सोमवार, मे ३१, २०२१

लाच प्रकरण :महा लाचखोर मुख्याधिका-यासह लाचखोर उद्यान पर्यवेक्षक व ईतर एका लाचखोराला 9 लाख लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल, व महा लाचखोर सहकार अधिकारी 15 हजार लाच घेताना आणि एका लाचखोर वकीलाला 10 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 


Pune : पुणे अॅन्टी करप्शनचा तिहेरी दणका! 9 लाखाच्या लाच प्रकरणी बडा अधिकारी ACB च्या 'रडार'वर; पुण्यातील वकिलासह शिरूर आणि तळेगाव दाभाडे येथे कारवाई, प्रचंड खळबळ

पुण्याच्या लाच लुचपत विभागाने आज तिहेरी कारवाई करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून,यात एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वकिलाचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी (सीओ) आणि आणखी एका अधिकाऱ्याने 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने आज डिमांडचा (लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पकडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पाहिल्या कारवाईत शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे ( वय 56 ) यांना पकडले आहे. शिवाजी हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक शिवाजी यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तकरार केली होती. त्यानुसार आज कारवाईत तडजोडीनंतर 15 हजार रुपये घेताना पकडले आहे.

तर दुसऱ्या कारवाईत एका वकिलाला 10 हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. हरिकिसन श्रीरामजी सोनी (वय ५७) असे पकडण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यातील महिला तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा वाद सुरू आहे. केसमध्ये शासनाने लोकसेवक सोनी यांना वकील म्हणून नेमले आहे. यावेळी त्यांनी 20 हजार रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे केली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यात पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज 10 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

मोदींनी सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले : अमित शहा

 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला सत्तेत दुसऱ्यांदा येऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही ट्विट करून मोदींचे अभिनंदन केले आहे.

“मागील सात वर्षांत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासीयांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा पूर्ण विश्वास आहे.

या सात वर्षांत मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वस्पर्शी व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले.” असे मत अमित शहा यांनी ट्विट करून व्यक्त केले.