शुक्रवार, मे २८, २०२१

पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची बेधुंद लाठी...BJP युवा मोर्चा पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून थर्ड डिग्री, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

 खाकी वर्दीला व मानुसकिला काळीमा फासणारी घटना,जमाव पांगवत असताना व्हिडिओ का बनवला म्हणून जनावरांसारखी मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी होत आहे


जालना,दि 28 मे : जालना जिल्ह्यामध्ये एका युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण करणारा तरुण हा भाजपा युवा मोर्चाचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहे. संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर, पुन्हा एकदा पोलीस प्रशासन बदनाम झालं आहे. शिवराज नारिलवाले असं जालना पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या युवकाचं नाव आहे. शिवराज हा जालना भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे. 9 मे रोजी जालना इथल्या खासगी रुग्णालयात करोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. यामध्ये शिवराजही होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जमाव पांगवत असताना शिवराजने त्याचा व्हिडिओ बनविला असा आरोपही शिवराजवर करण्यात आला आहे. या संशयामुळे पोलिसांनी शिवराजला बेदम मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये पोलिसांविरोधात संताप वाढला आहे. इतकंच नाहीतर, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात काहीही माहिती दिली नाही. संपूर्ण शरीरावर झाल्या जखमा भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कादीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, ९ एप्रिल रोजी रात्री खासगी रुग्णालयात रूग्णाचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि थोड्याच वेळात पोलीस रुग्णालयात पोहोचले. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लोकांचा पाठलाग केला. पोलिसांचं म्हणणं आहे की, जर पोलिसांनी रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या लोकांना पांगवलं नसतं तर रुग्णालयात बरंच नुकसान झालं असतं. त्यामुळे अशी कारवाई करावी लागली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


“ आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे आणि नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली (पोलीस) आहे. आपण फक्त गुन्हा शोधणे आणि गुन्हेगारांची नोंद करणे पुरेसे नाही. आपण लोकांचे प्रेम जिंकण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत... जो माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत किंवा स्थिर नसतो किंवा परिस्थितीत शांत राहू शकत नाही, असा व्यक्ती पोलीस दलाचा सदस्य होऊ शकत नाही ”

- सरदार वल्लभभाई पटेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता