व त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसारित होत होत्या तरी नांदेड शिक्षण विभाग झोपेतच होते. 
२३ डिसेंबर रोजी च्या बातमीची दखल घेऊन गडगा येथील केंद्रप्रमुख कपिल गारटे सर यांनी मिटिंगमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यावरुन नायगाव च्या गट शिक्षणाधिकारी यांनी २४ डिसेंबर च्या मिटिंगमध्ये तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना ०४ जून २०२० मधील मुद्दा क्रमांक ०५ नुसार शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना बाबत तोंडी सूचना दिल्या होत्या.परंतु काही शाळेचे मुख्याध्यापक तोंडी सूचनेवरून समित्यांचे पुनर्गठन करण्याच्या तयारीत होते पालकांना समिती निवडी संदर्भात निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या.निवडीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या. तर काही शाळा वरिष्ठांच्या आदेशाची वाट पहात होते.त्यांच्यामध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला होता.निवड केलं तर काय होते ? अशी भिती त्यांच्या मनात होती.शाळा स्तरावर कुठल्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. 

सलग दोनदा लावलेल्या बातमीची दखल घेत उशीरा का होईना शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना बाबत नुकत्याच ०५ जानेवारी रोजी सूचना दिल्या होत्या.आता जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना चा विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

रविवार, जानेवारी ०२, २०२२

जाणून घ्या २०२१ मध्ये एसीबीच्या जाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचे किती लाचखोर अधिकारी, कर्मचारी अडकले ते ! खातेनिहाय, संवर्गनिहाय, परिक्षेत्रनिहाय लाचखोरांची माहिती



मुंबई,दि.०२ जानेवारी २०२१ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.

   शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असते.कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत असते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहतो आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाणार आहे.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकते.

   समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे.

महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मागिल दहा वर्षांत सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार प्रकरणी लाचखोर, भ्रष्ट अधिकारी,कर्मचा-यांवर केलेल्या कारवाईचा आलेख, सांख्यिकीय माहिती खालील प्रमाणे आहे.

२०१२ ते २०२१ वर्षनिहाय सापळा,अपसंपदाअन्य भ्रष्टाचार प्रकरणांची माहिती

२०१२- सापळा ४८९, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार १३ असे एकूण ५२४ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१३- सापळा ५८३, अपसंपदा १६ व अन्य भ्रष्टाचार ०५ असे एकूण ६०४ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१४- सापळा १२४५, अपसंपदा ४८ व अन्य भ्रष्टाचार २३  असे एकूण १३१६ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१५- सापळा १२३४, अपसंपदा ३५ व अन्य भ्रष्टाचार १० असे एकूण १२७९ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१६- सापळा ९८५, अपसंपदा १७ व अन्य भ्रष्टाचार १४ असे एकूण १०१६ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१७- सापळा ८७५, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार २८ असे एकूण ९२५ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१८- सापळा ८९१, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार २३ असे एकूण गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१९- सापळा ८६६, अपसंपदा २० व अन्य भ्रष्टाचार ०५ असे एकूण ८९१ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२०- सापळा ६३०, अपसंपदा १२ व अन्य भ्रष्टाचार २१ असे एकूण ६६३ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२१- ०१ जानेवारी ते ३० डिसेंबर पर्यंत सापळा ७६२, अपसंपदा ०७ व अन्य भ्रष्टाचार ०२ असे एकूण ७७१ गुन्हे दाखल करण्यात आले.

मागिल दहा वर्षांत वरील प्रमाणे २०१२ ते २०२१ दरम्यान एसीबी द्वारे सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार कारवाईत २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे १३१६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्या खालोखाल २०१५ मध्ये १२७९, २०१६ मध्ये १०१६, २०१८ मध्ये ९३६, २०१७ मध्ये ९२५, २०१९ मध्ये ८९१, २०२१ मध्ये ७७१, २०२० मध्ये ६६३, २०१३ मध्ये ६०४, २०१२ मध्ये ५२४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत परिक्षेत्र निहाय  सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हे

मुंबई परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ४६ आरोपी ६६, अपसंपदा- गुन्हे ०४ आरोपी ०५, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे - ०० एकूण गुन्हे ५० आरोपी ७१

ठाणे परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ८८ आरोपी १३५, अपसंपदा- गुन्हे ००,आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०१ आरोपी १० एकूण- गुन्हे ८९ आरोपी १४५

पुणे परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १६५ आरोपी २३५, अपसंपदा- गुन्हे ०२ आरोपी ०५, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०१ आरोपी ०२ एकूण- गुन्हे १६८ आरोपी २४२

नाशिक परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १२८ आरोपी १७२, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ०० एकूण- गुन्हे १२८ आरोपी १७२

नागपूर परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ७२ आरोपी ९४, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे ७२ आरोपी ९४

अमरावती परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ७२ आरोपी १०३, अपसंपदा- गुन्हे ०१ आरोपी ०१, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे ७३ आरोपी १०४

औरंगाबाद परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १२९ आरोपी १८२, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे १२९ आरोपी १८२

नांदेड परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ६२ आरोपी ८६, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ०० एकूण- गुन्हे ६२ आरोपी ८६

अशा प्रकारे ०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील वरील आठ परिक्षेत्रा अंतर्गत विविध घटका द्वारे सापळा प्रकरणी एकूण ७६२ कारवायांमध्ये १०७३ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.यात ३११ सह आरोपींचा समावेश आहे.अपसंपदा प्रकरणी ०७ गुन्ह्यात ११ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर अन्य भ्रष्टाचार प्रकरणी ०२ गुन्ह्यात १२ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार मिळून एकूण ७७१ कारवायांमध्ये १०९६ लाचखोरांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत सापळा प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्गखातेनिहाय माहिती

महसूल/भूमी अभिलेख/नोंदणी विभाग- एकूण 177 प्रकरणात क्लास वन 16, क्लास टू 05, क्लास थ्री 140,क्लास फोर 16, तसेच आलोसे 21, खाव्य 52 अशा एकूण 250 लाचखोर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस विभाग- एकूण 173 प्रकरणात क्लास वन 08, क्लास टू 19, क्लास थ्री 184,क्लास फोर 00, तसेच आलोसे 09, खाव्य 35 अशा एकूण 255 लाचखोर पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

म.रा.वि.वि.कं.मर्यादित विभाग- एकूण 51 प्रकरणात क्लास वन 04, क्लास टू 09, क्लास थ्री 21,क्लास फोर 10, तसेच आलोसे 13, खाव्य 11 अशा एकूण 68 लाचखोर महावितरण अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महानगर पालिका विभाग- एकूण ५१ प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०८, क्लास थ्री ४२,क्लास फोर ११,तसेच आलोसे ०६, खाव्य ०७ अशा एकूण ७७ लाचखोर मनपा अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नगर परिषद विभाग- एकूण ०९ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०४, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर न.प अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद विभाग- एकूण *५१* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०६, क्लास थ्री ४४,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०६, खाव्य ०६ अशा एकूण ६३ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पंचायत समिती विभाग- एकूण ५५ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०४, क्लास थ्री ३५,क्लास फोर ०४,तसेच आलोसे २४, खाव्य १० अशा एकूण ७८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वन विभाग- एकूण *२७* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०२, क्लास थ्री २२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०२ अशा एकूण २९ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प.दु.म विभाग- एकूण *०८* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०१, क्लास थ्री ०४,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभाग- एकूण *०९* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०२, क्लास थ्री ०६,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जलसंपदा विभाग एकूण- *१०* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०३, क्लास थ्री ०५,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग- एकूण *१४* प्रकरणात क्लास वन ०७, क्लास टू ००, क्लास थ्री ०७,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०६ अशा एकूण २१ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग- एकूण ०८ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०३, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०३ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आदिवासी विभाग एकूण- ०२ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रादेशिक परिवहन विभाग- एकूण *०३* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०१, क्लास थ्री ०१,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ११ अशा एकूण १५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पाणी पुरवठा विभाग- एकूण ०३ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०३,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०४ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग- एकूण *१७* प्रकरणात क्लास वन ०५, क्लास टू ०४, क्लास थ्री ०७,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण १७ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विक्रीकर विभाग- एकूण ०२ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०१, क्लास थ्री ,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधी व न्याय विभाग- एकूण *०४* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०१, क्लास थ्री ०२,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ०६ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- एकूण *०५* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०१, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०६ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

समाज कल्याण विभाग- एकूण ०४ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०१, खाव्य ०० अशा एकूण ०५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नगर रचना विभाग- एकूण *१०* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०७, क्लास थ्री ००,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वित्त विभाग- एकूण *१०* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०७, क्लास थ्री ०१,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण १० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सहकार व पणन विभाग- एकूण *१६* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०८, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०३, खाव्य ०१ अशा एकूण २० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शिक्षण विभाग- एकूण *३६* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०३, क्लास थ्री ३०,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०३, खाव्य ०२ अशा एकूण ४१ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

क्रिडा विभाग- एकूण ०० प्रकरणात क्लास वन , क्लास टू , क्लास थ्री ,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य अशा एकूण ०० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अन्न व औषधी द्रव्ये विभाग- एकूण ०० प्रकरणात क्लास वन , क्लास टू , क्लास थ्री ,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य अशा एकूण ०० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कृषी विभाग- एकूण १० प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०४, क्लास थ्री ०६,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०३ अशा एकूण १४ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य परिवहन विभाग- एकूण *०१* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०१, क्लास थ्री ००,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इतर विभाग- एकूण *०२* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे , खाव्य ०६ अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सिडको विभाग- एकूण ०१ प्रकरणात क्लास थ्री ०१ अशा एकूण ०१ लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

महिला व बालविकास विभाग- एकूण *०४* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०२, क्लास थ्री ०१,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०३, खाव्य ०१ अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महात्मा फुले मागासवर्गीय विभाग- ०० प्रकरणं

म्हाडा विभाग- ०१ प्रकरणात क्लास टू- ०१ अशा एकूण एका लाचखोर अधिकाऱ्याचा समावेश आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग- ०१ प्रकरणात क्लास थ्री- ०१ अशा एकूण ०१ लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळ विभाग- ०० प्रकरणं

बेस्ट(मुंबई बस) विभाग- ०० प्रकरणं

वजन व मापे विभाग- ०१ प्रकरणात क्लास फोर ०१, तसेच आलोसे ०१ अशा एकूण ०२ लाचखोर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उच्च तंत्रशिक्षण विभाग- ०१ प्रकरणात क्लास थ्री ०१ अशा एकूण एका लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

कौशल्य विकास विभाग- ०१ प्रकरणात क्लास वन-०१ अशा एकूण एका लाचखोर अधिकाऱ्याचा समावेश आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- *०२* प्रकरणात क्लास थ्री-०२ अशा एकूण ०२ लाचखोर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बंदर विभाग- ०० प्रकरणं

कारागृह विभाग- ०० प्रकरणं

वरील प्रमाणे ७६२ सापळा प्रकरणात क्लास वन च्या ६९ लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.यात महसूल/भूमीअभिलेख चे सर्वाधिक १६, पोलीस ०८, सार्वजनिक आरोग्य विभाग ०७, सार्वजनिक बांधकाम विभाग ०५,महावितरण ०४, महानगरपालिका,वन विभाग,सहकार व पणन विभाग,शिक्षण विभाग या चार विभागचे पत्येकी ०३,प.दु.म विभाग,उद्योग ऊर्जा व विभाग,नगर रचना विभाग, वित्त विभाग या विभागाचे प्रत्येकी ०२ तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती,अन्न व नागरी विभाग, जलसंपदा,प्रादेशिक परिवहन विभाग,विक्रीकर विभाग,समाज कल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग या नऊ विभागाच्या प्रत्येकी ०१ लाचखोर क्लास वन अधिकाऱ्याचा समावेश आहे.

क्लास टू च्या १०७ लाचखोर अधिकाऱ्यांच्या एसीबीने मुसक्या आवळल्या आहेत.यात सर्वाधिक पोलीस खात्यातील आहेत.त्यापाठोपाठ महावितरण ०९, क्लास थ्री च्या ५८८ लाचखोर कर्मचाऱ्यांच्या एसीबीने मुसक्या आवळल्या आहेत.फोर्थ क्लास च्या ४९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.आलोसे ९६ तर खाव्य १६४ लाचखोरीत एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

अशा सर्व विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील एकूण १०७३ लाचखोरांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत अपसंपदा प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्ग व खातेनिहाय माहिती

महसूल/भूमी अभिलेख/नोंदणी विभाग- ०१ प्रकरणात क्लास वन ०१, खाव्य ०१ अशा एकूण ०२ भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस विभाग- ०२ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू , क्लास थ्री ०१,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य ०२ अशा एकूण ०४ भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत अन्य भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्ग व खातेनिहाय माहिती


लाच मागितल्याप्रकरणी दाखल तक्रारींची तत्परतेने दखल घेत कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परीक्षेत्राने २०२१ मध्ये इतर परिक्षेत्रापेक्षा महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे, तर नाशिक परिक्षेत्राने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर युनिट प्रथम क्रमांकावर तर जळगाव युनिट दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात सांख्यिकी सदरातील माहितीनुसार ३० डिसेंबर २०२१ अखेर सापळा रचून केलेल्या कारवाईत तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ७७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यात १०९६ आरोपींचा समावेश आहे. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राने सर्वाधिक म्हणजे १६५ गुन्हे दाखल करुन २३५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामुळे गुन्हे दाखल करण्यात व चालू वर्षाषा अखेरच्या कामगिरीत या परीक्षेत्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. तर नाशिक परिक्षेत्राने चालू वर्षाअखेर १२८ गुन्हे दाखल करून दुसरा क्रमांक पटकावला.नाशिक परिक्षेत्राने १७२ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या प्रमाणेच नाशिक परिक्षेत्रातील जळगाव युनिटने जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत ३३ गुन्हे दाखल केले.मागील वर्षापेक्षा जास्तीचे १३ गुन्हे दाखल करण्याची कामगिरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक कडासने, जळगाव युनिटचे उपाधिक्षक एस. एस. पाटील यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. अहमदनगर युनिटने नासिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगर युनिटनेही ३० डिसेंबर २०२१ अखेर पर्यंत ३३ गुन्हे नोंदवले आहेत.

शनिवार, जानेवारी ०१, २०२२

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

 

PM मोदींनी PM-KISAN योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी केला

दिल्ली,दि.01 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी बाधवांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या वतीनं देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.पंतप्रधान कार्यालयाने 29 डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करुन सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. त्यानुसार आज पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.  


देशभरातील 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातील 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 
या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.