मंगळवार, जुलै २०, २०२१

कृषी सेवक भरती 2019 प्रकरण : लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालकाने 94 उमेदवारांना सोडले वा-यावर ! 75 उमेदवारांना दिले नियुक्ती पत्र ; मात्र उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीला दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे _पात्र उमेदवारांचे दादा भुसेंना साकडे



  • कृषी सेवकांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ
  • पात्र उमेदवारांचे कृषिमंत्री भुसे यांना निवेदन

नांदेड : कृषी सेवक भरती २०१९ मध्ये लातूर विभागाकडून १६९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यात नोव्हेंबर २०१९ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी झाली. यातील फक्त ७५ उमेदवारांना नियुक्ती दिली. उर्वरित ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याची तक्रार पात्र उमेदवारांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

लातूर कृषी सहसंचालक विभागांतर्गत २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून १६७ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यातील निवड झालेल्या ७५ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु उर्वरित ९४ उमेदवारांना विभागीय पदोन्नती परीक्षानुसार विभागात कार्यरत असलेले कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदोन्नती दिल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल, यासाठी काही महिने लागणार, असे आश्वासन विभागाकडून दिले.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व कार्यालयीन कामकाज बंद असल्याने वेळ लागेल, अशी कारणे देऊन विभागाने तीन महिने वेळ वाढवून दिली. आता कार्यालयीन कामकाज सुरू झाले तरी विभागीय परीक्षा कधी होईल व उर्वरित उमेदवारांना नियुक्ती मिळेल. अजून किती वेळ लागेल याबाबत सविस्तर माहिती मिळत नाही. फक्त प्रतीक्षा करा एवढेच उत्तर विभागाकडून मिळत आहे. इतर विभागात मात्र पदोन्नती देण्यात आली. तसेच उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे लातूर सहसंचालक विभागातील पात्र असलेल्या ९४ कृषी सेवकांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री भुसे यांच्याकडे आकाश सूर्यवंशी तसेच राहुल कावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कृषी सेवक भरती 2019 लातूर जाहिरात



2021 पासून निर्मल ज्युनिअर कॉलेजचा केवळ 50 विद्यार्थ्यांसाठीचा गुणात्मक कार्यक्रम जाहीर

 


  • अकरावी- बारावी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी...

 नांदेड,दि 20 जुलै 2021 : कोरोना या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण जग स्तब्ध असतांना सगळ्यात जास्त जर नुकसान कोणत्या क्षेत्राचे झाले असेल तर, ते शिक्षण क्षेत्राचे झाले आहे.बरेच गुणवान विद्यार्थी नैराशेत गेल्याचे चित्र समोर येत आहे. अशा विद्यार्थ्यांना गरज आहे ती योग्य समुपदेशनाची व त्याच्या अंगी असलेली गुणवता बाहेर काढण्याची.

     सतत दोन वर्षांपासून विद्यार्थी हे *Quality- education* पासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठल्या गर्दीच्या ठिकाणी क्लास लावणे हे पालकांना आर्थिक व विद्यार्थ्यांना करिअर साठी धोक्याचे ठरू शकते.

   अशाच विद्यार्थ्यांच्या मनाचा वेध घेऊन आम्ही त्यांच्या यशाची जबाबदार घेणार आहोत.

  इयत्ता दहावीतून अकरावीमध्ये प्रवेश करणाऱ्या व मेडिकल किंवा आय आय टी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या *केवळ 50 विद्यार्थी मेडिकलसाठी व 50 विद्यार्थी आय आय टी* साठी असे एकूण 100 विद्यार्थ्यांसाठी आम्ही दर्जेदार कोचिंग व आधुनिक हॉस्टेल आणि कॉलेजची सुविधा उपलब्ध करून देत आहोत.

    भारतातील *दिल्ली, कानपुर, वाराणसी, नोएडा, सीवान, हैदराबाद येथील तज्ञ प्राध्यापक* सोबत घेऊन विद्यार्थ्यांची सम्पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहोत.

   गुणवत्तेच्या बाबतीत मागील *20 वर्षांपासून निर्मलने आपले स्थान टिकवून ठेवले आहे,* 

   कोरोना काळात केवळ विद्यार्थी त्याच्या इच्छित ध्येयपासून दूर जाऊ नये म्हणून *संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पालमकर* यांनी महाराष्ट्रातील नामांकित संस्थेशी टाईप करून वरील सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

   मर्यादित संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ताबडतोब सम्पर्क साधावे असे आवाहन करण्यात आले.

संपर्क:

 *निर्मल विद्यालय व ज्युनियर कॉलेज,* 

 *निर्मल हॉस्टल* 

माणिक नगर, एअरपोर्ट रोड, तरोडा नांदेड.431605

Mob 9422363333

1)90% च्या वरती दहावी गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे डिस्काउंट असेल.

2) 80% च्या वरती दहावी गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट असेल.

3) *ऑनलाइन /ऑफलाइन कोचिंग तसेच होस्टेल व कॉलेजची सुविधा (व्होकेशनल अभ्यासक्रमासह) उपलब्ध आहेत.*