शनिवार, मे १५, २०२१

नांदेड खा.प्रतापराव चिखलीकरांच्या गावातच 15 दिवसांपासून अंधार,ना लाईट ना पाणी ! ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील नागरिकांनी सरपंचाच्या घरावर काढला मोर्चा

 


कंधार,15 मे 2021 : तालुक्यातील चिखली गावातील वार्ड क्र.3 व 4 मध्ये मागिल 15 दिवसांपासून लाईट नसल्याने गावकरी अंधारात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लाईट नसल्यामुळे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे पाणी कुठून आणायचे हा प्रश्न या प्रभागातील नागरिकांना पडला आहे.विशेष म्हणजे चिखली हे गाव नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे जन्मगाव आहे,ग्रामपंचायचा सरपंच खासदारच्या गटाचा आहे.

सरपंचाच्या घरावर मोर्चा


नागरिकांनी सरपंच,ग्रामसेवक व लाईनमन तसेच अभियंत्याला गावात लाईट नसल्याची वारंवार कल्पना देवून सुद्धा गावात लाईटची सोय करण्याच्या गावकऱ्यांच्या रास्त मागणी कडे सरपंच, संबंधित यंत्रणेने दूर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य तथा विरोधी गटनेते मनोहर चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य भरत कदम, बाबुराव गायकवाड,सुलेभान करेवाड व गणेश पवळे, केशव पवळे,शरद कदम,अशोक चिखलीकर सह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रात्रीच्या अंधारात सरपंचाच्या घरावर धडक मोर्चा काढला, आणि सरपंचाला घेराव घालत लाईटची लवकरात लवकर सोय करण्याची मागणी केली.


ग्रामसेवक प्रतिक्रिया
आठ दिवस झाले लाईट नाही, डिपीचा प्रोब्लेम आहे, डीपी जिल्हा लेवललाच उपलब्ध झालेली नाही,उद्याला डिपी उपलब्ध होईल म्हणजे 17 मे रोजी,वार्ड क्र. 3 व 4 मध्ये लाईट नाही,बारुळ वरून पाईप लाईन आहे,बारुळहून पाणी चालू आहे.वार्ड क्र.4 मध्ये अर्ध्या भागाला व टोटल प्रभाग क्र.3 मध्ये पाणी नाही.एक डीपी जळालेली आहे.जील्ह्यावरच डबडे उपलब्ध नाहीत,आपल्याला कुठून देणार आहेत त्यांनी.
  गंगाधर कांबळे-ग्रामसेवक,चिखली, कंधार
16 मे 2021,9:51am

विरोधी गटनेते  प्रतिक्रिया

वार्ड क्र.4 मध्ये पाइपलाइन नाही,तेथे पाणीच नाही,रात्री डिपी आणली आम्ही,चव्हाण साहेबांनी सहकार्य केले, चव्हाण साहेबांनी सांगितले लातूरला,डिपी मिळाला, गेल्या 15 दिवसांपासून लाईट आणि पाणी नाही,वार्ड क्र.4 पूर्ण व 3 ,वार्ड क्र.2 मध्ये दुस-या डिपीवरुन वायर टाकून घ्यावे लागते, सरपंचाच्या हातचे काही नाही, सरपंच चिखलीकर जे सांगल ते करते,दोन डिपीचा लोड एका डिपीवर आहे,दुसरी डिपी आणण्यासाठी ठराव द्या म्हटलं तर ठराव द्यायला तयार नाहीत.गाव अंधारात आहे डिपी उपलब्ध होत नसल्याने सरपंचाच्या घरावर मोर्चा काढल्या, मोर्चा कसा काढला म्हणून आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला,दोन प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होता,आता पर्यंत तेच करत आलेत,आपण सक्षम असल्यामुळे आता ते जूळणा झालय, पंधरा वीस लोकांचे घरकुल मस्टरचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले नाहीत, अपंगाचे पैसे वाटप केले नाहीत, गावात स्मशानभूमी नाही,गावात नाल्या नाहीत.

ग्रा.प सदस्य तथा गटनेते-मनोहर गायकवाड

चिखली,कंधार


सरपंच प्रतिक्रिया


घरकुल मस्टर संदर्भात रोजगार सेवक प्रतिक्रिया


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता