शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळालाच पाहिजे - हनुमंत कदम बामणीकर
वर्षे 2020 चा खरीप हंगाम पिक विमा परतावा मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे हनुमंत कदम यांनी सोमवारी दिनांक 15 मार्च 2021 रोजी निवेदनाद्वारे विनंती अर्ज केला आहे. 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी नंतर पीक विमा कंपनीकडून अचानक 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीला नुकसानीची माहिती देण्याची अट घालण्यात आली दरम्यान ग्रामीण भागांमध्ये शेतकरी अद्यापही तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला नसताना त्या माध्यमातून माहिती देणे बंधनकारक करण्यात आले परिणामी सदर प्रक्रियेतील शेत संपूर्ण माहिती नसल्याने आणि अतिवृष्टीच्या प्रचेता शेती व पिकांचे अत्यंत वाईट परिस्थिती झाल्याने कंधार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नुकसान ची माहिती कंपनीला देणे शक्य झालं नाही ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी माहिती दिली होती त्यांच्या शेतात देखील नुकसानीची पाहणी कंपनीकडून उशिरा करण्यात आली आहे.
विमा कंपनीने शासकीय पंचनामे ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा परतावा द्यावा 72 तासाच्या आत ग्रामीण भागात कंपनीकडून वापर व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसार झालेला नाही त्यामुळे ही शेतकऱ्यावरती ही वेळ आलेली आहे ती अट काढून शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळावा याकरता शेतकरी पुत्र हनुमंत कदम बामणीकर यांनी दिनांक 15 मार्च 2021 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नांदेड माननीय रविशंकर चलवादे सर यांना निवेदनाद्वारे हनुमंत कदम यांनी विनंती केली
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window


टिप्पण्या