बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

प्रत्येक विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी

 


नांदेड, दि. सप्टेंबर 2021 : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. काही भागात नाल्याच्या काठावर अथवा इतरत्र जर विविध जनावरे वाहून आल्याचे आढळले असल्यास त्याचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची ज्या शेतकऱ्यांनी माहिती देऊन पंचनामे करुन घेतले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक पंचनामे करणेपाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जर कुठे खरडून गेले असतील तर त्याचेही माहिती घेऊन पंचनामे करणे यावर सर्व शासनाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर थांबून तात्काळ कामाला गती देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सोयाबीनकापूसज्वारीतूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे व आताच्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

अक्षम्य दिरंगाई : नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक-असे जिल्हाधिका-याने केलेल्या आवाहनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पत्राला जिल्हा माहिती अधिकारी याच्याकडून प्रसिद्धीच नाही



 प्रेस नोट

   महाराष्ट्र शासन

नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन तिन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर मेऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटीअथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसगीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

तथापी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमा धारक शेतकन्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अँप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri (@iffcotokio.co.in या पत्यावर मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.

तथापी काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे.


जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

नांदेड (०३)


जा.क्र./तंत्र-4/ प्रतिदियो/ 3244/2021 

कार्यालय

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड

date. 07/09/2021


प्रति,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना माहितीस्तव देण्यात येत असून वरील बातमी प्रसिद्धीस देण्यात यावी.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

नांदेड (०३)


 

वरील प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश बातमी व प्रसिद्धीस देण्यात यावे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना काल दि.07/09/2021 पत्र दिले आहे,त्या आदेशाची तात्काळ प्रसिद्धी होणे आवश्यक असताना जिल्हा माहिती अधिका-याने कार्यालयाच्या ब्लॉग वर अद्याप प्रसिद्धी दिलेली नाही, सदरील कामात अक्षम्य दिरंगाई,हयगय, निष्काळजीपणा केल्याबद्दल नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 च्या कलमान्वये जिल्हाधिकारी कारवाई करतील काय?



पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन

 


  • संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
  • पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा
  •  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी
  •  नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन 

नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही सखल भागात पाणी शिरले. जिल्ह्यातील संभाव्य‍ परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देऊन लोकांपर्यंत सर्वतोपरी सहकार्य पोहचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत असून संपुर्ण परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. त्यांनी आज देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, नायगाव, नांदेड, बिलोली तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सूचना करुन मदत कार्याला गतीमान केले.    

मेथी येथील यादव जळबा हिवराळे हे 52 वर्षाचे पुरुष वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सुरु असल्याची माहिती मुखेड तहसिलदार यांनी दिली आहे. मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदिप राठोड हे आपल्या चारचाकी वाहनात वाहून गेले. ते मुखेडकडे येत होते. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सेवक उद्धव देवकते हा सुखरुप बाहेर पडल्याची माहिती देगलूर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली. 

दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. 

नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसिलदाराने कळविले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी यांचे दोन बैल 6 सप्टेंबरला वीज पडून मयत झाल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी कळविले आहे. कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून मयत झाली आहे. बिलोली तालुक्यातील सावळी येथे आज एक गाय, एक वासरू पुरात वाहून मयत झाल्याची माहिती संबंधित तहसिलदार यांनी दिली आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार विजय अवधाने, नायब तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.


Tags : #आपत्कालीन#नियंत्रण#कक्ष 

पूर अथवा महापूर आल्यास (पीडीएफ, 2.2 एमबी)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

टोल फ्री :

02462 – 248418


राज्य आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य

नियंत्रण कक्ष –

दूरध्वनी 022-22027990

फॅक्स: 022-22026712


जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ; गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार

 


नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.

सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 351.10 मिटर आहे. इशारा पातळी 351 मिटर, तर धोका पातळी 354 मिटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेला विसर्ग व शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामूळे पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामूळे शहरातील नदी काठच्या सर्व नागरीकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सायंकाळी 4 वाजता 25 हजार क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 91 टक्के भरल्याने धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे व वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या दु. क्र. 02462 263870 या क्रमांकावर उपलब्ध होईल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार यांनी केले आहे.


Tags : #गोदावरी#पैनगंगा#पुर्णा#मानार#नदी

राज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२१-२२)

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 07/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 06/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 05/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 04/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 03/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 02/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 01/09/2021.pdf

#नैसर्गिकआपत्ती#अतिवृष्टी#मुख्यालय : कंधार तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनो ; सर्व मंडळ अधिका-यांनो ; सर्व तलाठ्यांनो ; सर्व ग्रामसेवकांनो ; सर्व कृषी सहायकांनो मुख्यालयी थांबा-तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कंधार

 


तहसिल कार्यालय,कंधार

मेल tahkandhar@gamil.com

संचिका क्र.: 2021/नै आ./मु.ह/कावि

दुरध्वनी क्र. 02466 223424

दिनांक : 07/09/2021 मंगळवार


प्रति,

१. सर्व कार्यालय प्रमुख ता. कंधार

२. सर्व मंडळ अधिकारी ता. कंधार

३. सर्व तलाठी ता. कंधार

४. सर्व ग्रामसेवक ता. कंधार

५. सर्व कृषी सहाय्यक ता. कंधार


विषय:- मुख्यालयी उपस्थित राहणे बाबत.

संदर्भ:- मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांचे अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुचना दिनांक ०७.०९.२०२१

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कंधार तालुक्यात काल पासुन मुसळधार पाऊस चालू असून त्यामूळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

तरी सर्व कार्यालय प्रमुख यांना यादवारे सूचित करण्यात येते की, आपण आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. सक्षम अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये तसेच, आपले अधिनस्त कर्मचारी यांनाही त्यांचे संबंधित गावात अतिवृष्टी बाबत गावांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्याच्या सूचना दयाव्यात. जिवीत व वित्त हानी झाल्यास या कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेस अवगत करावे.

सदरील कामात हयगय किंवा निष्काळजीपणा केल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ च्या विविध कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल याची गांभीयाने नोंद घ्यावी.


व्यंकटेश मुंडे

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,

कंधार


प्रतिलीपी

१. मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. मा.उपविभागीय अधिकारी,कंधार यांना माहितीस्तव सविनय सादर.

व्यंकटेश मुंडे

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,

कंधार


Tags: #नैसर्गिकआपत्ती#अतिवृष्टी#मुख्यालय#कंधार#कार्यालयप्रमुख#मंडळअधिकारी#तलाठी#ग्रामसेवक#कृषीसहायक