प्रेस नोट
महाराष्ट्र शासन
नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन तिन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर मेऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटीअथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसगीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.
तथापी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमा धारक शेतकन्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अँप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri (@iffcotokio.co.in या पत्यावर मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.
तथापी काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
नांदेड (०३)
जा.क्र./तंत्र-4/ प्रतिदियो/ 3244/2021
कार्यालय
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड
date. 07/09/2021
प्रति,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना माहितीस्तव देण्यात येत असून वरील बातमी प्रसिद्धीस देण्यात यावी.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
नांदेड (०३)
वरील प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश बातमी व प्रसिद्धीस देण्यात यावे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना काल दि.07/09/2021 पत्र दिले आहे,त्या आदेशाची तात्काळ प्रसिद्धी होणे आवश्यक असताना जिल्हा माहिती अधिका-याने कार्यालयाच्या ब्लॉग वर अद्याप प्रसिद्धी दिलेली नाही, सदरील कामात अक्षम्य दिरंगाई,हयगय, निष्काळजीपणा केल्याबद्दल नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 च्या कलमान्वये जिल्हाधिकारी कारवाई करतील काय?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता