- २४ तासात ५० वेळा विज गुल होते
- जे.ई.गंदे यांच्या मनमानी कारभारास शेळगाव छ्त्री ची जनता कंटाळली
नायगाव,दि 6 मे : नायगाव जवळील शेळगाव छ्त्री येथील डीपी वर फ्युज टाकण्यासाठी महावितरणकडून तारेचा उपयोग करण्यात येतो.मात्र अवघड डीपीला प्राणी पक्षी किंवा माणसाचा हात लागला तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरण विभागाने तात्काळ किटकॅटचि व्यवस्था करून संभाव्य हानी टाळावी अशी करण्याची मागणी गावातील सर्व नागरिकांनी एका निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की शेळगाव छत्री येथे महावितरणाच्या डीपीमध्ये फ्युज टाकताना किटकॅट नसल्याने उघड्या तारेचा आधार घेऊन फ्युज टाकावा लागत आहे.महावितरणाच्या संबंधीत जे.ई.गंदे यांना हा प्रकार निदर्शणास अनेक वेळा आणुन दिला पण गंदे हे आपला मनमानी कारभार करत असुन शेळगाव छत्री येथे फ्युज अभावी विज दिवसातुन ५० वेळा गुल होत आहे.अगोदरच कडक उन्हाळा त्यात विज गुल या मुळे नागरिक मनस्ताप व्यक्त करत आहेत.
तसेच गंदे यांना वेळोवेळी तक्रार देऊन पण मात्र उघड्या डीपीवर फ्युज टाकण्यासाठी किटकॅट उपलब्ध करून दिले जात नाही.आता आगामी काळात येणारा पावसाळा,वादळी वाऱ्याचे दिवस लक्षात घेऊन तरी महावितरतने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.या डीपीवर काही काम करण्यास जाणाऱ्या लाईनमन तसेच गावकऱ्यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो.यावर वेळीच उपाययोजना करावी व होणारी जीवितीहानी टाळावी,अशी मागणी उर्जामंत्री,पालकमंत्री,जिल्हाधीकारी,खासदार,आमदार,व महावितरणाच्या वरिष्ठांना निवेदनाद्वारे सर्व गावकरी यांनी केली आहे.
लॉकडाऊन असल्याने त्यांनी हे निवेदन संंबंधितांना मेलवर आणि व्हाॅटसॲपवर पाठविले आहे..
✍️✍️✍️


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता